शहरं
Join us  
Trending Stories
1
भीषण अपघात! चित्रदुर्गात ट्रकशी धडक झाल्यानंतर स्लीपर बसला आग, १७ जणांचा मृत्यू
2
'आता हिशोब सरळ आहे'; राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येताच भाजपने मांडलं मतांचे गणित, आकडेवारीत कोण वरचढ?
3
३ तासांत चेकद्वारे पैसे मिळणार का? आरबीआयने ऐनवेळी घेतला मोठा निर्णय, वाचा नवे परिपत्रक
4
तैवानमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के, समोर आला इमारत हलतानाचा धडकी भरवणारा VIDEO
5
तुम्ही आम्हाला मतदान केले, तरच...; सहायक आयुक्तांना व्यासपीठावर बसवून मंत्री राणे यांची प्रचारसभा
6
मेहुण्याचा जाच आणि भावाचा राग! दारू पाजली अन् सपासप केले वार; वादाचं कारण ऐकून होईल संताप
7
घटस्फोटानंतर मुलांपासून दूर झाली अभिनेत्री, पतीने ख्रिसमसलाही भेटू दिलं नाही; म्हणाली...
8
एक दोन नाही...! पंधरा राज्यांमध्ये बहिणी झाल्या लाडक्या; त्या कुठे कुठे करतात खर्च...
9
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
10
'धुरंधर'च्या FA9LA गाण्यावर स्वत:च्याच लग्नात नाचला मराठी अभिनेता, सगळे बघतच राहिले, व्हिडीओ व्हायरल
11
महास्फोट! एपस्टीनच्या 'त्या' १० लाख कागदपत्रांमध्ये दडलंय काय? नेमकं सत्य काय? जगभरात खळबळ!
12
वर्षानुवर्षांची स्क्रिप्ट बदला, विकासावर बोला, हजार रुपये मिळवा : देवेंद्र फडणवीस
13
हमास प्रमुख इस्माईल हानियाला हत्येच्या काही वेळ आधीच गडकरी भेटलेले...; पहाटे ४ वाजता हॉटेलवर अधिकारी आले...
14
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
15
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
16
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
17
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
18
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
19
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
20
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus: संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत कोरोनावर चर्चा करण्यास चीनचा नकार; भारताने सुनावलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2020 10:43 IST

कोरोना व्हायरसबाबत चीनला एक ना एक दिवस जगाला माहिती द्यावीच लागेल

ठळक मुद्देजागतिक समस्येवर महत्त्वपूर्ण सूचना आणि पर्यायांवर एकमेकांशी चर्चा करणे गरजेचे आहेजागतिकीकरणामुळे प्रत्येक देश एकमेकांवर अवलंबून आहेतसर्वांनी एकत्र येऊन कोरोनासारख्या महामारीचा मुकाबला करायला हवा

नवी दिल्ली – संपूर्ण जगावर कोरोनाचं संकट उभं राहिलं असताना आतापर्यंत १० लाखांहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर ५९ हजारांहून अधिक रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मात्र ज्या कोरोना व्हायरसची सुरुवात चीनच्या वुहान शहरातून झाली त्याचा फटका आता चीनपेक्षाही इतर देशांना जास्त बसत आहे.

कोरोना व्हायरसबाबत चीनला एक ना एक दिवस जगाला माहिती द्यावीच लागेल. आपण एका वैश्विक जगात राहत आहे. जागतिक समस्येवर महत्त्वपूर्ण सूचना आणि पर्यायांवर एकमेकांशी चर्चा करणे गरजेचे आहे असं भारताचं प्रतिनिधित्व करणारे सैय्यद अकबरुद्दीन यांनी सांगितले. जगातील सर्व देश कोरोनाविरोधात संघर्ष करत आहे. आंतरराष्ट्रीय संस्था एकमेकांना सहकार्य करत काम करत आहेत. कोरोनाच्या संकटाशी सामना करण्यासाठी जागतिक बँकेकडून आर्थिक सहाय्य मिळत आहे.

संयुक्त राष्ट्र परिषदेत भारताचं प्रतिनिधित्व करणारे सैय्यद अकबरुद्दीन यांची इंडिया टुडेने मुलाखत घेतली. यापूर्वी आलेल्या रिपोर्टनुसार चीनने संयुक्त राष्ट्र परिषदेत वुहान आणि कोरोनाबाबत चर्चा करण्यासाठी नकार दिला आहे. मार्च महिन्यात चीनकडे १५ सदस्यीय सुरक्षा परिषदेचे अध्यक्षपद होते. यावर सैय्यद अकबरुद्दीन म्हणाले की, सुरक्षा परिषदकडे अजेंडा असतो. आतापर्यंत हा मुद्दा पटलावर न आल्याने यावर कोणतीही कमेंट करु शकत नाही. ही अनौपचारिक चर्चा आहे, आज नाहीतर उद्या यावर चर्चा होईल असं ते म्हणाले.

तसेच आपण एका वैश्विक जगामध्ये राहतो. जागतिकीकरणामुळे प्रत्येक देश एकमेकांवर अवलंबून आहेत आणि जागतिकीकरणाची प्रक्रिया विना अडथळा सुरु राहण्यासाठी जगाच्या हितासाठी प्रत्येक देशाने सहकार्य करणे आवश्यक आहे. प्रत्येक देश जगाच्या चांगल्यासाठी प्रय़त्न करत असतो. जगावर परिणाम होत असलेल्या मुद्द्यांशी संबंधित माहिती आणि तथ्ये जागतिक स्तरावर सामूहिक चर्चेत यावीत त्यावर उपाय शोधले जावेत असं मत सैय्यद अकबरुद्दीन यांनी मांडले. दरम्यान, कोणालाही दोष देण्याची ही वेळ नाही, परंतु तरीही सर्वांनी एकत्र उभे राहून मानवी अस्तित्वाला आव्हान देणाऱ्या महामारीविरोधात लढण्याची गरज आहे असंही ते म्हणाले.

पारदर्शक आणि वैज्ञानिक मार्गाने चर्चा झाली पाहिजे

सय्यद अकबरुद्दीन म्हणाले की कोरोना विषाणू नावाच्या या साथीला जर समजावून घ्यायचे असेल तर आपण पारदर्शक, वैज्ञानिक पद्धतीने आणि मोकळेपणाने हा प्रश्न समजून घ्यावा लागेल. एक वेळ येईल जेव्हा आपण या संकटावर मात करू, आता आपल्या अस्तित्वाला आव्हान देणाऱ्या या आजाराशी लढा देण्याची गरज आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याchinaचीनIndiaभारत