शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

रोहिंग्यांची सर्वात जास्त संख्या जम्मू आणि काश्मीरमध्ये

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2017 12:39 IST

भारतामध्ये 40 हजार रोहिंग्या स्थलांतरित झालेले असून त्यातील 5700 रोहिंग्या जम्मू आणि काश्मीर राज्यात राहात असल्याची माहिती केंद्रीय गृहराज्यमंत्री किरेन रिजिजू यांनी दिली.

ठळक मुद्देरोहिंग्या म्यानमारमधील राखिने प्रांतातील असून तेथिल बौद्ध धर्मियांशी झालेल्या अंतर्गत वादानंतर त्यांनी म्यानमार सोडून जाण्यास सुरुवात केली.म्यानमारमध्ये 10 ते 13 लाख रोहिंग्या असावेत, त्यानंतर 4 लाख रोहिंग्या सोदी अरेबियात, 3 लाख बांगलादेशात, पाकिस्तानात 2 लाख, थायलंडमध्ये 1 लाख आणि मलेशियात 40 हजार रोहिंग्या आहेत.

नवी दिल्ली, दि.10- म्यानमारमधून भारतामध्ये 40 हजार रोहिंग्या स्थलांतरित झालेले असून जम्मू काश्मीर राज्यामध्ये सर्वात जास्त संख्येने रोहिंग्या राहात असल्याची माहिती केंद्रीय गृहराज्यमंत्री किरन रिजिजू यांनी दिली. रोहिंग्यांची संख्या दोन वर्षांमध्ये चौपटीने वाढल्याची माहितीही त्यांनी राज्यसभेत बोलताना दिली.

भारतामध्ये आलेल्या रोहिंग्यांबाबतीत बोलताना किरेन रिजीजू म्हणाले, गृहखात्याने सर्व राज्यांना आपल्या प्रदेशात बेकायदेशीररित्या राहणाऱ्या लोकांना परत पाठवण्यासाठी टास्क फोर्स स्थापन करण्याची सूचना केलेली आहे. गृहखात्याच्या माहितीनुसार सर्वात जास्त म्हणजे 5,700 रोहिंग्या जम्मू काश्मीरमध्ये राहात आहेत आणि त्यांची संख्या 10 हजारावर जाण्याची शक्यता आहे. त्यानंतर रोहिंग्यानी हरियाणा, दिल्ली, महाराष्ट्र, राजस्थान, उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश, मणिपूर येथे आश्रय घेतलेला आहे.

रोहिंग्या आणि बांगलादेशी यांच्यासाठी कोणत्याही प्रकारची निर्वासित छावणी स्थापन केली नसल्याचे स्पष्ट करुन रिजिजू म्हणाले, ओडिशा आणि तामिळनाडूमधील 107 छावण्या श्रीलंकेतून आलेल्या निर्वासितांसाठी असून इतरत्र तिबेटीयन नागरिकांसाठी छावण्या स्थापन करण्यात आलेल्या आहेत.

म्यानमारमध्ये उडालेल्या वांशिंक चकमकींनंतर रोहिंग्यांनी शेजारील देशांमध्ये स्थलांतरास सुरुवात केली. यामध्ये सर्वात प्रथम शेजारील बांगलादेशामध्ये जाण्याचा प्रयत्न केला. मात्र बांगलादेशानेही हात झटकल्यावर समुद्रमार्गाने रोहिंग्यांनी स्थलांतर सुरुच ठेवले. यातील बहुतांश रोहिंग्या थायलंड, मलेशिया, इंडोनेशियामध्ये स्थलांतरित झाले. मात्र रोहिंग्याला स्वीकारण्यासाठी कोणत्याच देशाने उत्सुकता दर्शवली नव्हती. कित्येक बोटींना किनाऱ्यावरती उतरण्यास मज्जावही करण्यात आला. त्यामुळे या देशाच्या किनाऱ्यापासून ते दुसऱ्या देशाच्या किनाऱ्यापर्यंत आसरा शोधण्यासाठी रोहिंग्यांचा पिंगपॉंग सुरु झाला. लहानशा बोटींवर शेकडो रोहिंग्या लादून त्यांना दुसऱ्या देशात पोहोचवणाऱ्या मानवी तस्करांनी यामध्ये रोहिंग्यांची लूटही केली. अन्न पाण्याविना समुद्रातच रोहिंग्यांना आपले प्राणही गमवावे लागले होते.

दोन वर्षांपुर्वी बंगालच्या उपसागरामध्ये भरकटलेल्या काही बोटींमधील रोहिंग्यांला भारतीय नौदल आणि संरक्षक दलांनी वाचवले होते. संयुक्त राष्ट्राने रोहिंग्यांच्या अवस्थेची गंभीर दखल घेऊन त्यांच्या मानवाधिकारांचे उल्लंघन झाल्याबद्दल म्यानमार सरकारविरोधात अहवालही तयार केला होता. मात्र म्यानमार सरकारने तो फेटाळून लावला.

रोहिंग्या कोण आहेत...रोहिंग्या म्यानमारमधील राखिने प्रांतातील असून तेथिल बौद्ध धर्मियांशी झालेल्या अंतर्गत वादानंतर त्यांनी म्यानमार सोडून जाण्यास सुरुवात केली. काही इतिहास अभ्यासकांच्या मते रोहिंग्या मुळचे राखिने प्रांतातीलच आहेत मात्र काही अभ्यासकांच्या मते ते बांगलादेश मुक्तीलढ्याच्या वेळेस बांगलादेशातून तेथे स्थायिक झाले असावेत. रोहिंग्यांमध्ये शिक्षणाचे प्रमाण अत्यल्प असून त्यांचे उत्पन्नही अत्यंत तुटपुंजे आहे. म्यानमार आणि बांगलादेशाने त्यांची जबाबदारी एकमेकांवर टाकण्यास सुरुवात झाल्यानंतर त्यांना कोणताच आसरा उरला नाही. मानवी तस्करांनी त्यांचा गैरफायदा घेऊन त्यांच्याकडून जबर पैसे उकळून धोकादायक मार्गांनी आग्नेय आशियातील देशांमध्ये पोहोचवण्यास सुरुवात केली. आजवरच्या आकडेवारीनुसार म्यानमारमध्ये 10 ते 13 लाख रोहिंग्या असावेत, त्यानंतर 4 लाख रोहिंग्या सोदी अरेबियात, 3 लाख बांगलादेशात, पाकिस्तानात 2 लाख, थायलंडमध्ये 1 लाख आणि मलेशियात 40 हजार रोहिंग्या आहेत.