शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
4
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
5
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
6
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
7
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
8
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
9
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
10
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
11
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
12
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
13
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
14
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
15
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
16
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
17
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
18
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
19
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
20
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
Daily Top 2Weekly Top 5

भारताविरोधातील भूमिका नडली; नेपाळचे पंतप्रधान के. पी. शर्मा ओली यांची खुर्ची धोक्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2020 14:09 IST

मिळालेल्या माहितीनुसार, पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनी आपल्या पदाचा राजीनामा देण्यास नकार दिला आहे.

ठळक मुद्देदोन माजी पंतप्रधान आणि पक्षाच्या अनेक खासदारांनी ओली यांच्याविरोधात भूमिका घेतली आहेओली सरकारविरूद्ध नेपाळच्या लोकांमध्ये प्रचंड संताप दिसून येत आहे.सत्तारूढ कम्युनिस्ट पक्षाच्या नेपाळचे कार्याध्यक्ष पुष्प कमल दहल 'प्रचंड' यांनी मागितला राजीनामा

काठमांडू - सीमेवरील वाद आणि नागरिकत्व विधेयक या विषयावरुन भारताशी पंगा घेणाऱ्या नेपाळ पंतप्रधान के.पी. शर्मा ओली यांचा पक्ष आता फुटण्याच्या मार्गावर आहे. सत्तारूढ कम्युनिस्ट पक्षाच्या नेपाळचे कार्याध्यक्ष पुष्प कमल दहल 'प्रचंड' यांनी पंतप्रधान ओली यांच्यावर टीकेनंतर आता राजीनामा देण्याची मागणी केली आहे. पंतप्रधानांनी राजीनामा न दिल्यास ते पक्ष फोडतील असा इशारा प्रचंड यांनी ओली यांना दिला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनी आपल्या पदाचा राजीनामा देण्यास नकार दिला आहे. प्रचंड यांना पक्षातही मोठा पाठिंबा मिळत आहे. दोन माजी पंतप्रधान आणि पक्षाच्या अनेक खासदारांनी ओलीविरोधात जाहीर मोर्चा उघडला आहे. त्याचवेळी कोरोना व्हायरस संकाटातही ओली सरकारविरूद्ध नेपाळच्या लोकांमध्ये प्रचंड संताप दिसून येत आहे.

पक्षाच्या स्थायी समितीच्या बैठकीत दहल म्हणाले की, सरकार लोकांच्या अपेक्षांवर काम करण्यास अपयशी ठरले आहे. अध्यक्ष आणि पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनी अदलाबदल करून सत्ता वाटपाच्या कराराचे उल्लंघन केल्याचा आरोपही त्यांनी केला. पक्षाच्या एकीकरणादरम्यान आम्ही अदलाबदल करुन सरकार चालवण्याचे मान्य केले होते, पण मी स्वतः माघार घेतली. सरकारचे काम पाहिल्यानंतर असे वाटते की असे करून मी चूक केली आहे.

समाजवाद साधण्याचे आपले ध्येय साकारण्यात सरकार अपयशी ठरल्यास पुढील निवडणुकीत पक्षाला अपयशाला सामोरे जावे लागू शकते असेही दहल म्हणाले. सरकार आणि पक्ष दोघेही संकटात आहेत. दुसरीकडे ओली यांनी सरकारचा बचाव करत असं म्हटलं की प्रशासन देशाच्या हितासाठी काम करत आहे. त्यात सत्ताधारी पक्षाचे नेते विरोधी पक्षासारखं काम करत आहेत असा आरोप त्यांनी लावला.

केपी शर्मा ओली हे भारतविरोधी भावनांसाठी ओळखले जातात. २०१५ मध्ये भारताच्या विरोधानंतरही त्यांनी नेपाळी राज्यघटनेत बदल केला नाही आणि केपी शर्मा भारताच्या विरोधात चीनच्या गोटात गेले. नेपाळ सरकारने चीनशी करार केला. या अंतर्गत चीनने नेपाळला आपला बंदर वापरण्यास परवानगी दिली. पंतप्रधान केपी शर्मा ओली मागील निवडणुकीत भारताविरोधात अनेक विधानं केली होती. त्यांनी भारताची भीती दाखवत दुर्गम भागातील लोक आणि अल्पसंख्यकांना एकत्र आणत सत्ता काबीज केली.  

टॅग्स :IndiaभारतNepalनेपाळ