शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
4
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
5
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
6
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
7
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
8
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
9
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
10
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
11
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
12
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
13
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
14
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
15
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
16
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
17
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
18
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
19
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
20
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग

'सीमावाद पे चर्चा', अखेर चीन अन् भारताच्या संरक्षणमंत्र्यांची भेट झाली

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2020 16:20 IST

पँगाँग झील (India-China Pangong Lake Faceoff) वर झालेल्या ताज्या वादामुळे भारत आणि चीनमधील संबंध आणखी ताणले गेले आहेत. चीनच्या सैन्याने 29-30 ऑगस्टच्या रात्री पँगाँग झीलच्या दक्षिण बँक क्षेत्रात परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न केला होता.

ठळक मुद्देपँगाँग झील (India-China Pangong Lake Faceoff) वर झालेल्या ताज्या वादामुळे भारत आणि चीनमधील संबंध आणखी ताणले गेले आहेत. चीनच्या सैन्याने 29-30 ऑगस्टच्या रात्री पँगाँग झीलच्या दक्षिण बँक क्षेत्रात परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न केला होता.

मास्को : भारत-चीन (India-China Tension) मधील तणावाच्या पार्श्वभूमीवर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) यांनी शांघाय सहकार्य परिषदेमध्ये (SCO) चीनचे संरक्षण मंत्री वेई फ़ेंघे यांनी भेट घेतली. या भेटीत भारत आणि चीनमधील सीमा वादावर तब्बल 2 तास चर्चा झाली आहे. त्यामध्ये, भारतीय सैन्य जबाबदारीने वागत असून सीमा भागात शांतता प्रस्थापित राहावी, यासाठी प्रयत्नशील असल्याचे राजनाथसिंह यांनी फेंघे यांना सांगितले.

पँगाँग झील (India-China Pangong Lake Faceoff) वर झालेल्या ताज्या वादामुळे भारत आणि चीनमधील संबंध आणखी ताणले गेले आहेत. चीनच्या सैन्याने 29-30 ऑगस्टच्या रात्री पँगाँग झीलच्या दक्षिण बँक क्षेत्रात परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, भारतीय सैन्याने आक्रमक कारवाई करत त्यांना माघारी पाठविले होते. त्याच पार्श्वभूमीवर रशियात चीनच्या संरक्षणमंत्र्यांना न भेटण्याच भारताने ठरवलं होतं. मात्र, अखेर दोन्ही देशांतील वाढता तणाव लक्षात घेता, चीन व भारताच्या संरक्षणमंत्र्यांची भेट झाली. या भेटीदरम्यान, देशाची अखंडता आणि सीमा सांभाळण्यास भारत सक्षम आहे, कुणीही भारताच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित करु नये. लडाख सीमारेषेवर चीन सैन्याची आक्रमकता आणि हालचाली या दोन्ही देशांत झालेल्या कराराचे उल्लंघन आहे. मात्र, दोन्ही देशांच्या प्रमुख नेत्यांनी सीमा भागात शांती प्रस्थापित करण्यावर सहमती दर्शवली आहे. दोन्ही देशांतील परस्पर संबंध सौहार्दपूर्ण करण्यासाठी हे गरजेचं आहे. त्यामुळे, कुठल्याही मतभेदाचे रुपांतर वादात होता कामा नये, असे राजनाथसिंह यांनी म्हटले आहे.  

चीनचे वृत्तपत्र असलेल्या साऊथ चायना मॉर्निंग पोस्टने चीनच्या सरकारी न्यूज एजन्सी शिन्हुआच्या वृत्तानुसार बातमी दिली आहे. त्यानुसार, गेल्या महिन्यात सीमा रेषेवर झालेल्या तणावास चीनने भारतालाच जबाबदार ठरवले आहे. चीनच्या संरक्षणमंत्र्यांनी भारतीय संरक्षण मंत्र्यांकडे तणाव कमी करण्याचे आवाहन केले. दोन्ही देशांच्या संरक्षणमंत्र्यांची ही चर्चा तब्बल 2 तास चालली. त्यामध्ये, सीमारेषेवरील तणावाची संपूर्ण जबाबदारी भारताची आहे, असे फेंघे यांनी म्हटलंय.  

दरम्यान, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह एससीओच्या बैठकीत सहभाग झाले. त्यासाठी ते बुधवारी रशियाला रवाना झाले आहेत. जेव्हा संघटनेचे दोन मोठे देश सीमेवर एकमेकांविरोधात उभे ठाकले आहेत, तेव्हाच ही बैठक झाली. त्यामुळे जगाचे लक्ष या बैठकीकडे लागले होते. अधिकाऱ्यांनी सांगितले की, चार सप्टेंबरला एससीओतील संरक्षण मंत्र्यांच्या बैठकीत रशियाचे संरक्षण मंत्री सर्गेई शोइगू आणि अन्य अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. त्यामध्ये शस्त्रास्त्रे खरेदी आणि सहकार्यावर चर्चा करण्यात आली. तसेच मोठी डीलही करण्यात आली आहे.  

टॅग्स :Rajnath Singhराजनाथ सिंहchinaचीनIndiaभारत