शहरं
Join us  
Trending Stories
1
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
2
Maharashtra Rain: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
3
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
4
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
5
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
6
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
7
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
8
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
9
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
10
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
11
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
12
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
13
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
14
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
15
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
16
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
17
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!
18
...तर मी ट्रेनमधून पडून मेलो असतो; एक चूक अन् आयुष्य संपलं असतं, 'मुरांबा'मधील अभिनेत्याने सांगितला धक्कादायक प्रसंग
19
महिन्याला ३० हजार कमावणारेही होऊ शकतात कोट्यधीश, 'अशी' करू शकता गुंतवणूक
20
Black Box: अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले

CoronaVirus: भारताची आरोग्य व्यवस्था कोलमडली, पण निवडणुकाही अटळ; एस. जयशंकर यांची कबुली

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2021 20:05 IST

CoronaVirus: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे भारताची आरोग्य व्यवस्था कोलमडली, अशी कबुली देत दुसरीकडे निवडणुकाही अटळ होत्या, असे मत भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी व्यक्त केले आहे.

ठळक मुद्देनिवडणुका अटळ, रोखू शकत नाहीआरोग्य व्यवस्था कोलमडलीपरकीय मदतीबाबत आभार - जयशंकर

लंडन: देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे गंभीर परिणाम दिसत आहेत. कोरोनाबाधितांची संख्या वाढत असून, कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाणही वाढत चालले आहे. कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे ऑक्सिजन, रेमडेसिवीर इंजेक्शन, बेड्स, कोरोना लसींचा मोठा तुडवटा जाणवू लागला आहे. मात्र, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे भारताची आरोग्य व्यवस्था कोलमडली, अशी कबुली देत दुसरीकडे निवडणुकाही अटळ होत्या, असे मत भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी व्यक्त केले आहे. (external minister s jaishankar says we realize that the world is with us)

जी-७ देशांच्या एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी लंडन येथे गेले असून, कोरोनाची दुसरी लाट एक मोठे आव्हान असल्याचे जयशंकर यांनी नमूद केले. जागतिक पातळीवरून कोरोना संकटात मिळत असलेल्या सहकार्याबद्दल कौतुक करत या संकटाच्या काळात संपूर्ण जग भारतासोबत असल्याची जाणीव आम्हांला आहे, असे जयशंकर यांनी सांगितले. 

“परदेशातून आलेल्या मदतीचे पुढे काय झाले?” राहुल गांधींचा केंद्राला थेट सवाल

निवडणुका अटळ, रोखू शकत नाही

भारतात पाच राज्यांत विधानसभा निवडणुका घेण्यात आल्या. यामुळे कोरोनाचा कहर वाढल्याचा आरोप केला जात आहे. यासंदर्भात जयशंकर यांनी भाष्य केले. निवडणुका अटळ आहेत. भारत एक लोकशाही मानणारा देश आहे. लोकशाहीमध्ये निवडणुका नाही, असे होऊ शकत नाही, असे जयशंकर यांनी स्पष्ट केले. 

आरोग्य व्यवस्था कोलमडली

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे भारताची आरोग्य व्यवस्था कोलमडली आहे. कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी लसीकरणावर भर दिला जात आहे. यातून मार्ग काढण्याचा सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. जागतिक स्तरावरील अनेक देश या परिस्थितीतून गेले आहेत. मात्र, ती वेळ आता भारतावर आली आहे, असे जयशंकर यांनी सांगितले. 

देवदूत! पंक्चर काढणाऱ्याने ६० वर्षीय नागरिकाने दिले ९० ऑक्सिजन सिलेंडर; रुग्णांना दिलासा  

परकीय मदतीबाबत आभार

ब्रिटन, अमेरिका, आखाती देशांनी भारताला वैद्यकीय तसेच अन्य गोष्टींमध्ये अत्यंत उपयुक्त मदत केली, याबाबत सर्व देशांचा भारत आभारी आहे. कोरोनासारख्या जागतिक महामारीच्या पार्श्वभूमीवर हे महत्त्वाचे असून, यामुळे वैचारिक पातळी आणि विचारांमध्ये नक्कीच बदल घडेल, असा विश्वास जयशंकर यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.   

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसS. Jaishankarएस. जयशंकर