शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

पाकिस्तानात हिंदू मुलीचं अपहरण करुन जबरदस्तीने धर्मांतर; मुस्लीम युवकाशी लावला निकाह 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2020 12:20 IST

वृत्तानुसार, मुलीला लग्नाच्या मंडपातून पळवून नेले आणि नंतर जबरदस्तीने इस्लाम धर्म स्वीकारुन तिचे लग्न केले.

ठळक मुद्देधर्म परिवर्तन करुन जबरदस्तीने केला निकाहअपहरणकर्त्यावर कारवाई केल्याची माहिती दिली नाही.पाकिस्तानच्या सिंध प्रांतातील मटियारी जिल्ह्यातील घटना

इस्लामाबाद - काही दिवसांपूर्वीच भारताने शेजारील राष्ट्रातून आलेल्या शरणार्थी अल्पसंख्याकांना भारताचं नागरिकत्व देण्याचा कायदा पारित केला. मुस्लीम बहुल राष्ट्रात अल्पसंख्याकांवर अत्याचार होत असल्याचा आरोप सत्ताधारी भाजपाने केला मात्र सरकारने आणलेल्या या कायद्यामुळे देशाचं धर्माच्या नावावर विभाजन होत असल्याचा आरोप विरोधी पक्षाने केला. याच दरम्यान पाकिस्तानच्या सिंधमध्ये हिंदू वधूचं अपहरण प्रकरणात आता एक नवीन बाब समोर आली आहे.

वृत्तानुसार, मुलीला लग्नाच्या मंडपातून पळवून नेले आणि नंतर जबरदस्तीने इस्लाम धर्म स्वीकारुन तिचे लग्न केले. इम्रान खान एकीकडे नवीन पाकिस्तान बनवण्याचा दावा करत असताना त्यांच्या कार्यकाळात हिंदू महिलांचे अपहरण आणि जबरदस्तीने धर्मांतर घडवण्याच्या घटना थांबत नसल्याचं यातून पुन्हा एकदा उघड झालं. कुटुंबाच्या तक्रारीवरून पोलिसांनी मुलीला ताब्यात घेतले आहे. पूर्वी या घटनेला प्रेम प्रकरणांशी जोडलं जात होतं. माहितीनुसार पाकिस्तानच्या सिंध प्रांतातील मटियारी जिल्ह्यातील हाला शहरात भारतीबाई नावाच्या हिंदू मुलीचा विवाह सोहळा सुरु होता. त्याचवेळी काही लोकांनी तिच्या घरातून मुलीचं अपहरण केले. अखिल पाकिस्तान हिंदू पंचायतचे सरचिटणीस रवी धवानी यांनी टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या माहितीनुसार दोन आठवड्यांत हिंदू महिलांना लक्ष्य केले जाण्याची ही तिसरी घटना आहे. या महिन्याच्या 15 तारखेला एका 15 वर्षाच्या अल्पवयीन मुलास जबरदस्तीने इस्लाम धर्म स्वीकारण्यास भाग पाडलं. 

धर्म परिवर्तन करुन जबरदस्तीने केला निकाहधवानी म्हणाले की, भारतीबाईंचे अपहरण करून त्यांना सिंधच्या हाला शहरातून कराचीच्या बनोरिया येथे नेण्यात आले. जिथे तिचे जबरदस्तीने धर्मांतर केले गेले. यानंतर शाहरुख मेनन नावाच्या मुस्लिम युवकाशी तिचं लग्न लावण्यात आले. मुलीच्या कुटुंबीयांना पंचायतीच्या मदतीने पोलिसांपर्यंत पोहोचवण्यात आले. पोलिसांनी मुलीला कराचीहून परत सिंध येथे आणले आणि तिला न्यायालयात हजर केले.

अपहरणकर्त्यावर कारवाई केल्याची माहिती दिली नाही. युवतीचं अपहरण करणाऱ्या मुलावर काय कारवाई झाली याची माहिती पोलिसांनी अद्याप दिलेली नाही.  मीरपूर खासमध्ये चार दिवसांपूर्वी एका 25 वर्षीय हिंदू महिलेचे अपहरण करून धर्मांतर केले गेले असं धवानी यांनी सांगितले.  

टॅग्स :Pakistanपाकिस्तानHinduहिंदूMuslimमुस्लीमKidnappingअपहरण