शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
2
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
3
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
4
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
5
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
6
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
7
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
8
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
9
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
10
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
11
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
12
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
13
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
14
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
15
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
16
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
17
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
18
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
19
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
20
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  

CoronaVirus: भारताची आरोग्य व्यवस्था कोलमडली, पण निवडणुकाही अटळ; एस. जयशंकर यांची कबुली

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2021 20:05 IST

CoronaVirus: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे भारताची आरोग्य व्यवस्था कोलमडली, अशी कबुली देत दुसरीकडे निवडणुकाही अटळ होत्या, असे मत भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी व्यक्त केले आहे.

ठळक मुद्देनिवडणुका अटळ, रोखू शकत नाहीआरोग्य व्यवस्था कोलमडलीपरकीय मदतीबाबत आभार - जयशंकर

लंडन: देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे गंभीर परिणाम दिसत आहेत. कोरोनाबाधितांची संख्या वाढत असून, कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाणही वाढत चालले आहे. कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे ऑक्सिजन, रेमडेसिवीर इंजेक्शन, बेड्स, कोरोना लसींचा मोठा तुडवटा जाणवू लागला आहे. मात्र, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे भारताची आरोग्य व्यवस्था कोलमडली, अशी कबुली देत दुसरीकडे निवडणुकाही अटळ होत्या, असे मत भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी व्यक्त केले आहे. (external minister s jaishankar says we realize that the world is with us)

जी-७ देशांच्या एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी लंडन येथे गेले असून, कोरोनाची दुसरी लाट एक मोठे आव्हान असल्याचे जयशंकर यांनी नमूद केले. जागतिक पातळीवरून कोरोना संकटात मिळत असलेल्या सहकार्याबद्दल कौतुक करत या संकटाच्या काळात संपूर्ण जग भारतासोबत असल्याची जाणीव आम्हांला आहे, असे जयशंकर यांनी सांगितले. 

“परदेशातून आलेल्या मदतीचे पुढे काय झाले?” राहुल गांधींचा केंद्राला थेट सवाल

निवडणुका अटळ, रोखू शकत नाही

भारतात पाच राज्यांत विधानसभा निवडणुका घेण्यात आल्या. यामुळे कोरोनाचा कहर वाढल्याचा आरोप केला जात आहे. यासंदर्भात जयशंकर यांनी भाष्य केले. निवडणुका अटळ आहेत. भारत एक लोकशाही मानणारा देश आहे. लोकशाहीमध्ये निवडणुका नाही, असे होऊ शकत नाही, असे जयशंकर यांनी स्पष्ट केले. 

आरोग्य व्यवस्था कोलमडली

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे भारताची आरोग्य व्यवस्था कोलमडली आहे. कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी लसीकरणावर भर दिला जात आहे. यातून मार्ग काढण्याचा सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. जागतिक स्तरावरील अनेक देश या परिस्थितीतून गेले आहेत. मात्र, ती वेळ आता भारतावर आली आहे, असे जयशंकर यांनी सांगितले. 

देवदूत! पंक्चर काढणाऱ्याने ६० वर्षीय नागरिकाने दिले ९० ऑक्सिजन सिलेंडर; रुग्णांना दिलासा  

परकीय मदतीबाबत आभार

ब्रिटन, अमेरिका, आखाती देशांनी भारताला वैद्यकीय तसेच अन्य गोष्टींमध्ये अत्यंत उपयुक्त मदत केली, याबाबत सर्व देशांचा भारत आभारी आहे. कोरोनासारख्या जागतिक महामारीच्या पार्श्वभूमीवर हे महत्त्वाचे असून, यामुळे वैचारिक पातळी आणि विचारांमध्ये नक्कीच बदल घडेल, असा विश्वास जयशंकर यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.   

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसS. Jaishankarएस. जयशंकर