शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

ड्रॅगनची नवी चाल! अरुणाचल सीमेजवळ चीनने बांधला महामार्ग; भारताच्या सुरक्षेला मोठं आव्हान 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2021 06:49 IST

दोन किलोमीटरचा बोगदाही, हा महामार्ग बहुधा बाइबंग प्रांतात जाऊन संपतो. हा प्रांत अरुणाचल प्रदेशच्या बिशिंग गावाच्या सीमेजवळ आहे.

बीजिंग : गलवान खोऱ्यात गेल्यावर्षी झालेल्या हिंसक संघर्षानंतर सैन्य मागे घेतल्याचा दावा करणाऱ्या चीनने आता अरुणाचल प्रदेशच्या सीमेजवळ हालचालींना वेग दिला आहे. चीनने तिबेटच्या ईशान्येकडील दूर भागात महामार्ग बांधण्याचे काम पूर्ण केले आहे. हा भाग अरुणाचल प्रदेशच्या सीमेजवळ असून, भारताच्या सुरक्षेसाठी आव्हान बनू शकतो. या महामार्गावर दोन किलोमीटर लांब बोगदाही समाविष्ट आहे.

हा महामार्ग बहुधा बाइबंग प्रांतात जाऊन संपतो. हा प्रांत अरुणाचल प्रदेशच्या बिशिंग गावाच्या सीमेजवळ आहे. बिशिंग गाव अरुणाचल प्रदेशच्या गेलिंग सर्कलमध्ये मोडते. ते मॅकमोहन सीमेला स्पर्श करते. मॅकमोहन लाईन चीन आणि भारत यांच्यात प्रत्यक्ष सीमा चिन्हितकरते. चीन अरुणाचल प्रदेशला भारताचा भाग समजत नाही आणि तो दक्षिण तिबेटमध्ये मोडतो, असा दावा करतो.हा महामार्ग भारतासोबत प्रत्यक्ष नियंंत्रण रेषेजवळ (एलएसी) रस्ते आणि बोगद्यांच्या निर्मितीच्या चीनच्या महत्त्वाकांक्षी योजनांचा भाग आहे.  यामुळे चीनमधील दूर अंतरावरील भागही शहरे आणि विमानतळांशी जोडले जातील.

महामार्गामुळे काय परिणाम होणार?

महामार्ग सुरू झाल्यामुळे आता तिबेटचे शहरी भाग निंगची आणि सीमेला खेटून असलेले गाव यांच्यातील प्रवास फक्त आठ तासांचा असेल. असे समजले जाते की, चीनचा मोठ्या यारलुंग जांग्बो हायड्रो-पाॅवर प्रोजेक्टची योजना बनवण्यातही हा महामार्ग मोठी भूमिका पार पाडेल. तिबेटची यारलुंग जांग्बो नदी ही भारतात वाहून आल्यावर अरुणाचल प्रदेशमध्ये सियांग आणि आसाममध्ये ब्रह्मपुत्र नदी बनते. येथून ही नदी बांगलादेशात जाते.

टॅग्स :chinaचीनIndiaभारतArunachal Pradeshअरुणाचल प्रदेश