शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचा कर्णधार दहशतवाद्यांना, मसूद अझहरला मॅच फी दान करणार; तशी घोषणाच केली...
2
भारतीय सैन्य अन् पहलगाम हल्ल्यातील पीडित कुटुंबांना सर्व मॅचची फी देणार; सूर्यकुमार यादवची घोषणा
3
संतापजनक! आधी मारहाण, नंतर शाळेच्या खिडकीला उलटे टांगले; ७ वर्षाच्या मुलावर क्रूरता
4
'४ वर्षांपूर्वीपासून...', सोनम वांगचुकच्या पाकिस्तान कनेक्शनवर त्याची पत्नी गीतांजली वांगचुक काय म्हणाल्या?
5
सोशल मीडियावरील ती पोस्ट! ...अन् टीम इंडियानं अख्ख्या जगासमोर घेतला पाक मंत्र्याचा बदला
6
तुमची मुलगी म्हणेल Thank You! या ६ बेस्ट स्कीम्स देतील जबरदस्त नफा, ५ नंबरच्या स्कीमनं तर पक्कं होईल तिचं भविष्य सुरक्षित
7
IND vs Pak: "अभिषेक बच्चन चांगला खेळलास", भारताने आशिया कप जिंकल्यानंतर बिग बींचा शोएब अख्तरला टोला
8
IND vs PAK Asia Cup Final : पाकिस्तानने आशिया कप ट्रॉफीसह टीम इंडियाची पदके चोरली, बीसीसीआयचा मोठा आरोप
9
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
10
"आता प्रायश्चित्त घेण्याची वेळ, दसरा मेळावा रद्द करून..."; भाजपाची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका
11
भारताचा आशिया चषकावर विजयी 'तिलक'; पाकिस्तानला सलग तिसऱ्यांदा नमवले! कुलदीप, तिलक यांचे मोलाचे योगदान
12
आजचे राशीभविष्य, २९ सप्टेंबर २०२५: महत्वाच्या कामासाठी खर्च झाला तरी सुद्धा आर्थिक लाभ होतील
13
पंधरा दिवसांत ६०% जास्त पाऊस! मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील चित्रच बदलले; आजही ६ जिल्ह्यांतऑरेंज अलर्ट
14
महिलांची सक्तीनं नसबंदी; ६० वर्षांनी माफी! ग्रीनलँडमध्ये ४५०० महिलांसोबत काय घडलेलं?
15
मोबाइलसारखीच लवकरच  बदलता येईल गॅसची कंपनी; काय बदल होणार? जाणून घ्या
16
आता पूर ओसरेल, मदत मिळेल... पण शेतकऱ्यांसमोर ३ वर्षे संकट! पुराने पळविले जमिनीचे पोषण, पुढील हंगामात धोका
17
विजयसाठी झुंबड ठरली जीवघेणी; तामिळनाडूच्या चेंगराचेंगरीतील मृतांची संख्या ४०वर
18
घोडबंदर मार्गावर रस्त्यांची कामं सुरू; मुंबईत जाताना ठाण्यात वाहतूककाेंडीची ‘शिक्षा’
19
थंडगार वाळवंटात ही आग कुणी लावली? केंद्र सरकारशी बोलणी सुरू असतानाही हिंसाचार का?
20
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?

आशियातील 'हे' पाच देश सर्वाधिक प्लास्टिक कचरा समुद्रात टाकतात

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2018 17:04 IST

प्लास्टिक कचऱ्यामुळे प्रदूषणाची समस्या गंभीर

न्यू यॉर्क- आशिया खंडातील पाच देशांमध्ये होणारा प्लास्टिकचा कचरा महासागरांमध्ये मोठ्या प्रमाणात प्रदूषण निर्माण करत आहेत. इंडोनेशियातील सित्रम नदीमध्ये टाकण्यात आलेल्या कचऱ्यामुळे ही नदी ओळखण्याच्या पलीकडे गेली आहे. जगातील सर्वात प्रदूषित नदी म्हणून ती ओळखली जात आहे. या नदीवर प्लास्टिकचा एक थरच निर्माण झाल्यामुळे हे प्लास्टिक काढण्यासाठी थेट लष्कराला पाचारण करण्यात आले आहे. याबाबत विविध माध्यमांनी बातम्या प्रसिद्ध केल्या आहेत. ग्रीन अर्थ या संस्थेच्या माहितीनुसार हाँगकाँगमध्ये एका दिवसात 52 लाख पाण्याच्या प्लास्टिक बाटल्या वापरल्या जातात.आशियामधील चीन, इंडोनेशिया, फिलिपाइन्स, थायलंड आणि व्हिएतनाम सध्या मोठ्या प्रमाणात प्लास्टिक महासागरांमध्ये टाकत आहेत. या पाच देशांनी महासागरात फेकलेल्या प्लास्टिक कचऱ्याचे प्रमाण हे जगातील इतर देशांच्या एकत्रित कचऱ्यापेक्षा जास्त आहे असे ओशन कॉन्झर्वन्सीने प्रकाशित केलेल्या अहवालात म्हटले आहे. अर्थात प्लास्टिकचा प्रश्न जगभरातील सर्वच देशांना भेडसावत आहे. अमेरिकेने 3.36 कोटी टन प्लास्टिक कचऱ्याची निर्मिती केली आणि त्यातील केवळ 9.5 टक्के प्लास्टिक कचऱ्याचेच पुनर्चक्रीकरण करण्यात आले.प्लास्टिकच्या कचऱ्यामुळे केवळ सागरी जीवच मरतात असे नाही असे नाही तर त्यातून बाहेर पडणारी विषद्रव्ये मासे खाणाऱ्या लोकांच्याही पोटात जातात. इतक्या प्रदुषणाने सागरी जीवन धोक्यात आले असले तरी प्लास्टिकचा  वापर कमी केल्यामुळे या परिस्थितीत सुधारणा होऊ शकते असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.  

टॅग्स :pollutionप्रदूषण