शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

भारताविरोधातील भूमिका नडली; नेपाळचे पंतप्रधान के. पी. शर्मा ओली यांची खुर्ची धोक्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2020 14:09 IST

मिळालेल्या माहितीनुसार, पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनी आपल्या पदाचा राजीनामा देण्यास नकार दिला आहे.

ठळक मुद्देदोन माजी पंतप्रधान आणि पक्षाच्या अनेक खासदारांनी ओली यांच्याविरोधात भूमिका घेतली आहेओली सरकारविरूद्ध नेपाळच्या लोकांमध्ये प्रचंड संताप दिसून येत आहे.सत्तारूढ कम्युनिस्ट पक्षाच्या नेपाळचे कार्याध्यक्ष पुष्प कमल दहल 'प्रचंड' यांनी मागितला राजीनामा

काठमांडू - सीमेवरील वाद आणि नागरिकत्व विधेयक या विषयावरुन भारताशी पंगा घेणाऱ्या नेपाळ पंतप्रधान के.पी. शर्मा ओली यांचा पक्ष आता फुटण्याच्या मार्गावर आहे. सत्तारूढ कम्युनिस्ट पक्षाच्या नेपाळचे कार्याध्यक्ष पुष्प कमल दहल 'प्रचंड' यांनी पंतप्रधान ओली यांच्यावर टीकेनंतर आता राजीनामा देण्याची मागणी केली आहे. पंतप्रधानांनी राजीनामा न दिल्यास ते पक्ष फोडतील असा इशारा प्रचंड यांनी ओली यांना दिला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनी आपल्या पदाचा राजीनामा देण्यास नकार दिला आहे. प्रचंड यांना पक्षातही मोठा पाठिंबा मिळत आहे. दोन माजी पंतप्रधान आणि पक्षाच्या अनेक खासदारांनी ओलीविरोधात जाहीर मोर्चा उघडला आहे. त्याचवेळी कोरोना व्हायरस संकाटातही ओली सरकारविरूद्ध नेपाळच्या लोकांमध्ये प्रचंड संताप दिसून येत आहे.

पक्षाच्या स्थायी समितीच्या बैठकीत दहल म्हणाले की, सरकार लोकांच्या अपेक्षांवर काम करण्यास अपयशी ठरले आहे. अध्यक्ष आणि पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनी अदलाबदल करून सत्ता वाटपाच्या कराराचे उल्लंघन केल्याचा आरोपही त्यांनी केला. पक्षाच्या एकीकरणादरम्यान आम्ही अदलाबदल करुन सरकार चालवण्याचे मान्य केले होते, पण मी स्वतः माघार घेतली. सरकारचे काम पाहिल्यानंतर असे वाटते की असे करून मी चूक केली आहे.

समाजवाद साधण्याचे आपले ध्येय साकारण्यात सरकार अपयशी ठरल्यास पुढील निवडणुकीत पक्षाला अपयशाला सामोरे जावे लागू शकते असेही दहल म्हणाले. सरकार आणि पक्ष दोघेही संकटात आहेत. दुसरीकडे ओली यांनी सरकारचा बचाव करत असं म्हटलं की प्रशासन देशाच्या हितासाठी काम करत आहे. त्यात सत्ताधारी पक्षाचे नेते विरोधी पक्षासारखं काम करत आहेत असा आरोप त्यांनी लावला.

केपी शर्मा ओली हे भारतविरोधी भावनांसाठी ओळखले जातात. २०१५ मध्ये भारताच्या विरोधानंतरही त्यांनी नेपाळी राज्यघटनेत बदल केला नाही आणि केपी शर्मा भारताच्या विरोधात चीनच्या गोटात गेले. नेपाळ सरकारने चीनशी करार केला. या अंतर्गत चीनने नेपाळला आपला बंदर वापरण्यास परवानगी दिली. पंतप्रधान केपी शर्मा ओली मागील निवडणुकीत भारताविरोधात अनेक विधानं केली होती. त्यांनी भारताची भीती दाखवत दुर्गम भागातील लोक आणि अल्पसंख्यकांना एकत्र आणत सत्ता काबीज केली.  

टॅग्स :IndiaभारतNepalनेपाळ