शहरं
Join us  
Trending Stories
1
Satyapal Malik Death: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
2
“मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना चांगले यश मिळेल”; महायुतीतील नेत्याचा मोठा दावा
3
Satyapal Malik: 'मला सत्य सांगायचे आहे', शेवटच्या पोस्टमध्ये काय म्हणाले होते सत्यपाल मलिक?
4
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! दिवाळीपूर्वी पगारात होणार इतकी वाढ? कोणाला मिळणार फायदा?
5
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
6
"Help Me! गर्लफ्रेंडसोबत फिरायला जायचंय..."; बॉयफ्रेंडने लावले UPI स्कॅनर असलेले पोस्टर
7
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', 'ऑपरेशन सिंदूर'बाबतच्या चर्चेवरून PM मोदींचा टोला
8
Mumbai: कबुतरांना दाणे टाकताना रोखलं, वृद्ध व्यक्तीसह त्यांच्या मुलावर लोखंडी रॉडने हल्ला!
9
शर्टचा फोटो, अज्ञात चेहरा...४३४ कोटींच्या एमडी ड्रग्जबाबत खुलासा; कर्नाटकातून मुंबईत कसं यायचे?
10
शांतता अन् निसर्ग सौंदर्याचा अनोखा मिलाफ; बीच लव्हर असाल तर भारतातील 'या' समुद्र किनाऱ्यांना नक्की भेट द्या!
11
"कोण खरा भारतीय, कोण नाही हे कोर्ट ठरवू शकत नाही’’, प्रियंका गांधींनी केला राहुल गांधींचा बचाव
12
ये वर्दी सिर्फ हिंमत नही बलिदान भी मांगती है! फरहान अख्तरच्या '१२० बहादुर'चा टीझर रिलीज
13
राज ठाकरेंशी युतीला कौल? इंडिया-मविआवर पाणी सोडण्याची तयारी? दिल्लीत उद्धव ठाकरेंची परीक्षा
14
Anil Ambani at ED Office : अनिल अंबानी ED च्या कार्यालयात दाखल; १७ हजार कोटींच्या कर्जाच्या फसवणुकीप्रकरणी झाले हजर
15
मी तिचा पहिला रूग्ण, ती माझी शेवटची डॉक्टर, १३ दिवसांचा ड्रामा नको...; इंजिनिअरनं संपवलं जीवन
16
बँकेचा CEO बदलताच शेअरला 'रॉकेट' स्पीड! एका झटक्यात गुंतवणूकदारांना झाला इतका फायदा
17
'या' महिला खासदाराचे क्रश आहेत पंकज त्रिपाठी, कॉफी डेटची दिलेली ऑफर, म्हणाल्या- "मी त्यांना पत्रही लिहिलं होतं पण..."
18
Mahabharat: महाभारतात ४५ लाख योद्ध्यांसाठी १८ दिवस कोण करत होतं स्वयंपाक?
19
ऑपरेशन सिंदूरचा जोरदार दणका! पाकिस्तानचं रहीम यार खान एअरबेस अजूनही बंद; पुन्हा जारी करण्यात आला NOTAM
20
IND vs ENG: 'या' विकेटने सामना फिरला...; सुनील गावसकरांनी सांगितला सामन्याचा 'टर्निंग पॉईंट'

India Pakistan Talks: भारत-पाकिस्तानमध्ये पडद्यामागे चर्चा? PM मोदींवर टीका करणाऱ्या मंत्री Hina Rabbani Khar यांनी दिलं स्पष्ट उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2023 09:26 IST

काही दिवसांपूर्वी हिना रब्बानी यांनी पंतप्रधान मोदींवर सडकून टीका केली

India Pakistan Talks, Hina Rabbani Khar: इस्लामाबाद आणि नवी दिल्ली (भारत आणि पाकिस्तान) यांच्यात पडद्यामागे कोणतीही 'बॅक-चॅनल' चर्चा होत नसल्याचे पाकिस्तानने सांगितले. पाकिस्तानच्या परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री हिना रब्बानी खार यांनी संसदेच्या वरच्या सभागृहातील सिनेटला सांगितले की, सध्या भारताशी अशी कोणताही चर्चा सुरू नाही. अनौपचारिक मुत्सद्देगिरीने काही परिणाम मिळाले असते तर ते योग्य ठरले असते, असेही त्या म्हणाल्या. पाकिस्तानच्या परराष्ट्र कार्यालयाच्या प्रवक्त्या मुमताज झहरा बलोच यांनी त्यांच्या साप्ताहिक मीडिया ब्रीफिंगमध्येही भारतासोबत अनौपचारिक राजकीय चर्चा न करण्याबाबत खार यांच्या वक्तव्याचा पुनरुच्चार केला.

