शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
2
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
3
अर्चना तिवारी चतुर निघाली! ट्रेनमध्ये प्रेम, नेपाळला पळून जाण्याचा प्रयत्न; घरच्यांनी किडनॅपिंकची तक्रार केली पण निघाले वेगळेच
4
१ मोटरसायकल, १ मिनी ट्रक आणि प्रवासी बस; अफगाणिस्तानमध्ये भीषण आगीत ६९ जणांचा मृत्यू
5
बेस्ट निवडणुकीतील दारुण पराभवावर ठाकरे गटाच्या पॅनेलची प्रतिक्रिया...; 'म्हणून हरलो...'
6
‘३० दिवसांहून अधिक काळ अटक झाल्यास पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना पद सोडावे लागणार’ शहांनी विधेयक मांडले, लोकसभेचे कामकाज तहकूब
7
"मी निर्दोष सिद्ध झालो नाही तोपर्यंत..."; राजीनामा दिला होता का म्हणणाऱ्या काँग्रेस खासदाराला अमित शहांचे प्रत्युत्तर
8
फैजल खानचं आमिरला DNA चाचणी करण्याचं आव्हान, म्हणाला, "रीनाशी लग्न केलं तेव्हाच..."
9
'ही' कंपनी देणार ८ बोनस शेअर्स; २८ ऑगस्ट आहे रेकॉर्ड डेट, शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
10
नोकरीची उत्तम संधी! एलआयसीमध्ये विविध पदांची भरती, पगार एक लाखापेक्षा अधिक
11
Ganesh Festival 2025: गणेश मूर्ती विकत घेताना टाळा 'या' चुका; जाणून घ्या नियम!
12
Smallest Countries : जगातील सगळ्यात लहान ५ देश; दुसऱ्या क्रमांकाच्या देशात तर अवघ्या एका दिवसात फिरून होईल!
13
श्रावण शिवरात्रिला गुरुपुष्यामृत योग: ‘असे’ करा शिव-लक्ष्मी पूजन; वैभव-ऐश्वर्य-सुबत्ता लाभेल!
14
मुंबई महापालिकेत ठाकरे बंधूंना टक्कर देणार भाजपाचे 'जय-वीरू'; आशिष शेलारांनी डिवचलं, म्हणाले...
15
शेअर आहे की पैशांचं झाड...? ५ महिन्यांत २००%, तर आतापर्यंत दिलाय ५१३१२% चा छप्परफाड परतावा; गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
16
अमूल गर्ल कोण, एक नाही दोन? एवढ्या वर्षांनी सिक्रेट बाहेर आले, त्या प्रसिद्ध राजकीय नेत्याच्या सख्ख्या बहिणी...
17
उत्तर प्रदेशातील आणखी एका शहराचे नामांतर, नवे नाव असणार 'परशुरामपुरी'
18
बेस्ट निवडणूक २०२५: CM फडणवीसांची मदत, ठाकरेंचा पराभव; शशांक राव यांनी सांगितली Inside Story
19
ICC ODI Rankings : केशव महाराज नंबर वन बॉलर! बॅटरच्या यादीतून रोहित-विराटचं नाव 'गायब'; कारण...
20
Astro Tips: हा हळदीचा ट्रेंड नाही तर आयुष्यातील नकारात्मकता घालवण्यासाठी आहे गुरुवारचा उपाय!

CoronaVirus News : बापरे! लस तयार झाली तरी कोरोना पाठ सोडणार नाही; तज्ज्ञांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2020 10:54 IST

CoronaVirus Marathi News and Live Updates: जगभरातील कोरोनाग्रस्तांची संख्या ही 59 लाखांवर गेली आहे. तर तब्बल 362,024 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

कोरोनाने संपूर्ण जगाला विळखा घातला आहे. अमेरिका, इटलीसारखे देश कोरोनापुढे हतबल झाले आहे. वेगाने पसरणाऱ्या कोरोनाने सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण केले आहे. कोरोनाच्या संकटाचा सामना करण्यासाठी सर्वच देश सज्ज झाले आहेत. जगातील कोरोना रुग्णांची संख्या ही दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोना व्हायरसवर अद्याप कोणतंही औषध उपलब्ध झालेलं नाही. जगभरात कोरोनाचा हाहाकार पाहायला मिळत आहे. जगभरातील कोरोनाग्रस्तांची संख्या ही 59 लाखांवर गेली आहे. तर तब्बल 362,024 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. याच दरम्यान एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. 

