शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
2
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
3
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
4
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
5
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
6
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
7
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
8
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
9
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
10
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
11
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
12
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
13
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
14
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
15
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
16
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
17
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
18
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
19
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
20
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...

रोहिंग्यांची सर्वात जास्त संख्या जम्मू आणि काश्मीरमध्ये

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2017 12:39 IST

भारतामध्ये 40 हजार रोहिंग्या स्थलांतरित झालेले असून त्यातील 5700 रोहिंग्या जम्मू आणि काश्मीर राज्यात राहात असल्याची माहिती केंद्रीय गृहराज्यमंत्री किरेन रिजिजू यांनी दिली.

ठळक मुद्देरोहिंग्या म्यानमारमधील राखिने प्रांतातील असून तेथिल बौद्ध धर्मियांशी झालेल्या अंतर्गत वादानंतर त्यांनी म्यानमार सोडून जाण्यास सुरुवात केली.म्यानमारमध्ये 10 ते 13 लाख रोहिंग्या असावेत, त्यानंतर 4 लाख रोहिंग्या सोदी अरेबियात, 3 लाख बांगलादेशात, पाकिस्तानात 2 लाख, थायलंडमध्ये 1 लाख आणि मलेशियात 40 हजार रोहिंग्या आहेत.

नवी दिल्ली, दि.10- म्यानमारमधून भारतामध्ये 40 हजार रोहिंग्या स्थलांतरित झालेले असून जम्मू काश्मीर राज्यामध्ये सर्वात जास्त संख्येने रोहिंग्या राहात असल्याची माहिती केंद्रीय गृहराज्यमंत्री किरन रिजिजू यांनी दिली. रोहिंग्यांची संख्या दोन वर्षांमध्ये चौपटीने वाढल्याची माहितीही त्यांनी राज्यसभेत बोलताना दिली.

भारतामध्ये आलेल्या रोहिंग्यांबाबतीत बोलताना किरेन रिजीजू म्हणाले, गृहखात्याने सर्व राज्यांना आपल्या प्रदेशात बेकायदेशीररित्या राहणाऱ्या लोकांना परत पाठवण्यासाठी टास्क फोर्स स्थापन करण्याची सूचना केलेली आहे. गृहखात्याच्या माहितीनुसार सर्वात जास्त म्हणजे 5,700 रोहिंग्या जम्मू काश्मीरमध्ये राहात आहेत आणि त्यांची संख्या 10 हजारावर जाण्याची शक्यता आहे. त्यानंतर रोहिंग्यानी हरियाणा, दिल्ली, महाराष्ट्र, राजस्थान, उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश, मणिपूर येथे आश्रय घेतलेला आहे.

रोहिंग्या आणि बांगलादेशी यांच्यासाठी कोणत्याही प्रकारची निर्वासित छावणी स्थापन केली नसल्याचे स्पष्ट करुन रिजिजू म्हणाले, ओडिशा आणि तामिळनाडूमधील 107 छावण्या श्रीलंकेतून आलेल्या निर्वासितांसाठी असून इतरत्र तिबेटीयन नागरिकांसाठी छावण्या स्थापन करण्यात आलेल्या आहेत.

म्यानमारमध्ये उडालेल्या वांशिंक चकमकींनंतर रोहिंग्यांनी शेजारील देशांमध्ये स्थलांतरास सुरुवात केली. यामध्ये सर्वात प्रथम शेजारील बांगलादेशामध्ये जाण्याचा प्रयत्न केला. मात्र बांगलादेशानेही हात झटकल्यावर समुद्रमार्गाने रोहिंग्यांनी स्थलांतर सुरुच ठेवले. यातील बहुतांश रोहिंग्या थायलंड, मलेशिया, इंडोनेशियामध्ये स्थलांतरित झाले. मात्र रोहिंग्याला स्वीकारण्यासाठी कोणत्याच देशाने उत्सुकता दर्शवली नव्हती. कित्येक बोटींना किनाऱ्यावरती उतरण्यास मज्जावही करण्यात आला. त्यामुळे या देशाच्या किनाऱ्यापासून ते दुसऱ्या देशाच्या किनाऱ्यापर्यंत आसरा शोधण्यासाठी रोहिंग्यांचा पिंगपॉंग सुरु झाला. लहानशा बोटींवर शेकडो रोहिंग्या लादून त्यांना दुसऱ्या देशात पोहोचवणाऱ्या मानवी तस्करांनी यामध्ये रोहिंग्यांची लूटही केली. अन्न पाण्याविना समुद्रातच रोहिंग्यांना आपले प्राणही गमवावे लागले होते.

दोन वर्षांपुर्वी बंगालच्या उपसागरामध्ये भरकटलेल्या काही बोटींमधील रोहिंग्यांला भारतीय नौदल आणि संरक्षक दलांनी वाचवले होते. संयुक्त राष्ट्राने रोहिंग्यांच्या अवस्थेची गंभीर दखल घेऊन त्यांच्या मानवाधिकारांचे उल्लंघन झाल्याबद्दल म्यानमार सरकारविरोधात अहवालही तयार केला होता. मात्र म्यानमार सरकारने तो फेटाळून लावला.

रोहिंग्या कोण आहेत...रोहिंग्या म्यानमारमधील राखिने प्रांतातील असून तेथिल बौद्ध धर्मियांशी झालेल्या अंतर्गत वादानंतर त्यांनी म्यानमार सोडून जाण्यास सुरुवात केली. काही इतिहास अभ्यासकांच्या मते रोहिंग्या मुळचे राखिने प्रांतातीलच आहेत मात्र काही अभ्यासकांच्या मते ते बांगलादेश मुक्तीलढ्याच्या वेळेस बांगलादेशातून तेथे स्थायिक झाले असावेत. रोहिंग्यांमध्ये शिक्षणाचे प्रमाण अत्यल्प असून त्यांचे उत्पन्नही अत्यंत तुटपुंजे आहे. म्यानमार आणि बांगलादेशाने त्यांची जबाबदारी एकमेकांवर टाकण्यास सुरुवात झाल्यानंतर त्यांना कोणताच आसरा उरला नाही. मानवी तस्करांनी त्यांचा गैरफायदा घेऊन त्यांच्याकडून जबर पैसे उकळून धोकादायक मार्गांनी आग्नेय आशियातील देशांमध्ये पोहोचवण्यास सुरुवात केली. आजवरच्या आकडेवारीनुसार म्यानमारमध्ये 10 ते 13 लाख रोहिंग्या असावेत, त्यानंतर 4 लाख रोहिंग्या सोदी अरेबियात, 3 लाख बांगलादेशात, पाकिस्तानात 2 लाख, थायलंडमध्ये 1 लाख आणि मलेशियात 40 हजार रोहिंग्या आहेत.