शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणं युद्धासारखंच!
2
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
3
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
4
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
5
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
6
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
7
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
8
पहलगाम हल्ल्यानंतर भारतात होणारी मोठी स्पर्धा पुढे ढकलली
9
मायेची फुंकर! ब्रेकअप, स्ट्रेस, रागावर फक्त एकाच थेरपीने उपचार, उशी ठरतेय वेदनांवरची डॉक्टर
10
सलग ७ दिवसांच्या वाढीला ब्रेक! एफएमसीजी आणि रिअल्टीमुळे बाजार कोसळला; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
11
WhatsApp वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी! अ‍ॅडव्हान्स्ड चॅट प्रायव्हसी फीचर आले, कसे वापरायचे जाणून घ्या
12
मुंबई: 'लिव्ह इन पार्टनरने दिला गुलिगत धोका; ज्याच्यावर जडला जीव तोच सोन्याचे दागिने घेऊन फरार
13
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
14
दुसऱ्यांचा विनाश करणे हा धर्म नाही अधर्म आहे, शिक्षा झालीच पाहिजे - प्रेमानंद महाराज
15
‘पत्नीचे अनेक तरुणांशी अनैतिक संबंध, नशेच्या धुंदीत घालतात धिंगाणा, करतात अश्लील चाळे ’, पतीचे गंभीर आरोप, पुरावेही दिले   
16
'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका
17
संकटात कंपनी, गुंतवणकदार झाले कंगाल; ₹११२५ वरुन ₹९५ वर आला शेअर, सातत्यानं लोअर सर्किट
18
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...
19
जिद्द असावी तर अशी! अंगणवाडी ते IAS अधिकारी; ३ वेळा अपयश, मानली नाही हार, रचला इतिहास
20
सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताचा थेट पाकच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का! ३००० कोटींचे होणार नुकसान

"प्रत्येक थेंब आमचाच, आम्ही पूर्ण ताकदीने..."; भारताने सिंधू जल करार स्थगित केल्यानंतर पाकिस्तान बरळला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2025 16:49 IST

पहलगाम हल्ल्यानंतर भारताने सिंधू करारावर स्थगिती दिल्यानंतर पाकिस्तानाने आरोप सुरु केले आहेत.

Indus Waters Treaty suspend: जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारकडून सिंधू करारावर स्थगिती देण्यात आली आहे. बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या सुरक्षा समितीच्या दोन तासांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. सिंधू जल करार रद्द करण्यासह या बैठकीत पाच मोठे निर्णय घेण्यात आले. त्यामुळे या निर्णयांचा पाकिस्तानला मोठ्या प्रमाणात फटका बसण्याची शक्यता आहे. दुसरीकडे पाकिस्ताननेही या निर्णयावर प्रतिक्रिया देत इशारा दिला आहे. भारताने बेकायदेशीर पाऊल उचलल्याचे पाकिस्तानने म्हटलं आहे.

जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाममध्ये पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर सरकारने कठोर पाऊल उचलत पाकिस्तानला दणका दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत झालेल्या सुरक्षा विषयक कॅबिनेट समितीच्या बैठकीत केंद्र सरकारने १९६० चा सिंधू पाणी करारही स्थगित करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर आता सिंधू पाणी करार स्थगित करण्याच्या भारताच्या निर्णयाला पाकिस्तानने जलयुद्ध आणि बेकायदेशीर पाऊल म्हटलं आहे. या निर्णयाला कायदेशीर आव्हान देण्याचा निर्धार करत भारत जागतिक बँकेसारख्या जागतिक संघटनांशी संबंधित असलेल्या करारांमधून एकतर्फी माघार घेऊ शकत नाही, असं पाकिस्तानने म्हटलं.

पाकिस्तानचे ऊर्जा मंत्री अवैस लेघारी यांनी एक्स पोस्टवरुन भारतावर आरोप केले आहे. "सिंधू पाणी करार स्थगित करण्याचा भारताचा निर्णय हा एखाद्या जलयुद्धासारखा आहे. हे एक भ्याड आणि बेकायदेशीररित्या उचलेले पाऊल आहे. प्रत्येक थेंब आपला आहे आणि आम्ही आमच्या सर्व शक्तीनिशी त्याचे कायदेशीर, राजकीय आणि जागतिक स्तरावर संरक्षण करू," असे अवैस लेघारी यांनी म्हटलं.

दरम्यान, पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने देशाविरुद्ध केलेल्या कारवाईच्या विरोधात पाकिस्तानला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. पाकिस्तानस्थित लष्कर-ए-तोयबाची शाखा असलेल्या रेझिस्टन्स फ्रंटने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती. त्यानंतर भारताने अप्रत्यक्षपणे या हल्ल्यासाठी पाकिस्तानला जबाबदार धरत पाच महत्त्वाचे निर्णय घेतले.

टॅग्स :Pahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाPakistanपाकिस्तानNarendra Modiनरेंद्र मोदीTerrorismदहशतवादIndiaभारत