शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
2
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
3
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
4
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
5
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
6
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
7
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
8
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
9
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
10
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
11
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
12
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
13
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
14
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
15
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
16
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
17
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
18
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
19
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
20
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
Daily Top 2Weekly Top 5

हवामान बदलामुळे पृथ्वी झाली डळमळीत?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2018 17:05 IST

विसाव्या शतकामध्ये पृथ्वीवरील विविध घटनांमुळे, औद्योगिकरणामुळे पृथ्वीवरील तापमान वाढत गेले आणि त्यामुळे ग्रीनलँडवरील बर्फ वितळले. या कालावधीमध्ये ७५०० गिगाटन म्हणजे अमेरिकेतील एम्पायर स्टेट इमारतीच्या आकाराइतक्या २ कोटी इमारती एकत्र केल्यास जेवढा आकार होईल तितका बर्फ वितळला आहे.

न्यू यॉर्क- पृथ्वी ही आपल्या आसाभोवती फिरत असते. पृथ्वीचा आस म्हणजे उत्तर आणि दक्षिण ध्रुवाला जोडणारी काल्पनिक रेषा. गेल्या शतकभरामध्ये पृथ्वीचा आस ४ इंचांनी हलला आहे आणि ग्रीनलँडमधील हिमखंड मोठ्या प्रमाणात वितळले आहेत. या दोन्ही कारणांमुळे पृथ्वी डळमळीत झाल्याचे अमेरिकन संशोधन संस्था नासाने म्हटले आहे.     विसाव्या शतकामध्ये पृथ्वीवरील विविध घटनांमुळे, औद्योगिकरणामुळे पृथ्वीवरील तापमान वाढत गेले आणि त्यामुळे ग्रीनलँडवरील बर्फ वितळले. या कालावधीमध्ये ७५०० गिगाटन म्हणजे अमेरिकेतील एम्पायर स्टेट इमारतीच्या आकाराइतक्या २ कोटी इमारती एकत्र केल्यास जेवढा आकार होईल तितका बर्फ वितळला आहे. समुद्राची पातळी वाढण्यामध्ये ग्रीनलँडचा मोठा वाटा आहे. त्यामुळे समुद्रजलात वाढ झाली आणि पृथ्वीचा आस ढळण्यास मदत झाली असे नासाने प्रसिद्ध केलेल्या पत्रकामध्ये म्हटले आहे. याचाच अर्थ मनुष्यामुळे वातावरण बदल आणि पर्यायाने समुद्रपातळीत वाढ झाली व शेवटी पृथ्वीच डळमळीत झाली असा निष्कर्ष काढता येतो.तज्ज्ञांच्या मते ग्रीनलँड आणि अंटार्क्टीका येथिल बर्फ वितळण्याचा पृथ्वीच्या आासावर अधिक परिणाम झाला आहे. ध्रुवापासून ४५ अंशावर असणारे हिमखंड वितळल्यास (उत्तरेस ग्रीनलँड आणि दक्षिणेस पॅटागोनिया ग्लेशियर्स) पृथ्वीच्या आसावर अधिक परिणाम होतो मात्र ध्रुवाजवळील बर्फ वितळल्यास तितका परिणाम होत नाही, असे या शोधनिबंधाचे सहलेखक एरिक इविन्स यांनी सांगितले.ग्लेशियर्स म्हणजे हिमनद्या वितळणे किंवा त्यांचे आकारमान कमी होण्याचाही पृथ्वीच्या डळमळीत होण्यावर परिणाम होतो असे हे संशोधक म्हणतात मात्र हिमनद्या वितळणे हे मुख्य कारण नाही असेही त्यांनी नमूद केले आहे. शेवटच्या हिमयुगामध्ये वजनदार हिमनद्यांनी पृथ्वीच्या पृष्ठभागावर मोठा दाब दिला. आपण गादीवर अंग टेकल्यावर वजनामुळे कशी ती खाली जाते आणि पसरते त्याचप्रमाणे हिमनद्यांनी पृथ्वीच्या पृष्ठभागावर दाब दिला होता. त्यांचे वजन कमी झाल्यामुळे पृथ्वीचा पृष्ठभाग पुन्हा आपल्या मूळ जागेवर येतो. त्यामुळेही पृथ्वी दोलायमान होते. पृथ्वीवरील भूखंडवहनामुळेही ती दोलायमान होते. पृथ्वीच्या पृष्ठभागावरील भूखंड हे पृथ्वीच्या गाभ्यातील उष्णतेमुळे सरकत असतात. आपण एखाद्या पातळ पदार्थाचे भांडे उकळायला ठेवल्यावर त्यात उष्णतेच्या स्रोतापासून उर्ध्वगामी हालचाल सुरु होते. त्याचप्रमाणे पृथ्वीच्या गाभ्यातील उष्णतेमुळे भूखंडांचे वहन असते. पृथ्वीच्या परिवलनामध्ये फरक पडल्यामुळे आपल्या रोजच्या आयुष्यात काय फरक पडेल यावर  या संशोधकांनी फारसा फरक पडणार नाही असे उत्तर दिले. मात्र जीपीएसच्या अचूकतेत आणि उपग्रहांच्या कार्यावर थोडा परिणाम होईल असे नासाचे संशोधक म्हणतात. 

टॅग्स :Earthपृथ्वीscienceविज्ञान