शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातावर डीजीसीएचा मोठा निर्णय! सर्व बोईंग ड्रीमलाइनरची प्रत्येक उड्डाणापूर्वी तपासणी होणार
2
"आदमी खिलौना है" शेवटचं स्टेटस; अहमदाबाद विमान दुर्घटनेत हरियाणातील अंजू शर्मा यांचा दुर्दैवी अंत!
3
ज्याची होती चर्चा, तेच कारण समोर आलं...! राजाला का मारलं? सोनमनं सगळंच सांगून टाकलं; खरा मास्टरमाइंड आला समोर
4
मृतांचे क्लेम सेटलमेंट लवकर पूर्ण करणार; अहमदाबाद विमान अपघाताबाबत LIC चा मोठा निर्णय
5
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
6
वर्ल्ड बँकेकडून पाकिस्तानला ७०० मिलियन डॉलर्ची 'खैरात', भारताच्या विरोधानंतरही मिळाले कर्ज
7
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
8
कामाची बातमी! जितके किमी प्रवास, आता तितकाच भरा Toll; कसं काम करणार नवीन टोल पॉलिसी?
9
"तुम्ही एक कोटी देताय; मी एअर इंडियाला दोन कोटी देते, माझे वडील परत द्या"; बाप गमावला, मुलीच्या अश्रूंचा फुटला बांध
10
झापुक-झुपुक...! देशी कंपनीने एकाचवेळी दोन स्वस्त ५जी फोन लाँच केले, स्मार्टफोन मार्केटमध्ये अजून काय हवे...
11
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट', काय आहे याचा अर्थ?
12
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
13
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
14
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
15
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
16
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
17
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
18
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
19
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
20
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;

'तुमच्या पोकळ शब्दांनी आमची स्वप्नं आणि बालपण हिरावून घेतलं'

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2019 09:20 IST

संयुक्त राष्ट्र संघात हवामान बदल थांबवण्यासाठी हवामान कृती परिषद सुरू आहे.

ठळक मुद्देसंयुक्त राष्ट्र संघात हवामान बदल थांबवण्यासाठी हवामान कृती परिषद सुरू आहे.16 वर्षीय ग्रेटाने या परिषदेत आपला संताप व्यक्त केला पर्यावरण संवर्धनासंदर्भात तुमच्या पोकळ शब्दांनी आमची स्वप्नं आणि बालपण हिरावून घेतल्याचं तिने म्हटलं आहे. 

पर्यावरण कार्यकर्ती ग्रेटा थनबर्गने स्वीडनमधून पृथ्वीची विनाशाकडे होत असलेली वाटचाल रोखण्यासाठी काही तरी करा, अशी साद घातली आहे. तिचे हे आंदोलन आता जगभर पसरले असून, 20 सप्टेंबरपासून सात दिवस विविध देशांमध्ये ‘फ्रायडे फॉर फ्यूचर’चा जागर केला जात आहे. संयुक्त राष्ट्र संघात हवामान बदल थांबवण्यासाठी हवामान कृती परिषद सुरू आहे. 16 वर्षीय ग्रेटाने या परिषदेत आपला संताप व्यक्त केला आहे. पर्यावरण संवर्धनासंदर्भात तुमच्या पोकळ शब्दांनी आमची स्वप्नं आणि बालपण हिरावून घेतल्याचं तिने म्हटलं आहे. 

संयुक्त राष्ट्रांनी न्यूयॉर्क येथे हवामानातील बदलाच्या संकटावर मात करण्यासाठी हवामानविषयक परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह जगभरातील नेत्यांनी या परिषदेला हजेरी लावली. पर्यावरण कार्यकर्ती ग्रेटा थनबर्गने या परिषदेच्या सुरुवातीला आपली भूमिका मांडली. 'पर्यावरण संवर्धनासंदर्भात तुमच्या पोकळ शब्दांनी आमची स्वप्नं आणि बालपण हिरावून घेतलं. पण तरीही तुम्ही आशेने येता. तुमची हिंमत कशी होते?' असा प्रश्न ग्रेटाने जगभरातील नेत्यांना विचारला आहे. 

स्वीडनमधील ग्रेटाच्या ‘फ्रायडे फॉर फ्यूचर’च्या आवाहनाला प्रतिसाद देत महाराष्ट्रातील अनेक शाळकरी मुलांनी देखील रॅली काढून पर्यावरणाचा जागर केला आहे. या सात दिवसांच्या जागरात पहिल्याच दिवशी मुंबई, पुणे, औरंगाबाद आणि कोल्हापुरात अनेक शाळांनी सहभाग नोंदविला होता. हवामान बदलाच्या संकटाला गांभीर्याने न घेणाऱ्या प्रत्येकाने जागे व्हावे, अशी हाक या विद्यार्थ्यांनी दिली आहे. 

हवामान बदलाच्या संकटाचा मुकाबला करण्यासाठी जागतिक स्तरावर जनचळवळ उभी राहिली पाहिजे असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी (23 सप्टेंबर) म्हटले आहे. संयुक्त राष्ट्रांनी न्यूयॉर्क येथे आयोजित केलेल्या हवामानविषयक परिषदेत ते बोलत होते. पॅरिसमधील परिषदेत झालेल्या हवामानविषयक करारातील तरतुदींशी प्रामाणिक राहून भारताने 175 गिगावॅट इतके बिगरजीवाश्म इंधन उत्पादित करण्याचे लक्ष्य राखले आहे अशी घोषणा नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात केली होती. तो धागा पकडून मोदी म्हणाले की, बिगरजीवाश्म साधनांतून 2022 सालापर्यंत 175 गिगावॅट अपारंपारिक उर्जेची निर्मिती करण्यात येईल व हे प्रमाण कालांतराने 400 गिगावॅटपर्यंत वाढवण्यात येईल. नरेंद्र मोदी यांनी सांगितले की, हवामान बदलाच्या संकटावर मात करायची असेल तर त्यासाठी सध्या सुरू असलेले प्रयत्न तोकडे आहेत हे आपण आधी मान्य केले पाहिजे. चर्चा करण्याचे दिवस संपले, आता कृती करण्याची वेळ आली आहे.

 

टॅग्स :environmentपर्यावरणNarendra Modiनरेंद्र मोदी