शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
6
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
7
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
8
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
9
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
10
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
11
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
12
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
13
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
14
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
15
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
16
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
17
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
18
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
19
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
20
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

नेपाळच्या पंतप्रधानांनंतर परराष्ट्रमंत्री बरळले, रामाच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह लावले, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2020 09:25 IST

नेपाळचे पंतप्रधान केपी ओली यांनी भगवान श्रीराम हे भारतातील नसून नेपाळचे असल्याचे तसेच भारतातील अयोध्या ही नकली असल्याचे विधान करून वादाला तोंड फोडल्यानंतर आता नेपाळच्या परराष्ट्र मंत्र्यांनी थेट रामाच्या ऐतिहासिक अस्तित्वाबाबतच प्रश्चचिन्ह उपस्थित केले आहे.

ठळक मुद्देरामायणकालीन संस्कृतीबाबत अजूनही नेपाळ आणि भारतात अभ्यास सुरू आहेरामायणाच्या पौराणिक अस्तित्वाला दुजोरा देणारे पुरेसे पुरावे सध्यातरी आपल्याकडे नाहीत केवळ विश्वासाच्या आधारावर आपण रामासंबंधीच्या सर्व गोष्टींना मानत आलो आहोत

काठमांडू - हजारो वर्षांपासून भारताशी सांस्कृतिकदृष्ट्या जोडल्या गेलेल्या नेपाळमध्ये सध्या भारतविरोध कमालीचा तीव्र होताना दिसून येत आहेत. त्यामुळेच भारतापासून राजकीय दृष्ट्या दूर जात असतानाचा नेपाळमधील नेते भारत आणि नेपाळमध्ये असलेले समान सांस्कृतिक नातेही तोडण्याच्या प्रयत्नात दिसत आहेत. परवा नेपाळचे पंतप्रधान केपी ओली यांनी भगवान श्रीराम हे भारतातील नसून नेपाळचे असल्याचे तसेच भारतातील अयोध्या ही नकली असल्याचे विधान करून वादाला तोंड फोडल्यानंतर आता नेपाळच्या परराष्ट्र मंत्र्यांनी थेट रामाच्या ऐतिहासिक अस्तित्वाबाबतच प्रश्चचिन्ह उपस्थित केले आहे.

पंतप्रधान के. पी. ओली यांनी केलेल्या विधानाचा बचाव करताना नेपाळचे परराष्ट्रमंत्री प्रदीप ज्ञावली म्हणाले की, ‘’रामायणकालीन संस्कृतीबाबत अजूनही नेपाळ आणि भारतात अभ्यास सुरू आहे. आतापर्यंत केवळ विश्वासाच्या आधारावर आपण रामासंबंधीच्या सर्व गोष्टींना मानत आलो आहोत.’’

‘’जिथपर्यंत मला माहिती आहे त्यानुसार रामायणाच्या पौराणिक अस्तित्वाला दुजोरा देणारे पुरेसे पुरावे सध्यातरी आपल्याकडे नाहीत. आतापर्यंत केवळ पारंपरिक विश्वासाच्या आधारावर आपण सांगतो की, सीतेचा जन्म जनकपूर येथे झाला होता आणि तिचा विवाह रामासोबत अयोध्येत झाला होता.’’असे ज्ञावली यांनी सांगितले.

‘’आपल्याला हे सांगण्यात आले की, सीतेचा जन्म जनकपूर येथे झाला आणि रामाचा जन्म अयोध्येत झाला. मात्र ज्यावेळी संशोधनातून काही वेळगे पुरावे समोर येतील तेव्हा रामायणाचा इतिहासच बदलणार आहे. सध्यातरी या गोष्टी लोकांच्या भावनेशी जोडल्या गेलेल्या आहेत. त्यामुळे याबबत फार काही बोलणे योग्य ठरणार नाही,’’असेही त्यांनी सांगितले.

रामायणकाळात चर्चेत राहिलेली ठिकाणे कुठे कुठे आहेत यावर दोन्ही देशांमध्ये चर्चा सुरू आहे. त्याचा सांस्कृतिक भूगोलाला अंतिम रूप देण्याची गरज आहे. ज्याप्रमाणे बुद्धकाळाबाबत आपल्याकडे लिखीत आणि अन्य आधारावर पुष्टी करणारे पुरावे आहेत, त्याप्रमाणे रामायणाचे पुरावे नाहीत, असा दावाही ज्ञावली यांनी केला.  

इतर महत्त्वाच्या बातम्या 

…म्हणून भारतातील दहा पैकी तीन कोरोना रुग्ण करू शकत नाहीत प्लाझ्मा दान

गेल्या सहा महिन्यांत कोरोनाबाबत तज्ज्ञांना मिळाली ही महत्त्वाची माहिती, लस आणि हर्ड इम्युनिटीबाबत मिळाले असे संकेत…

'सोनेरी' हॉटेल; दारं-खिडक्याच काय, टॉयलेटसुद्धा सोन्याचं! अशा आहेत सुख-सुविधा...

टॅग्स :ramayanरामायणAyodhyaअयोध्याIndiaभारतNepalनेपाळHinduismहिंदुइझम