शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
3
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
4
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
5
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
6
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
7
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
8
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
9
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
10
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
11
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
12
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
13
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
14
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
15
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
16
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
17
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
18
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
19
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
20
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले

CoronaVirus: कोरोना संकटातही इम्रान खान यांचा काश्मीर राग; भारताविरोधात गरळ ओकली

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2020 21:40 IST

भारत सरकारने काल जारी केलेल्या जम्मू-काश्मीरच्या पुनर्गठन आदेश 2020वर इम्रान खान यांनी टीकेची झोड उठवली आहे.

इस्लामाबादः जगभरात कोरोना व्हायरसनं हाहाकार माजवला आहे. भारतालाही कोरोनाचा मोठा फटका बसला आहे. तर पाकिस्तानातही कोरोनानं थैमान घातलं आहे. कोरोनामुळे पाकिस्तानची परिस्थिती दिवसेंदिवस हाताबाहेर जात असतानाही इम्रान खान यांनी पुन्हा एकदा काश्मीरचा राग आळवला आहे. कोरोनाच्या लढ्यासाठी सार्क देशांच्या प्रमुखांनी आयोजित केलेल्या व्हिडीओ कॉन्फरन्सिंगमध्येही इम्रान खान यांच्या मंत्र्यानं काश्मीरचा मुद्दा उपस्थित केला होता. त्याला भारतानंही सडेतोड उत्तर दिलं होतं. भारत सरकारने काल जारी केलेल्या जम्मू-काश्मीरच्या पुनर्गठन आदेश 2020वर इम्रान खान यांनी टीकेची झोड उठवली आहे. भारत लोकसंख्याशास्त्र बदलण्याचा प्रयत्न करत असल्याचा त्यांनी आरोप केला आहे.  गेल्या वर्षी ऑगस्टपासून इम्रान खान आणि पाकिस्तान काश्मीर मुद्द्यावरून भारताविरोधात गरळ ओकत आहेत. भारतानं जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० हटवल्यानंतर पाकिस्ताननं भारताचा हा अंतर्गत मुद्दा आंतरराष्ट्रीय स्तरावर उपस्थित केला, परंतु तिकडे पाकिस्तान तोंडघशी पडला.  इम्रान खान यांनी आता जम्मू-काश्मीरच्या पुनर्गठन ऑर्डर २०२०ला काश्मीरमधील 'भारताचा दहशतवाद' असे संबोधले आहे. दहशतवाद्यांचं आश्रयस्थान असलेला पाकिस्तान भारताविरोधात बेछुट आरोप करत सुटला आहे. गुरुवारी इम्रान खान यांनी एकापाठोपाठ एक एक करत एकूण 3 ट्विट केले असून, भारताविरोधात आगपाखड केली आहे. सर्वच आंतरराष्ट्रीय कायदे आणि संधी धुडकावून जम्मू-काश्मीरमध्ये मोदींच्या सरकारने भारतीय लोकसंख्याशास्त्रात अवैधपणे बदल घडवला आहे. मोदींसारख्या हिंदुत्ववादी नेत्यानं केलेल्या या कृत्याचा आम्ही तीव्र निषेध करतो. नवीन जम्मू-काश्मीर पुनर्गठन आदेश 2020 हा चौथ्या जिनेव्हा कायद्याचे थेट उल्लंघन आहे, असा आरोपही इम्रान खान यांनी केला आहे. दुसर्‍या ट्विटमध्ये इम्रान खान लिहितात, जगाचे लक्ष आता कोरोना विषाणूच्या साथीवर आहे आणि भारत याचा फायदा घेण्याचा प्रयत्न करीत आहे. कोरोनाच्या आडून मोदी सरकार काश्मीरमध्ये मनमानी कारभार करत आहे. पाकिस्तानी पंतप्रधानांनी काश्मीर मुद्द्याचा पाठपुरावा करण्यासाठी संयुक्त राष्ट्र आणि आंतरराष्ट्रीय समुदायाला आवाहन केल्याचाही त्यांनी उल्लेख केला आहे. UNSCच्या ठरावांचे आणि आंतरराष्ट्रीय कायद्यांचे उल्लंघन करण्यापासून भारताला रोखले पाहिजे. भारत पुरस्कृत दहशतवाद आणि काश्मिरींना 'त्यांच्या आत्मनिर्भर हक्कापासून वंचित' ठेवण्यात येत असल्याबाबत पाकिस्तान कायम आवाज उठवत राहिलं, असंही इम्रान खान यांनी सांगितलं आहे. 

टॅग्स :Imran Khanइम्रान खानNarendra Modiनरेंद्र मोदीJammu Kashmirजम्मू-काश्मीरcorona virusकोरोना वायरस बातम्या