शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींचा दावा फॅक्ट चेकमध्ये निघाला खरा, एकच व्यक्ती ४ ठिकाणी मतदार, नंबर सारखाच
2
ओबीसी क्रिमिलेअर उत्पन्न मर्यादेचा, दर ३ वर्षांनी आढावा घ्या; इतर मागासवर्गीयांसाठी नियुक्त समितीची शिफारस
3
जिथे-जिथे नवीन मतदार तिथे-तिथे भाजपचा विजय! राहुल गांधी यांची टीका; प्रियांका गांधी म्हणाल्या...
4
रागाने गेलेला मुलगा आठ वर्षांनी परतला, पोलिसांकडून ‘सरप्राईज गिफ्ट’; आई-वडिलांचे डोळे अश्रूंनी डबडबले 
5
अमेरिकेकडून शस्त्रास्त्रं खरेदी थांबविल्याच्या वृत्ताचे भारताकडून जोरदार खंडन; संरक्षण मंत्रालयानं स्पष्टच सांगितलं 
6
८० एकरांत २५ फूट गाळ, अजूनही दबलेत १५० जण; आधुनिक मशिन धरालीत येण्यास लागणार ४ दिवस
7
निवडणूक आयोग शपथपत्र द्यायला सांगतोय; पण मी आधीच संसदेत शपथ घेतली आहे : राहुल गांधी
8
महादेवी हत्तीणीसाठी सोमवारी सर्वाेच्च न्यायालयाला साकडे, राज्य सरकार, वनतारा, नांदणी मठ देणार एकत्रित विनंतीअर्ज
9
इंडिया आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरे शेवटच्या रांगेत; शिंदेसेनेचे आंदोलन, तर भाजपची टीका
10
एकाच वेळी चार विद्यार्थ्यांची अंत्ययात्रा, हमसून-हमसून धाय मोकलून रडले गाव...
11
पडळकर समर्थकाचे अपहरण, पाच तासांत आरोपी ताब्यात; रोहित पवार मास्टरमाइंड असल्याचा आरोप
12
"पुणे तर ‘फ्युचर सिटी’; १० वर्षांत कायापालट; शहरासाठी आणखी पाच पोलिस ठाणी" 
13
कावडयात्रेत घुसला भरधाव ट्रक; दोन शिवभक्तांचा मृत्यू
14
उद्योगांची एक्स्प्रेस सुस्साट, प्रक्रिया सुलभ आणि वेगवान; गुंतवणूकदारांना मोठा दिलासा
15
ठाण्यात कैद्यांच्या बंदोबस्तामध्ये हलगर्जीपणा, नऊ पोलिस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई
16
महादेवीसाठी महाराष्ट्रात तोडीच्या सुविधा नाहीत; पेटाच्या नव्या भूमिकेवर मठाचे स्पष्टीकरण
17
जोपर्यंत टॅरिफचा प्रश्न सुटत नाही, तोपर्यंत भारतासोबत व्यापार चर्चा होणार नाही - ट्रम्प
18
'भारत आता कुणासमोरही झुकणार नाही', 'ट्रम्प टॅरिफ बॉम्ब'वर केंद्रीय मंत्री पीयुष गोयल काय बोलले?
19
'कुठून मी या पुण्याचा पालकमंत्री झालो, जो तो उठतो अन्...'; अजित पवारांनी जोडले हात, असं काय घडलं?
20
'एकाच घराच्या पत्त्यावर 80 मतदार आहेत, कारण..."; राहुल गांधींचा आरोप, बूथ लेव्हल ऑफिसरने केला खुलासा 

चीन आणि WHO ला कोरोना रोखणं होतं शक्य, वाचला असता लाखो लोकांचा जीव पण...; रिपोर्टमधून मोठा खुलासा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2021 14:22 IST

CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोना संदर्भात मोठ्या प्रमाणात संशोधन सुरू असून रोज नवनवीन माहिती समोर येत आहे.