कोरोना व्हायरसवर अद्याप कोणतंही औषध उपलब्ध झालेलं नाही. लस तयार करण्याचं काम हे जगभरात युद्धपातळीवर सुरू आहे. कोरोनावर औषध कधी येईल याचीच सर्वजण वाट पाहत आहेत. मात्र कोरोना व्हायरसवर लस आली तरी कदाचित कोरोना पाठ सोडणार नाही. तो आपल्यासोबत असाच कायम राहिल अशी शक्यता आता तज्ज्ञांनी वर्तवली आहे. एचआयव्ही, गोवर, कांजण्या यांच्यासारखा तो स्थानिक होऊन जाईल. वॉशिंग्टन पोस्टच्या रिपोर्टनुसार कोरोना व्हायरसची लस आली तरी कोरोना व्हायरस जाणार नाही. 

तज्ज्ञांच्या मते आधीपासूनच चार स्थानिक कोरोना व्हायरस आहेत. त्यांच्यामध्ये आता कोविड-19 हा पाचवा असणार आहे. याचा प्रभाव हळूहळू कमी होईल कारण लोकांची प्रतिकारक शकती वाढेल आणि आपलं शरीर वेळेसह यासाठी अनुकूल होईल. कोविड-19 हा दीर्घकाळ राहणारा व्हायरस आहे. शिकागो युनिव्हर्सिटीतील सारा कोबे यांनी हा दिलेल्या माहितीनुसार, कोरोना व्हायरस येथेच राहणार आहे. त्याच्यासह सुरक्षितरित्या कसं जगणार हा प्रश्न आहे. या व्हायरस विरोधात लढण्यासाठी प्रयत्न आणि राजकीय इच्छाशक्तीची गरज असते. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

देशातील रुग्णसंख्येने आतापर्यंतचा उच्चांक गाठला आहे. गेल्या 24 तासांत देशभरात कोरोनाचे तब्बल 7,466 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 175 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे आता भारतातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला असून रुग्णांची एकूण संख्या 165799  वर पोहोचली आहे. तर कोरोनामुळे देशात 4706  लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. आरोग्य मंत्रालयाने याबाबत माहिती दिली आहे. शुक्रवारी (29 मे) केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या 24 तासांत 7,466 नवीन कोरोनाग्रस्त आढळून आले आहेत. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या  1,65,799 वर पोहोचली असून कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा चार हजारांवर पोहोचला आहे. देशातील कोरोनाग्रस्तांपैकी 89987 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर 71105 रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

CoronaVirus News : कोरोनाचा हाहाकार! देशातील रुग्णसंख्येने गाठला आतापर्यंतचा उच्चांक; चिंताजनक आकडेवारी

CoronaVirus News : कोरोनाच्या लढ्यात नवा प्रयोग; 'या' शहरात सुरू झाले 'धन्वंतरी रथ'

CoronaVirus News : कोरोनाच्या लढ्यात आशेचा किरण! देशात 'या' 9 औषधांची केली जातेय चाचणी

CoronaVirus News : लॉकडाऊनमुळे नोकरी गेली; आईला सांभाळण्यासाठी पैसे नसल्याने मुलाचं भयंकर कृत्य

CoronaVirus News : कोरोनाग्रस्तांचा आकडा 57 लाखांवर; 'या' देशात एकही मृत्यू नाही तर काही ठिकाणी गंभीर स्थिती

CoronaVirus News : ...म्हणून चिमुकल्यांना मास्क घालू नका; आरोग्य तज्ज्ञांनी दिला पालकांना सल्ला

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याmedicineऔषधंAmericaअमेरिकाIndiaभारतDeathमृत्यू