शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

नेपाळच्या पंतप्रधानांनंतर परराष्ट्रमंत्री बरळले, रामाच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह लावले, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2020 09:25 IST

नेपाळचे पंतप्रधान केपी ओली यांनी भगवान श्रीराम हे भारतातील नसून नेपाळचे असल्याचे तसेच भारतातील अयोध्या ही नकली असल्याचे विधान करून वादाला तोंड फोडल्यानंतर आता नेपाळच्या परराष्ट्र मंत्र्यांनी थेट रामाच्या ऐतिहासिक अस्तित्वाबाबतच प्रश्चचिन्ह उपस्थित केले आहे.

ठळक मुद्देरामायणकालीन संस्कृतीबाबत अजूनही नेपाळ आणि भारतात अभ्यास सुरू आहेरामायणाच्या पौराणिक अस्तित्वाला दुजोरा देणारे पुरेसे पुरावे सध्यातरी आपल्याकडे नाहीत केवळ विश्वासाच्या आधारावर आपण रामासंबंधीच्या सर्व गोष्टींना मानत आलो आहोत

काठमांडू - हजारो वर्षांपासून भारताशी सांस्कृतिकदृष्ट्या जोडल्या गेलेल्या नेपाळमध्ये सध्या भारतविरोध कमालीचा तीव्र होताना दिसून येत आहेत. त्यामुळेच भारतापासून राजकीय दृष्ट्या दूर जात असतानाचा नेपाळमधील नेते भारत आणि नेपाळमध्ये असलेले समान सांस्कृतिक नातेही तोडण्याच्या प्रयत्नात दिसत आहेत. परवा नेपाळचे पंतप्रधान केपी ओली यांनी भगवान श्रीराम हे भारतातील नसून नेपाळचे असल्याचे तसेच भारतातील अयोध्या ही नकली असल्याचे विधान करून वादाला तोंड फोडल्यानंतर आता नेपाळच्या परराष्ट्र मंत्र्यांनी थेट रामाच्या ऐतिहासिक अस्तित्वाबाबतच प्रश्चचिन्ह उपस्थित केले आहे.

पंतप्रधान के. पी. ओली यांनी केलेल्या विधानाचा बचाव करताना नेपाळचे परराष्ट्रमंत्री प्रदीप ज्ञावली म्हणाले की, ‘’रामायणकालीन संस्कृतीबाबत अजूनही नेपाळ आणि भारतात अभ्यास सुरू आहे. आतापर्यंत केवळ विश्वासाच्या आधारावर आपण रामासंबंधीच्या सर्व गोष्टींना मानत आलो आहोत.’’

‘’जिथपर्यंत मला माहिती आहे त्यानुसार रामायणाच्या पौराणिक अस्तित्वाला दुजोरा देणारे पुरेसे पुरावे सध्यातरी आपल्याकडे नाहीत. आतापर्यंत केवळ पारंपरिक विश्वासाच्या आधारावर आपण सांगतो की, सीतेचा जन्म जनकपूर येथे झाला होता आणि तिचा विवाह रामासोबत अयोध्येत झाला होता.’’असे ज्ञावली यांनी सांगितले.

‘’आपल्याला हे सांगण्यात आले की, सीतेचा जन्म जनकपूर येथे झाला आणि रामाचा जन्म अयोध्येत झाला. मात्र ज्यावेळी संशोधनातून काही वेळगे पुरावे समोर येतील तेव्हा रामायणाचा इतिहासच बदलणार आहे. सध्यातरी या गोष्टी लोकांच्या भावनेशी जोडल्या गेलेल्या आहेत. त्यामुळे याबबत फार काही बोलणे योग्य ठरणार नाही,’’असेही त्यांनी सांगितले.

रामायणकाळात चर्चेत राहिलेली ठिकाणे कुठे कुठे आहेत यावर दोन्ही देशांमध्ये चर्चा सुरू आहे. त्याचा सांस्कृतिक भूगोलाला अंतिम रूप देण्याची गरज आहे. ज्याप्रमाणे बुद्धकाळाबाबत आपल्याकडे लिखीत आणि अन्य आधारावर पुष्टी करणारे पुरावे आहेत, त्याप्रमाणे रामायणाचे पुरावे नाहीत, असा दावाही ज्ञावली यांनी केला.  

इतर महत्त्वाच्या बातम्या 

…म्हणून भारतातील दहा पैकी तीन कोरोना रुग्ण करू शकत नाहीत प्लाझ्मा दान

गेल्या सहा महिन्यांत कोरोनाबाबत तज्ज्ञांना मिळाली ही महत्त्वाची माहिती, लस आणि हर्ड इम्युनिटीबाबत मिळाले असे संकेत…

'सोनेरी' हॉटेल; दारं-खिडक्याच काय, टॉयलेटसुद्धा सोन्याचं! अशा आहेत सुख-सुविधा...

टॅग्स :ramayanरामायणAyodhyaअयोध्याIndiaभारतNepalनेपाळHinduismहिंदुइझम