जगभरातील सर्वच देश हे कोरोना संकटाचा सामना करत आहेत. अनेक देशात कोरोनामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली असून पुन्हा एकदा कठोर नियम हे लागू करण्यात येत आहे. जगभरातील कोरोना रुग्णांची संख्या 96,029,459 वर पोहोचली आहे. तर आतापर्यंत कोरोनामुळे 2,049,957 लोकांना आपला जीव गमावावा लागला आहे. जगभरातील काही देशांमध्ये कोरोनाचे लसीकरण सुरू करण्यात आले आहे. कोरोना संदर्भात मोठ्या प्रमाणात संशोधन सुरू असून रोज नवनवीन माहिती समोर येत आहे. असाच एक धक्कादायक खुलासा हा रिसर्चमधून करण्यात आला आहे. चीन आणि WHO ने ठरवलं असतं तर कोरोनाला रोखता आलं असतं असा खुलासा करण्यात आला आहे. 

चीन आणि जागतिक आरोग्य संघटनेने ठरवलं असतं तर लाखो लोकांचा जीव वाचवता आला असता असं इंडिपेंडेंट पॅनल फॉर पॅन्डामिक प्रिपेयर्डनेस अँड रिस्पॉन्सने आपल्या एका रिपोर्टमध्ये नमूद केलं आहे. स्वतंत्र पॅनेलने जाहीर केलेल्या या रिपोर्टमध्ये चीनने जर ठरवलं असतं असल्यास कोरोना व्हायरसचा जगभरात होत असलेला प्रसार रोखू शकला असता, मात्र तसं झालं नाही. तसेच यासाठी जागतिक आरोग्य संघटनेला देखील जबाबदार धरण्यात आलं आहे कारण जेव्हा कोरोना व्हायरसची पहिली घटना चीनमध्ये नोंदली गेली तेव्हा जागतिक आरोग्य संघटना बीजिंगबरोबर त्याचा खात्मा करण्यासाठी एकत्र काम करू शकली असती. मात्र आज संपूर्ण जगाला त्याचा हा त्रास सहन करावा लागत असल्याचं म्हटलं आहे. 

कोरोनाबाबतच्या या निष्काळजीपणामध्ये केवळ चीनच नाही तर WHO सुद्धा समान भागीदार असल्याचं या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. जर या दोघांनी सुरुवातीलाच वेगाने कार्य केलं असतं आणि जगभरात जनजागृती केली असती तर आज लाखो लोकांचे जीव वाचू शकतात. रिपोर्टमध्ये जागतिक आरोग्य संघटनेवर टीका करण्यात आली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणात उपाययोजना केल्या जात आहेत. तसेच मास्क, सोशल डिस्टंसिंग, क्वारंटाईनच्या माध्यमातून काळजी घेतली जात आहे. 

आता गांजा वाचवू शकतो कोरोनाग्रस्तांचा जीव, रिसर्चमधून दावा

जगभरातील संशोधक कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी आणि कोरोनाचा खात्मा करण्यासाठी कोणतं औषध परिणामकारक ठरेल याचा शोध घेत आहे. याच दरम्यान कॅनडामधील एका विद्यापीठाने एक कोरोनाबाबत एक महत्त्वाचा दावा केला आहे. कोरोनाचा सर्वाधिक धोका असणाऱ्या वयोगटातील आणि गंभीर आजार असणाऱ्यांना गांजाचा वापर करून वाचवता येऊ शकतं असा दावा केला आहे. या रिसर्चनुसार शरीरामधील रोगप्रतिकारशक्ती आणखी सक्षम करण्यासाठी गांजाचं सेवन करणं फायद्याचं ठरतं. कोरोना तसेच इतर गंभीर आजार असणाऱ्या व्यक्तींवर गांजाचा अंश असणाऱ्या औषधांचा वापर करण्यास सुरुवात करता येईल असा खुलासा संशोधकांनी केला आहे. डेली मेलने दिलेल्या वृत्तानुसार कॅनडामधील लेथब्रिज विद्यापिठामधील संशोधकांच्या एका गटाने दावा केला आहे.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याchinaचीनWorld health organisationजागतिक आरोग्य संघटना