शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
2
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
3
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
4
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
5
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
6
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
7
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
8
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
9
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
10
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."
11
नवरात्रीचा मुहूर्त? पंतप्रधान मोदी नव्या ठिकाणाहून कामकाज पाहणार; PMOचा पत्ता बदलणार
12
"भेटायला येतो असा मी मित्रासारखा हट्ट केला होता पण...", प्रियाच्या आठवणीत अभिजीत भावुक
13
Video - पैशांचा पाऊस! चालत्या ट्रेनमधून उडवल्या ५०० च्या नोटा; गोळा करण्यासाठी लोकांची झुंबड
14
बच्चू कडूंना कधीच सोडणार नाही म्हणणारे माजी आमदार सोडून गेले; काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश
15
सारख्या नावाचे दिवस गेले... सेम चेहराही शोधावा लागणार; यापुढे EVM वर उमेदवाराचा रंगीत फोटो छापणार...
16
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”
17
समुद्रात दडलाय सोन्याचा खजिना; किंमत 2000 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त, काढणार कसा?
18
आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर प्राणघातक हल्ला: अनेक पोलिस एम्समध्ये दाखल
19
कार अन् ट्रकचा भीषण अपघात; एकाच कुटुंबातील सात जणांचा जागीच मृत्यू
20
ICC T20I Rankings : नंबर वन अभिषेक शर्मानं साधला मोठा डाव; कॅप्टन सूर्यासह तिलक वर्मा घाट्यात

"1993 मध्ये मुंबईत बॉम्बस्फोट घडविणाऱ्यांची पाकमध्ये बडदास्त"

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2022 06:21 IST

दाऊद टोळीचे नाव न घेता भारताचा हल्लाबोल

न्यूयॉर्क : १९९३ साली मुंबईमध्ये घडविलेल्या बॉम्बस्फोटाला जबाबदार असलेला कुख्यात दहशतवादी व त्याच्या टोळीतील साथीदार पाकिस्तानमध्ये पंचतारांकित पाहुणचार झोडत आहेत. पाकिस्तानने त्यांना सुरक्षा व्यवस्थाही पुरविली आहे, असा जोरदार हल्लाबोल भारताचे संयुक्त राष्ट्रातील राजदूत टी. एस. तिरुमूर्ती यांनी दाऊद इब्राहिम टोळीचे नाव न घेता केला.ग्लोबल काऊंटर टेररिझम कौन्सिलने आयोजिलेल्या आंतरराष्ट्रीय दहशतवादविरोधी परिषदेत त्यांनी सांगितले की, दहशतवाद व संघटित गुन्हेगारी यांच्यात घनिष्ठ संबंध असतो. अशा प्रवृत्तींवर कठोर कारवाई होणे आवश्यक आहे. १९९३ साली मुंबईमध्ये बॉम्बस्फोट घडविणाऱ्या टोळीतील साथीदार पाकिस्तानात ऐषोआरामात जगत आहेत. कुख्यात दहशतवादी दाऊद इब्राहिम पाकिस्तानमध्ये राहात असल्याचे तेथील सरकारने ऑगस्ट २०२० मध्ये मान्य केले होते. ८८ दहशतवादी गट व त्यांच्या प्रमुखांवर पाकिस्तानने अनेक निर्बंध लादले होते. त्यामध्ये दाऊद इब्राहिमचेही नाव होते. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेच्या दहशतवादविरोधी समितीच्या प्रमुखपदी यंदाच्या वर्षासाठी टी. एस. तिरुमूर्ती यांची निवड झाली आहे. ते म्हणाले की, जगभरातील दहशतवाद्यांना पुरविली जाणारी आर्थिक तसेच शस्त्रास्त्रांची रसद तोडण्यासाठी संयुक्त राष्ट्रांनी अनेक कडक निर्बंध घातले आहेत. मात्र त्या निर्बंधांचे काटेकोर पालन होताना दिसत नाही. (वृत्तसंस्था)भारताचे संयुक्त राष्ट्रांतील राजदूत टी. एस. तिरुमूर्ती म्हणाले की, संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेने बंदी घातलेल्या लष्कर-ए-तय्यबा, जैश-ए-मोह्मद या पाकिस्तानी संघटनांचे अल् कायदाशी असलेले संबंध अधिक घनिष्ठ झाले आहेत. अफगाणिस्तानात नुकत्याच घडलेल्या घटनांनी या दहशतवादी संघटनांना नवे बळ मिळाले. इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेने आपली काम करण्याची पद्धत बदलली. सिरिया व इराकमधील आपली पाळेमुळे पुन्हा घट्ट करण्याकडे या संघटनेने आता लक्ष दिले आहे. 

टॅग्स :Dawood Ibrahimदाऊद इब्राहिमPakistanपाकिस्तानunited nationsसंयुक्त राष्ट्र संघ