शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
3
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
4
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
5
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
6
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
7
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
8
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
9
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
10
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
11
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
12
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
13
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
14
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
15
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
16
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
17
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
18
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
19
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
20
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे

मानवी अस्तित्वालाच ‘एआय’मुळे धोका?; यूनोच्या सुरक्षा परिषदेत १८ जुलैला विचारमंथन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2023 06:42 IST

अण्वस्त्रांच्या नियंत्रणासाठी एआयचा होणारा संभाव्य वापर व त्यातील जोखीम इत्यादी मुद्द्यांवर या बैठकीत चर्चा होईल.

संयुक्त राष्ट्र : कृत्रिम बुद्धिमत्तेचे (एएआय) नव्या तंत्रज्ञानामुळे पुढील काळात जगावर नेमके काय परिणाम होणार अशी प्रत्येकाच्या मनात भीती आहे. लोकांच्या मनात याबाबत कमालीची उत्सुकता आहे. एआयमुळे आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षेला निर्माण होणाऱ्या संभाव्य धोक्यांबाबत  संयुक्त राष्ट्रांच्या (युनो) सुरक्षा परिषदेत प्रथमच चर्चा होणार आहे. त्यासाठी १८ जुलैला एका बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. अण्वस्त्रांच्या नियंत्रणासाठी एआयचा होणारा संभाव्य वापर व त्यातील जोखीम इत्यादी मुद्द्यांवर या बैठकीत चर्चा होईल. (वृत्तसंस्था)

माणूस परावलंबी होईल‘शास्त्रज्ञ आणि तज्ज्ञांनी एआयची आण्विक युद्धाच्या धोक्याशी तुलना केली आहे. एआयमुळे निर्माण होणारे धोके टाळण्यासाठी जगाने वेळीच उपाययोजना केली पाहिजे, असे आवाहनही त्यांनी केले असल्याचे अँटोनियो गुटेरेस यांनी म्हटले होते. एआयच्या वापरामुळे माणूस अधिक परावलंबी होईल.

माणसाची सर्जनशीलता नष्ट हाेईल?माणसाचा मेंदू हा एक प्रकारचे जैविक यंत्रच आहे, असे काही शास्त्रज्ञांचे मत आहे. यंत्राप्रमाणे माणसाच्या नैसर्गिक उत्क्रांतीलाही काही मर्यादा आहेत, असे म्हटले जाते. एआयचा वापर करून स्वयंविकास साधण्याचे प्रशिक्षण मिळालेली यंत्रे मानवजातीस कायमचे नष्ट करू शकतील किंवा गुलाम बनवतील, असे शास्त्रज्ञांना वाटते. एआयमुळे माणसाची विचारशक्ती संपण्याचा तसेच त्याची सर्जनशीलता संपुष्टात येण्याची ही शक्यता वर्तविली जाते. एआयचा भविष्यात पगडा वाढल्यास विविध शस्त्रांचा अनिर्बंध वापर वाढण्याचीही भीती आहे.एआयशी संबंधित अशा अनेक मुद्द्यांवर संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेच्या बैठकीत चर्चा होणार आहे. 

टॅग्स :Internationalआंतरराष्ट्रीय