शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्लामाबाद पोलीस एसपी होते भारताचे गुप्तहेर?; रहस्यमय मृत्यूनंतर सोशल मीडियात चर्चेला उधाण
2
२००२ मध्ये भारत-पाक युद्ध होणार होते?; माजी CIA एजेंटचा मुशर्रफ यांच्याबद्दल धक्कादायक खुलासा
3
राज्यसभा निवडणुकीत क्रॉस व्होटिंगनं बाजी पलटली; २८ आमदार असताना भाजपानं ३२ मते कशी मिळवली?
4
IND vs AUS 3rd ODI Live Streaming : टीम इंडियासमोर 'व्हाइट वॉश' टाळण्याचं आव्हान
5
'मोदीज मिशन' पुस्तकातील काही भाग शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट करावा; एकनाथ शिंदेंची मागणी
6
Anil Deshmukh: "पोलिसांचे धाडस कसे झाले?" महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणावर अनिल देशमुख यांची संतप्त प्रतिक्रिया
7
जम्मू-काश्मीर राज्यसभा निवडणुकीचे निकाल जाहीर; नॅशनल कॉन्फरन्स 3, तर भाजपचा 1 जागेवर विजय
8
Women’s World Cup 2025: ज्या पावसाने खाते उघडले, त्याने शेवटी वाटही लावली; पाकची विजयाची पाटी कोरीच!
9
चीनचं धक्कादायक कारस्थान उघड, पँगाँग सरोवराजवळ उभारतोय एअर डिफेन्स कॉम्प्लेक्स
10
मोबाईल चार्जरमध्ये लपवलं १५० ग्रॅम सोनं, तेच ठरलं जीवघेणे; युवकाच्या हत्येचा अखेर उलगडा
11
लालबागमधील हल्लेखोर प्रियकरापाठोपाठ ‘त्या’ मुलीचाही मृत्यू, किरकोळ कारणातून गेले दोन जीव  
12
सोन्या-चांदीचे दर कोसळले! सोनं 2,000, तर चांदी 4,000 रुपये स्वस्त; कारण काय..?
13
Maruti CNG Cars: पेट्रोलच्या वाढत्या किमतींनी हैराण झालात? मारुतीच्या 'या' ५ सीएनजी कार वाचवतील तुमचे पैसे!
14
"कोणत्याही देशाच्या दबावाखाली व्यापार करार करणार नाही", पीयूष गोयल यांचे अमेरिकेला खडेबोल
15
IND vs AUS: कोहलीनं फॉर्म परत मिळवण्यासाठी काय करावं? मोहम्मद कैफचा मोलाचा सल्ला! म्हणाला...
16
दहावी पास झालेल्यांसाठी सरकारी नोकरीची संधी! ३९१ कॉन्स्टेबल जीडी पदांची भरती निघाली
17
‘मोबाईल सर्व्हेलन्स’च्या मुद्द्यावरून बावनकुळेंची सारवासारव, व्हॉट्सअप ग्रुप्सबाबत बोलल्याचा दावा
18
१ लाख व्हॉट्सअप ग्रुप, भाजपाची 'वॉर रूम'; कशी चालते यंत्रणा? बावनकुळेंनी सगळेच सांगितले
19
डॉक्टर अवघड शस्त्रक्रिया करत होते. ती ऑपरेशन टेबलवर सनई वाजवत होती, व्हिडीओ व्हायरल
20
"मला न्याय हवाय, पती-मुलाला लोखंडी रॉडने मारहाण..."; भाजपा महिला नेत्याचा रस्त्यावर ठिय्या

Coronavirus: संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत कोरोनावर चर्चा करण्यास चीनचा नकार; भारताने सुनावलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2020 10:43 IST

कोरोना व्हायरसबाबत चीनला एक ना एक दिवस जगाला माहिती द्यावीच लागेल

ठळक मुद्देजागतिक समस्येवर महत्त्वपूर्ण सूचना आणि पर्यायांवर एकमेकांशी चर्चा करणे गरजेचे आहेजागतिकीकरणामुळे प्रत्येक देश एकमेकांवर अवलंबून आहेतसर्वांनी एकत्र येऊन कोरोनासारख्या महामारीचा मुकाबला करायला हवा

नवी दिल्ली – संपूर्ण जगावर कोरोनाचं संकट उभं राहिलं असताना आतापर्यंत १० लाखांहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर ५९ हजारांहून अधिक रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मात्र ज्या कोरोना व्हायरसची सुरुवात चीनच्या वुहान शहरातून झाली त्याचा फटका आता चीनपेक्षाही इतर देशांना जास्त बसत आहे.