भारत आणि पाकिस्तानमध्ये नक्की काय आहे राजकीय परिस्थिती?

"भारत आणि पाकिस्तानमध्ये कोणतीही अनौपचारिक मुत्सद्दीगिरी किंवा चर्चा सुरू नाही. खार यांनी सिनेटला सांगितले की, पाकिस्तानने नेहमीच या प्रदेशात शांतता प्रस्थापित करण्यासाठी पुढाकार घेतला आहे, परंतु सध्या, सीमापार शत्रुत्व (भारताकडून) ही एक मोठी समस्या आहे. त्याचा वेगळ्या प्रकारे विचार करावा लागेल. एकेकाळी पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय मंचांवर भारतासोबतचे संबंध सामान्य करण्यास सांगितले गेले होते, परंतु आता नवी दिल्ली इस्लामाबादला काय संदेश देत आहे याकडे जगाने लक्ष दिले पाहिजे," मुमताज झहरा बलोच म्हणाल्या.

भारत, पंतप्रधान मोदींवर बरसल्या हिना रब्बानी

"आम्हाला जे संदेश  आणि निरोप मिळत आहेत ते सर्व प्रक्षोभक स्वरूपाचे आहेत. प्रदेशातील शक्य त्या गोष्टींचा लाभ साऱ्यांना घेता यावा अशा प्रकारची आमची विचारसरणी आहे. तुमचा प्रदेश उपयोगात आणण्यात पाकिस्तानला सर्वात जास्त रस आहे. परंतु जेव्हा आपल्याकडे दुसऱ्या बाजूचे सरकार अशा प्रकराचे असते, ज्यांचे पंतप्रधान म्हणतात की त्यांची अण्वस्त्रे दिवाळीसाठी नाहीत… अशा वेळी आपण काय करू शकतो?" असे हिना रब्बानी खार खासदारांना उद्देशून म्हणाल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरील बीबीसीच्या वादग्रस्त माहितीपटाबद्दल बोलताना खार म्हणाल्या, "पाकिस्तानने आधीच जे सांगितले आहे ते त्यांनी जगाला दाखवले आहे. पाकिस्तानने इतिहासातून धडा घेतला आहे, मात्र या भागातील काही देशांनी शिकलेले नाही."

दरम्यान, मे महिन्यात शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन (SCO) परराष्ट्र मंत्री आणि मुख्य न्यायमूर्तींच्या गोव्यात बैठक होणार होती. त्या बैठकीला परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो झरदारी यांना उपस्थित राहण्यास मनाई केल्याचे वृत्त भारतीय माध्यमांनी दिले. त्यानंतर काही दिवसांतच हिना रब्बानी खार यांची ही टिप्पणी आली आहे. पाकिस्तानचे सरन्यायाधीश उमर अता बंदियाल यांना आमंत्रित केले.

एससीओ बैठकीचे यजमान म्हणून भारताने पाठवलेले निमंत्रण पाकिस्तानला मिळाले असून त्याचा आढावा घेत असल्याचे बलोच म्हणाल्या. बैठकीला उपस्थित राहण्याबाबत चर्चा करून निर्णय घेतला जाईल. भारतीय आमंत्रणावर मानक प्रक्रियेनुसार पावले उचलली जात आहेत आणि योग्य वेळी निर्णय घेतला जाईल. SCO ही एक महत्त्वाची आंतर-प्रादेशिक संघटना आहे, ज्याचा उद्देश सदस्य राष्ट्रांमधील आर्थिक संबंध आणि विविध क्षेत्रात सहकार्य मजबूत करणे आहे, हे बलोच यांनी अधोरेखित केले.

टॅग्स :Pakistanपाकिस्तानIndiaभारतNarendra Modiनरेंद्र मोदीPoliticsराजकारण