शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

देशाच्या राजकारणात कसा होईल बदल, राहुल गांधींनी केंब्रिजमध्ये सांगितलं आपलं व्हिजन

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2022 09:20 IST

राहुल गांधी सोमवारी केंब्रिज विद्यापीठाच्या कॉर्पस ख्रिस्ती कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यासाठी पोहोचले होते.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सोमवारी लंडनमधील केंब्रिज विद्यापीठातील कॉर्पस ख्रिस्ती कॉलेजमधील (Corpus Christi College in Cambridge University) विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यादरम्यान राहुल गांधी यांनी भारताला राष्ट्र (राज्यांचा महासंघ) म्हणण्याचे आव्हान दिले. राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी भारताची तुलना युरोपशी केली. फरक एवढाच की तो केंद्रशासित प्रदेश नाही, असं ते म्हणाले.

केंब्रिज विद्यापीठातील कॉर्पस ख्रिस्ती कॉलेजमधील इतिहासाच्या असोसिएट्स प्रोफेसर आणि फेलो डॉ. श्रुती कपिला यांच्याशी राहुल गांधी यांनी संवाद साधला. यादरम्यान, भारतातील सद्य परिस्थितीबद्दलही त्यांनी भाष्य केलं. “राजकारण आणि धोरणात बदल करण्यासाठी आपल्या पक्षात तरुणांना दरवाजे खुले करत आहोत. तरुणांना एकत्रित करण्याचा काँग्रेस प्रयत्न करत आहे, जेणेकरून त्यांना आपला आवाज उठवता येईल. महात्मा गांधींची राजकारणाची शैली ही काळाची गरज आहे,” असंही ते म्हणाले.

“ऑगस्टमध्ये पक्षात निवडणुका होणार आहेत. पक्षाचा नवा अध्यक्ष कोण असेल ते त्यात ठरेल,” असंही ते म्हणाले. चर्चेदरम्यान राहुल गांधी यांना त्यांचे वडील राजीव गांधी यांच्या निधनाबद्दल प्रश्न विचारण्यात आला. याचं उत्तर देताना ते भावूक झआले. माझ्या जीवनातील सर्वात मोठा शिकलेला अनुभव हा माझ्या वडिलांचा मृत्यू होता, असंही ते म्हणाले. 

बेरोजगारीवरून निशाणादरम्यान, बेरोजगारीच्या मुद्द्यावरून राहुल गांधींनी केंद्र सरकारवर पुन्हा निशाणा साधला आहे. देशातील बेरोजगारीने विक्रम मोडले आहेत. खेडेगावात तसेच शहरांमध्ये बेरोजगारीने कहर केला आहे. एवढेच नाही तर राजस्थानच्या काँग्रेस सरकारने 'इंदिरा गांधी शहरी रोजगार हमी योजना' आणण्याचा निर्णय घेतल्याचे राहुल गांधी यांनी जाहीर केले.

देशात बेरोजगारीने विक्रम मोडले आहेत. खेडेगावात तसेच शहरांमध्ये बेरोजगारीने कहर केला आहे. ४५ कोटींहून अधिक लोकांनी नोकरी मिळण्याची आशा सोडली आहे. २००५ मध्ये काँग्रेस पक्षाने मनरेगा आणली. यामध्ये किमान १०० दिवस कामाची हमी देऊन बेरोजगारीच्या समस्येवर मात करण्यात आल्याचंही त्यांनी सोशल मीडिया पोस्टमध्ये नमूद केलं. राजस्थानच्या काँग्रेस सरकारनं ‘इंदिरा गांधी शहरी रोजगार हमी योजना’ आणली आहे. या योजनेअंतर्गत गरजू कुटुंबांना १०० दिवसांची रोजगार हमी देण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसIndiaभारत