शहरं
Join us  
Trending Stories
1
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
2
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
3
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
4
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
5
पोटच्या मुलीच्या मदतीने पतीला संपवले, ह्रदयविकाराने मृत्यू झाल्याचा बनाव; पण 'त्या' एका गोष्टीमुळे अडकली
6
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
7
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
8
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
9
"मी आता फोन वापरणार नाही"; लेकीला मोबाईलपासून दूर करण्यासाठी पालकांचा जबरदस्त जुगाड
10
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
11
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
12
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
13
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
14
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
15
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
16
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
17
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
18
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
19
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
20
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?

हवामान बदलामुळे पृथ्वी झाली डळमळीत?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2018 17:05 IST

विसाव्या शतकामध्ये पृथ्वीवरील विविध घटनांमुळे, औद्योगिकरणामुळे पृथ्वीवरील तापमान वाढत गेले आणि त्यामुळे ग्रीनलँडवरील बर्फ वितळले. या कालावधीमध्ये ७५०० गिगाटन म्हणजे अमेरिकेतील एम्पायर स्टेट इमारतीच्या आकाराइतक्या २ कोटी इमारती एकत्र केल्यास जेवढा आकार होईल तितका बर्फ वितळला आहे.

न्यू यॉर्क- पृथ्वी ही आपल्या आसाभोवती फिरत असते. पृथ्वीचा आस म्हणजे उत्तर आणि दक्षिण ध्रुवाला जोडणारी काल्पनिक रेषा. गेल्या शतकभरामध्ये पृथ्वीचा आस ४ इंचांनी हलला आहे आणि ग्रीनलँडमधील हिमखंड मोठ्या प्रमाणात वितळले आहेत. या दोन्ही कारणांमुळे पृथ्वी डळमळीत झाल्याचे अमेरिकन संशोधन संस्था नासाने म्हटले आहे.     विसाव्या शतकामध्ये पृथ्वीवरील विविध घटनांमुळे, औद्योगिकरणामुळे पृथ्वीवरील तापमान वाढत गेले आणि त्यामुळे ग्रीनलँडवरील बर्फ वितळले. या कालावधीमध्ये ७५०० गिगाटन म्हणजे अमेरिकेतील एम्पायर स्टेट इमारतीच्या आकाराइतक्या २ कोटी इमारती एकत्र केल्यास जेवढा आकार होईल तितका बर्फ वितळला आहे. समुद्राची पातळी वाढण्यामध्ये ग्रीनलँडचा मोठा वाटा आहे. त्यामुळे समुद्रजलात वाढ झाली आणि पृथ्वीचा आस ढळण्यास मदत झाली असे नासाने प्रसिद्ध केलेल्या पत्रकामध्ये म्हटले आहे. याचाच अर्थ मनुष्यामुळे वातावरण बदल आणि पर्यायाने समुद्रपातळीत वाढ झाली व शेवटी पृथ्वीच डळमळीत झाली असा निष्कर्ष काढता येतो.तज्ज्ञांच्या मते ग्रीनलँड आणि अंटार्क्टीका येथिल बर्फ वितळण्याचा पृथ्वीच्या आासावर अधिक परिणाम झाला आहे. ध्रुवापासून ४५ अंशावर असणारे हिमखंड वितळल्यास (उत्तरेस ग्रीनलँड आणि दक्षिणेस पॅटागोनिया ग्लेशियर्स) पृथ्वीच्या आसावर अधिक परिणाम होतो मात्र ध्रुवाजवळील बर्फ वितळल्यास तितका परिणाम होत नाही, असे या शोधनिबंधाचे सहलेखक एरिक इविन्स यांनी सांगितले.ग्लेशियर्स म्हणजे हिमनद्या वितळणे किंवा त्यांचे आकारमान कमी होण्याचाही पृथ्वीच्या डळमळीत होण्यावर परिणाम होतो असे हे संशोधक म्हणतात मात्र हिमनद्या वितळणे हे मुख्य कारण नाही असेही त्यांनी नमूद केले आहे. शेवटच्या हिमयुगामध्ये वजनदार हिमनद्यांनी पृथ्वीच्या पृष्ठभागावर मोठा दाब दिला. आपण गादीवर अंग टेकल्यावर वजनामुळे कशी ती खाली जाते आणि पसरते त्याचप्रमाणे हिमनद्यांनी पृथ्वीच्या पृष्ठभागावर दाब दिला होता. त्यांचे वजन कमी झाल्यामुळे पृथ्वीचा पृष्ठभाग पुन्हा आपल्या मूळ जागेवर येतो. त्यामुळेही पृथ्वी दोलायमान होते. पृथ्वीवरील भूखंडवहनामुळेही ती दोलायमान होते. पृथ्वीच्या पृष्ठभागावरील भूखंड हे पृथ्वीच्या गाभ्यातील उष्णतेमुळे सरकत असतात. आपण एखाद्या पातळ पदार्थाचे भांडे उकळायला ठेवल्यावर त्यात उष्णतेच्या स्रोतापासून उर्ध्वगामी हालचाल सुरु होते. त्याचप्रमाणे पृथ्वीच्या गाभ्यातील उष्णतेमुळे भूखंडांचे वहन असते. पृथ्वीच्या परिवलनामध्ये फरक पडल्यामुळे आपल्या रोजच्या आयुष्यात काय फरक पडेल यावर  या संशोधकांनी फारसा फरक पडणार नाही असे उत्तर दिले. मात्र जीपीएसच्या अचूकतेत आणि उपग्रहांच्या कार्यावर थोडा परिणाम होईल असे नासाचे संशोधक म्हणतात. 

टॅग्स :Earthपृथ्वीscienceविज्ञान