कोरोना व्हायरसबाबत चीनला एक ना एक दिवस जगाला माहिती द्यावीच लागेल. आपण एका वैश्विक जगात राहत आहे. जागतिक समस्येवर महत्त्वपूर्ण सूचना आणि पर्यायांवर एकमेकांशी चर्चा करणे गरजेचे आहे असं भारताचं प्रतिनिधित्व करणारे सैय्यद अकबरुद्दीन यांनी सांगितले. जगातील सर्व देश कोरोनाविरोधात संघर्ष करत आहे. आंतरराष्ट्रीय संस्था एकमेकांना सहकार्य करत काम करत आहेत. कोरोनाच्या संकटाशी सामना करण्यासाठी जागतिक बँकेकडून आर्थिक सहाय्य मिळत आहे.

संयुक्त राष्ट्र परिषदेत भारताचं प्रतिनिधित्व करणारे सैय्यद अकबरुद्दीन यांची इंडिया टुडेने मुलाखत घेतली. यापूर्वी आलेल्या रिपोर्टनुसार चीनने संयुक्त राष्ट्र परिषदेत वुहान आणि कोरोनाबाबत चर्चा करण्यासाठी नकार दिला आहे. मार्च महिन्यात चीनकडे १५ सदस्यीय सुरक्षा परिषदेचे अध्यक्षपद होते. यावर सैय्यद अकबरुद्दीन म्हणाले की, सुरक्षा परिषदकडे अजेंडा असतो. आतापर्यंत हा मुद्दा पटलावर न आल्याने यावर कोणतीही कमेंट करु शकत नाही. ही अनौपचारिक चर्चा आहे, आज नाहीतर उद्या यावर चर्चा होईल असं ते म्हणाले.

तसेच आपण एका वैश्विक जगामध्ये राहतो. जागतिकीकरणामुळे प्रत्येक देश एकमेकांवर अवलंबून आहेत आणि जागतिकीकरणाची प्रक्रिया विना अडथळा सुरु राहण्यासाठी जगाच्या हितासाठी प्रत्येक देशाने सहकार्य करणे आवश्यक आहे. प्रत्येक देश जगाच्या चांगल्यासाठी प्रय़त्न करत असतो. जगावर परिणाम होत असलेल्या मुद्द्यांशी संबंधित माहिती आणि तथ्ये जागतिक स्तरावर सामूहिक चर्चेत यावीत त्यावर उपाय शोधले जावेत असं मत सैय्यद अकबरुद्दीन यांनी मांडले. दरम्यान, कोणालाही दोष देण्याची ही वेळ नाही, परंतु तरीही सर्वांनी एकत्र उभे राहून मानवी अस्तित्वाला आव्हान देणाऱ्या महामारीविरोधात लढण्याची गरज आहे असंही ते म्हणाले.

पारदर्शक आणि वैज्ञानिक मार्गाने चर्चा झाली पाहिजे

सय्यद अकबरुद्दीन म्हणाले की कोरोना विषाणू नावाच्या या साथीला जर समजावून घ्यायचे असेल तर आपण पारदर्शक, वैज्ञानिक पद्धतीने आणि मोकळेपणाने हा प्रश्न समजून घ्यावा लागेल. एक वेळ येईल जेव्हा आपण या संकटावर मात करू, आता आपल्या अस्तित्वाला आव्हान देणाऱ्या या आजाराशी लढा देण्याची गरज आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याchinaचीनIndiaभारत