शहरं
Join us  
Trending Stories
1
हिमाचल प्रदेश: बिलासपूरमध्ये बसवर डोंगराचा ढिगारा कोसळला, १५ जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरू
2
निलेश घायवळचा पाय खोलात;बनावट पासपोर्ट प्रकरणासह आतापर्यंत ४ गुन्हे दाखल
3
Dharashiv: मोठी बातमी! तातडीने मदत द्या, मागणी करणाऱ्या आंदोलक शेतकऱ्यांवर गुन्हे!
4
Bigg Bossचं घर सील, सर्व स्पर्धकांना लवकरच काढणार बाहेर, समोर आलं असं कारण 
5
ICC Womens World Cup 2025 : हेदर नाइटचा हिट शो! इंग्लंडनं बांगलादेशला पराभूत करत भारताला दिला धक्का
6
कस्तुरबा रुग्णालयातील पुस्तक वाटप प्रकरणाला वेगळं वळण, किशोरी पेडणेकरांचा तक्रारदारालाच प्रतिप्रश्न, म्हणाल्या...
7
धक्कादायक!! विरारमध्ये दोन तरूणांनी एकत्र संपवलं जीवन, १८व्या मजल्यावरून मारली उडी
8
अभिषेक शर्मा ICC पुरस्काराच्या शर्यतीत; त्याला कुलदीपसह झिम्बाब्वेचा गडी देणार टक्कर!
9
भर वर्गात महिलेसोबत आक्षेपार्ह चाळे करताना सापडला शिक्षक, मुलांनी रेकॉर्डे केला व्हिडीओ, कुठे घडली घटना
10
...अन् रागाच्या भरात पृथ्वी शॉनं विकेट घेणाऱ्या मुशीर खानवर उगारली बॅट; नेमकं काय घडलं? (VIDEO)
11
मार्कशीटवर दिसले स्वीमीजी... विद्यार्थ्याने ऑनलाइन केला अर्ज, विद्यापीठाने घातला वेगळाच घोळ
12
सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या प्रकरणाचा ठाण्यात निषेध, मूक निदर्शने
13
६८ कोटींचा रस्ता ३ वर्षांपासून पूर्ण होईना; कल्याण-अंबरनाथ रस्त्याच्या कामाला अखेर मुहूर्त
14
सांगलीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का; आमदार पुत्राचा थेट भाजपमध्ये प्रवेश
15
पुणे अपघात प्रकरण: गौतमी पाटीलला अश्रू अनावर, म्हणाली- "सगळे मला ट्रोल करत सुटलेत..."
16
Navi Mumbai Airport: भव्य, दिव्य अन् नजर खिळवून ठेवणारं, पण नवी मुंबई विमानतळाबद्दल 'या' गोष्टी माहिती आहे का?
17
स्मृती मानधना फ्लॉप ठरली तरी टॉपला; आता चुका सुधारून हिट शो द्यावाच लागेल, नाहीतर...
18
ICU मध्ये असलेल्या भाजप खासदाराची ममता बॅनर्जींनी घेतली भेट; म्हणाल्या, "जास्त सीरियस नाहीये."
19
अहो आश्चर्यम! महिलेने कुत्र्याच्या नावाने केलं मतदान; पोलखोल होताच पोलीसही झाले हैराण
20
₹450 कोटींचा बंगला अन् ₹639 कोटींचा डुप्लेक्स..; धनकुबेरांना आकर्षित करतेय वरळी 'सी फेस'

CoronaVirus: भारताची आरोग्य व्यवस्था कोलमडली, पण निवडणुकाही अटळ; एस. जयशंकर यांची कबुली

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2021 20:05 IST

CoronaVirus: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे भारताची आरोग्य व्यवस्था कोलमडली, अशी कबुली देत दुसरीकडे निवडणुकाही अटळ होत्या, असे मत भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी व्यक्त केले आहे.

ठळक मुद्देनिवडणुका अटळ, रोखू शकत नाहीआरोग्य व्यवस्था कोलमडलीपरकीय मदतीबाबत आभार - जयशंकर

लंडन: देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे गंभीर परिणाम दिसत आहेत. कोरोनाबाधितांची संख्या वाढत असून, कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाणही वाढत चालले आहे. कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे ऑक्सिजन, रेमडेसिवीर इंजेक्शन, बेड्स, कोरोना लसींचा मोठा तुडवटा जाणवू लागला आहे. मात्र, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे भारताची आरोग्य व्यवस्था कोलमडली, अशी कबुली देत दुसरीकडे निवडणुकाही अटळ होत्या, असे मत भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी व्यक्त केले आहे. (external minister s jaishankar says we realize that the world is with us)

जी-७ देशांच्या एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी लंडन येथे गेले असून, कोरोनाची दुसरी लाट एक मोठे आव्हान असल्याचे जयशंकर यांनी नमूद केले. जागतिक पातळीवरून कोरोना संकटात मिळत असलेल्या सहकार्याबद्दल कौतुक करत या संकटाच्या काळात संपूर्ण जग भारतासोबत असल्याची जाणीव आम्हांला आहे, असे जयशंकर यांनी सांगितले. 

“परदेशातून आलेल्या मदतीचे पुढे काय झाले?” राहुल गांधींचा केंद्राला थेट सवाल

निवडणुका अटळ, रोखू शकत नाही

भारतात पाच राज्यांत विधानसभा निवडणुका घेण्यात आल्या. यामुळे कोरोनाचा कहर वाढल्याचा आरोप केला जात आहे. यासंदर्भात जयशंकर यांनी भाष्य केले. निवडणुका अटळ आहेत. भारत एक लोकशाही मानणारा देश आहे. लोकशाहीमध्ये निवडणुका नाही, असे होऊ शकत नाही, असे जयशंकर यांनी स्पष्ट केले. 

आरोग्य व्यवस्था कोलमडली

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे भारताची आरोग्य व्यवस्था कोलमडली आहे. कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी लसीकरणावर भर दिला जात आहे. यातून मार्ग काढण्याचा सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. जागतिक स्तरावरील अनेक देश या परिस्थितीतून गेले आहेत. मात्र, ती वेळ आता भारतावर आली आहे, असे जयशंकर यांनी सांगितले. 

देवदूत! पंक्चर काढणाऱ्याने ६० वर्षीय नागरिकाने दिले ९० ऑक्सिजन सिलेंडर; रुग्णांना दिलासा  

परकीय मदतीबाबत आभार

ब्रिटन, अमेरिका, आखाती देशांनी भारताला वैद्यकीय तसेच अन्य गोष्टींमध्ये अत्यंत उपयुक्त मदत केली, याबाबत सर्व देशांचा भारत आभारी आहे. कोरोनासारख्या जागतिक महामारीच्या पार्श्वभूमीवर हे महत्त्वाचे असून, यामुळे वैचारिक पातळी आणि विचारांमध्ये नक्कीच बदल घडेल, असा विश्वास जयशंकर यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.   

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसS. Jaishankarएस. जयशंकर