शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

"1993 मध्ये मुंबईत बॉम्बस्फोट घडविणाऱ्यांची पाकमध्ये बडदास्त"

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2022 06:21 IST

दाऊद टोळीचे नाव न घेता भारताचा हल्लाबोल

न्यूयॉर्क : १९९३ साली मुंबईमध्ये घडविलेल्या बॉम्बस्फोटाला जबाबदार असलेला कुख्यात दहशतवादी व त्याच्या टोळीतील साथीदार पाकिस्तानमध्ये पंचतारांकित पाहुणचार झोडत आहेत. पाकिस्तानने त्यांना सुरक्षा व्यवस्थाही पुरविली आहे, असा जोरदार हल्लाबोल भारताचे संयुक्त राष्ट्रातील राजदूत टी. एस. तिरुमूर्ती यांनी दाऊद इब्राहिम टोळीचे नाव न घेता केला.ग्लोबल काऊंटर टेररिझम कौन्सिलने आयोजिलेल्या आंतरराष्ट्रीय दहशतवादविरोधी परिषदेत त्यांनी सांगितले की, दहशतवाद व संघटित गुन्हेगारी यांच्यात घनिष्ठ संबंध असतो. अशा प्रवृत्तींवर कठोर कारवाई होणे आवश्यक आहे. १९९३ साली मुंबईमध्ये बॉम्बस्फोट घडविणाऱ्या टोळीतील साथीदार पाकिस्तानात ऐषोआरामात जगत आहेत. कुख्यात दहशतवादी दाऊद इब्राहिम पाकिस्तानमध्ये राहात असल्याचे तेथील सरकारने ऑगस्ट २०२० मध्ये मान्य केले होते. ८८ दहशतवादी गट व त्यांच्या प्रमुखांवर पाकिस्तानने अनेक निर्बंध लादले होते. त्यामध्ये दाऊद इब्राहिमचेही नाव होते. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेच्या दहशतवादविरोधी समितीच्या प्रमुखपदी यंदाच्या वर्षासाठी टी. एस. तिरुमूर्ती यांची निवड झाली आहे. ते म्हणाले की, जगभरातील दहशतवाद्यांना पुरविली जाणारी आर्थिक तसेच शस्त्रास्त्रांची रसद तोडण्यासाठी संयुक्त राष्ट्रांनी अनेक कडक निर्बंध घातले आहेत. मात्र त्या निर्बंधांचे काटेकोर पालन होताना दिसत नाही. (वृत्तसंस्था)भारताचे संयुक्त राष्ट्रांतील राजदूत टी. एस. तिरुमूर्ती म्हणाले की, संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेने बंदी घातलेल्या लष्कर-ए-तय्यबा, जैश-ए-मोह्मद या पाकिस्तानी संघटनांचे अल् कायदाशी असलेले संबंध अधिक घनिष्ठ झाले आहेत. अफगाणिस्तानात नुकत्याच घडलेल्या घटनांनी या दहशतवादी संघटनांना नवे बळ मिळाले. इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेने आपली काम करण्याची पद्धत बदलली. सिरिया व इराकमधील आपली पाळेमुळे पुन्हा घट्ट करण्याकडे या संघटनेने आता लक्ष दिले आहे. 

टॅग्स :Dawood Ibrahimदाऊद इब्राहिमPakistanपाकिस्तानunited nationsसंयुक्त राष्ट्र संघ