शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

Coronavirus: जागतिक आरोग्य संघटनेचा इशारा; कोरोना रोखण्यासाठी फक्त लॉकडाऊन पुरेसं नाही, तर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2020 09:00 IST

लॉकडाऊनच्या परिस्थितीत शहरातील अनेक व्यवहार ठप्प झाले आहेत. लोकांची रहदारी कमी झाली आहे.

ठळक मुद्देकोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी लॉकडाऊनचा निर्णय प्रत्येक देशाने घेतला आहे. लॉकडाऊनमुळे देशाची आर्थिक राजधानी मुंबई ठप्प पडली आहेकोरोना रोखण्यासाठी लॉकडाऊन पुरेसं नाही - WHO

नवी दिल्ली – कोरोना व्हायरसच्या धसक्याने जगातील अनेक देशांनी लॉकडाऊनचा निर्णय घेतला आहे. चीनच्या वुहान शहरातून पसरलेल्या कोरोनाने जगातील अन्य देशात शिरकाव केला आहे. वुहानमध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने लोकांना घरातून बाहेर पडू दिलं नाही. चीननंतरइटलीला कोरोनाचा सर्वाधिक फटका बसला. भारतातही कोरोनाचे ३९६ रुग्ण आढळून आले आहेत. तर ७ जणांचा मृत्यू झाला आहे.

लॉकडाऊनच्या परिस्थितीत शहरातील अनेक व्यवहार ठप्प झाले आहेत. लोकांची रहदारी कमी झाली आहे. अत्यावश्यक सेवा देणाऱ्यांनाच घराबाहेर पडण्याची परवानगी आहे. कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी लॉकडाऊनचा निर्णय प्रत्येक देश घेत आहे. महाराष्ट्रतही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लॉकडाऊनचा निर्णय घेतला आहे. देशाची आर्थिक राजधानी मुंबई ठप्प पडली आहे.

मात्र लॉकडाऊनवर जागतिक आरोग्य संघटनेने भाष्य केले आहे. कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी फक्त लॉकडाऊन पुरेसे नाही. वृत्तसंस्था रॉयटर्सच्या वृत्तानुसार, डब्ल्यूएचओ(WHO)चे माईक रायन यांनी एका निवेदनात म्हटलं आहे की कोरोना रोखण्यासाठी लॉकडाऊन पुरेसं नाही तर जे आजारी आहेत, पीडित आहेत त्यांना शोधण्याची आणि देखरेखीखाली ठेवण्याची गरज आहे. तसे केलं तरच हे थांबवता येऊ शकते असं त्यांनी सांगितले.

तसेच लॉकडाऊनची सर्वात मोठी समस्या अशी आहे की जेव्हा ते संपेल तेव्हा लोक अचानक मोठ्या संख्येने बाहेर येतील आणि मग धोका वाढेल. चीनमधून पसरलेल्या कोरोना विषाणूने युरोप आणि अमेरिकेला विळख्यात घेतलं आहे. जगातील अनेक देशांनी आपल्या लोकांना त्यांच्या घरात राहण्यास सांगितले आहे, लॉकडाऊन जाहीर केले आहे. युरोपमधील बर्‍याच शहरांमध्ये बार, रेस्टॉरंटसह अनेक सुविधा काही दिवसांपासून बंद आहेत.

माईक रायन म्हणाले की जेव्हा चीन, सिंगापूर आणि दक्षिण कोरियाने लॉकडाऊन केले तेव्हा कोरोना विषाणूचा धोका असलेल्या प्रत्येक व्यक्तीची त्यांनी चौकशी केली. आता युरोप, अमेरिका आणि इतर देशांनी समान मॉडेल लागू केले पाहिजे. जर त्याचा प्रसार होण्यापासून रोखला गेला तर रोगाचा सामना केला जाऊ शकतो.

जगात कोरोना व्हायरसमुळे सुमारे तीन लाखांहून अधिक लोकांना ग्रस्त केलं आहे. तर जवळपास 14,000 लोकांचा मृत्यू झाला आहे. जर भारताबद्दल सांगितलं तर येथे सुमारे 396 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत आणि 7 जणांचा मृत्यू झाला आहे. देशाच्या बर्‍याच भागात लॉकडाऊन जाहीर करण्यात आले असून लोकांना घरातच राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

...म्हणून इटलीहून परतलेला ‘तो’ भारतीय तरुण ५ दिवसांत विलगीकरण कक्षातून बाहेर आला

कोरोनाने एसटीचे चाक रोखले; अत्यावश्यक सेवा देण्यासाठी ५०० बसेस धावणार

मुंबई, पुणे येथील कोरोना तपासणी केंद्रांना मान्यता- अमित देशमुख

जेथे आहात तेथेच राहण्याचे देशातील १० लाख जवानांना आदेश

कोरोना नियंत्रणासाठी न्यायालयांचा पुढाकार; न्यायाधीशांनी दिला महिन्याचा पगार

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसItalyइटलीchinaचीनWorld health organisationजागतिक आरोग्य संघटना