शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

आशियातील 'हे' पाच देश सर्वाधिक प्लास्टिक कचरा समुद्रात टाकतात

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2018 17:04 IST

प्लास्टिक कचऱ्यामुळे प्रदूषणाची समस्या गंभीर

न्यू यॉर्क- आशिया खंडातील पाच देशांमध्ये होणारा प्लास्टिकचा कचरा महासागरांमध्ये मोठ्या प्रमाणात प्रदूषण निर्माण करत आहेत. इंडोनेशियातील सित्रम नदीमध्ये टाकण्यात आलेल्या कचऱ्यामुळे ही नदी ओळखण्याच्या पलीकडे गेली आहे. जगातील सर्वात प्रदूषित नदी म्हणून ती ओळखली जात आहे. या नदीवर प्लास्टिकचा एक थरच निर्माण झाल्यामुळे हे प्लास्टिक काढण्यासाठी थेट लष्कराला पाचारण करण्यात आले आहे. याबाबत विविध माध्यमांनी बातम्या प्रसिद्ध केल्या आहेत. ग्रीन अर्थ या संस्थेच्या माहितीनुसार हाँगकाँगमध्ये एका दिवसात 52 लाख पाण्याच्या प्लास्टिक बाटल्या वापरल्या जातात.आशियामधील चीन, इंडोनेशिया, फिलिपाइन्स, थायलंड आणि व्हिएतनाम सध्या मोठ्या प्रमाणात प्लास्टिक महासागरांमध्ये टाकत आहेत. या पाच देशांनी महासागरात फेकलेल्या प्लास्टिक कचऱ्याचे प्रमाण हे जगातील इतर देशांच्या एकत्रित कचऱ्यापेक्षा जास्त आहे असे ओशन कॉन्झर्वन्सीने प्रकाशित केलेल्या अहवालात म्हटले आहे. अर्थात प्लास्टिकचा प्रश्न जगभरातील सर्वच देशांना भेडसावत आहे. अमेरिकेने 3.36 कोटी टन प्लास्टिक कचऱ्याची निर्मिती केली आणि त्यातील केवळ 9.5 टक्के प्लास्टिक कचऱ्याचेच पुनर्चक्रीकरण करण्यात आले.प्लास्टिकच्या कचऱ्यामुळे केवळ सागरी जीवच मरतात असे नाही असे नाही तर त्यातून बाहेर पडणारी विषद्रव्ये मासे खाणाऱ्या लोकांच्याही पोटात जातात. इतक्या प्रदुषणाने सागरी जीवन धोक्यात आले असले तरी प्लास्टिकचा  वापर कमी केल्यामुळे या परिस्थितीत सुधारणा होऊ शकते असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.  

टॅग्स :pollutionप्रदूषण