शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
2
VIDEO: उत्तरकाशीमध्ये ढगफुटी; १४ सेकंदात सगळं गाव उद्ध्वस्त, घरांसह अनेकजण ढिगाऱ्याखाली गाडले गेले
3
७०, ५०, ४० की ३५ किलो; ट्रेनमध्ये किती सामान घेऊन जाऊ शकता? अन्यथा मोठा दंड होऊ शकतो
4
खिशातून एक रुपयाही न भरता शेतकऱ्यांना मिळेल वार्षिक ३६,००० पेन्शन, योजनेचा कसा घ्यायचा फायदा?
5
"न्यायपालिकेला राजकीय आखाडा बनवण्याचा प्रकार नाही का?", आरती साठेंच्या न्यायमूर्तीपदी नियुक्तीला रोहित पवारांचा विरोध
6
Mumbai: कबुतरखान्यावरून आदित्य ठाकरेंची देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंवर टीका
7
"ढगफुटीमुळे हॉटेल्स, लॉज, बाजारपेठा, गाव उद्ध्वस्त..."; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला भयंकर अनुभव
8
ट्रम्प यांच्या वक्तव्याने भारतीय गुंतवणूकदारांना २ लाख कोटींचा फटका; फक्त 'या' क्षेत्रात झाली वाढ
9
बिहारनंतर आता या राज्यातही होणार मतदार याद्यांचं पुनरीक्षण, निवडणूक आयोगाने दिले आदेश   
10
कॅनडात खलिस्तान्यांच्या कुरापती सुरुच; 'रिपब्लिक ऑफ खलिस्तान' नावाने उभारले बनावट दूतावास
11
मंत्रिमंडळ बैठकीत ७ मोठे निर्णय; स्टार्टअप उद्योजगता धोरण जाहीर, समृद्धी फ्रेट कॉरिडॉर मंजूर
12
मराठीशी पंगा महागात! निशिकांत दुबेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता; मनसेकडून याचिका दाखल
13
VIDEO: दोन बैलांमध्ये भांडण, स्कूटीवाल्या मुलीला बसली जोरदार धडक, ती रस्त्यावर पडली अन् मग...
14
टाटा ग्रुपचा मोठा धमाका! शेअर बाजारात येणार आणखी एका कंपनीचा IPO, गुंतवणूकदार मालामाल होणार?
15
२०,५००% रिटर्न! बिहारच्या या कंपनीनं ५ वर्षांत ₹१ लाखांचे केले ₹२ कोटी, तुमच्याकडे आहे का?
16
Amit Shah: विक्रमी अमित शाह! 'अशी' कामगिरी करणारे पहिलेच गृहमंत्री, अडवाणींनाही टाकले मागे
17
बिहारमध्ये डोमिसाईल पॉलिसी मंजूर; शिक्षक भरतीमध्ये ८५ टक्के बिहारींनाच नोकरी मिळणार
18
पाकिस्तानातील प्रत्येक सहावा व्यक्ती भिकारी; परदेशात पसरलं नेटवर्क, दरवर्षी ११७ ट्रिलियन कमाई
19
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; घटस्फोटानंतर 12 कोटी रुपये अन् BMW कार मागणाऱ्या पत्नीला काय मिळाले?
20
युजवेंद्र चहलने घटस्फोटावर उघडपणे विधान केल्यानंतर Ex-पत्नी धनश्रीची पोस्ट, म्हणाली- शांतता...

देशाच्या राजकारणात कसा होईल बदल, राहुल गांधींनी केंब्रिजमध्ये सांगितलं आपलं व्हिजन

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2022 09:20 IST

राहुल गांधी सोमवारी केंब्रिज विद्यापीठाच्या कॉर्पस ख्रिस्ती कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यासाठी पोहोचले होते.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सोमवारी लंडनमधील केंब्रिज विद्यापीठातील कॉर्पस ख्रिस्ती कॉलेजमधील (Corpus Christi College in Cambridge University) विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यादरम्यान राहुल गांधी यांनी भारताला राष्ट्र (राज्यांचा महासंघ) म्हणण्याचे आव्हान दिले. राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी भारताची तुलना युरोपशी केली. फरक एवढाच की तो केंद्रशासित प्रदेश नाही, असं ते म्हणाले.

केंब्रिज विद्यापीठातील कॉर्पस ख्रिस्ती कॉलेजमधील इतिहासाच्या असोसिएट्स प्रोफेसर आणि फेलो डॉ. श्रुती कपिला यांच्याशी राहुल गांधी यांनी संवाद साधला. यादरम्यान, भारतातील सद्य परिस्थितीबद्दलही त्यांनी भाष्य केलं. “राजकारण आणि धोरणात बदल करण्यासाठी आपल्या पक्षात तरुणांना दरवाजे खुले करत आहोत. तरुणांना एकत्रित करण्याचा काँग्रेस प्रयत्न करत आहे, जेणेकरून त्यांना आपला आवाज उठवता येईल. महात्मा गांधींची राजकारणाची शैली ही काळाची गरज आहे,” असंही ते म्हणाले.

“ऑगस्टमध्ये पक्षात निवडणुका होणार आहेत. पक्षाचा नवा अध्यक्ष कोण असेल ते त्यात ठरेल,” असंही ते म्हणाले. चर्चेदरम्यान राहुल गांधी यांना त्यांचे वडील राजीव गांधी यांच्या निधनाबद्दल प्रश्न विचारण्यात आला. याचं उत्तर देताना ते भावूक झआले. माझ्या जीवनातील सर्वात मोठा शिकलेला अनुभव हा माझ्या वडिलांचा मृत्यू होता, असंही ते म्हणाले. 

बेरोजगारीवरून निशाणादरम्यान, बेरोजगारीच्या मुद्द्यावरून राहुल गांधींनी केंद्र सरकारवर पुन्हा निशाणा साधला आहे. देशातील बेरोजगारीने विक्रम मोडले आहेत. खेडेगावात तसेच शहरांमध्ये बेरोजगारीने कहर केला आहे. एवढेच नाही तर राजस्थानच्या काँग्रेस सरकारने 'इंदिरा गांधी शहरी रोजगार हमी योजना' आणण्याचा निर्णय घेतल्याचे राहुल गांधी यांनी जाहीर केले.

देशात बेरोजगारीने विक्रम मोडले आहेत. खेडेगावात तसेच शहरांमध्ये बेरोजगारीने कहर केला आहे. ४५ कोटींहून अधिक लोकांनी नोकरी मिळण्याची आशा सोडली आहे. २००५ मध्ये काँग्रेस पक्षाने मनरेगा आणली. यामध्ये किमान १०० दिवस कामाची हमी देऊन बेरोजगारीच्या समस्येवर मात करण्यात आल्याचंही त्यांनी सोशल मीडिया पोस्टमध्ये नमूद केलं. राजस्थानच्या काँग्रेस सरकारनं ‘इंदिरा गांधी शहरी रोजगार हमी योजना’ आणली आहे. या योजनेअंतर्गत गरजू कुटुंबांना १०० दिवसांची रोजगार हमी देण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसIndiaभारत