शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

कोरोना विषाणूंच्या बळींची संख्या 259 वर; चीनमध्ये 12 हजार जणांना संसर्ग

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2020 06:46 IST

१७९५ रुग्णांची प्रकृती गंभीर; २,१०२ नवी प्रकरणे समोर

बीजिंग : चीनमध्येकोरोना विषाणूंमुळे मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांची संख्या २५९ झाली आहे, तर ११,७९१ लोकांना संसर्ग झाला आहे. आता दुसरे देश आपल्या नागरिकांना हुबेई प्रांतातून बाहेर काढण्यासाठी विमान पाठवत आहेत.

केरळात पहिला रुग्ण समोर आला आहे. वृत्त एजन्सी शिन्हुआनुसार, १,३६,९८७ अशा लोकांची ओळख पटली आहे, जे कोरोनाने पीडित लोकांच्या संपर्कात आले होते. यातील ६,५०९ जणांना वैद्यकीय निगराणीनंतर शुक्रवारी सुट्टी देण्यात आली. चीनमधील १,७९५ रुग्णांची प्रकृती गंभीर आहे, तर एकूण १७,९८८ लोकांना संसर्ग झाल्याची शंका आहे. एकूण २४३ जणांना उपचारानंतर हॉस्पिटलमधून सुट्टी देण्यात आली आहे. शुक्रवारी संसर्गाची २,१०२ नवे प्रकरणे समोर आली आहेत. यूनिव्हर्सिटी आॅफ हाँगकाँगच्या शास्त्रज्ञांच्या अध्ययनानुसार, वुहानमध्ये ७५,८१५ नागरिकांना संसर्ग झालेला असू शकतो.

‘त्या’ प्रवाशांवर अमेरिकेची बंदी

ज्या प्रवाशांनी गत दोन आठवड्यांत चीनचा प्रवास केला होता, अशा प्रवाशांच्या प्रवेशास अमेरिकेने अस्थायी बंदी आणली आहे. मानव सेवा विभागाचे सचिव एलेक्स अजार यांनी सांगितले की, अमेरिकी नागरिक आणि स्थायी निवासींच्या कुटुंबांचे निकटचे सदस्य यांच्याशिवाय चीनचा प्रवास करून आलेल्या नागरिकांना प्रवेशबंदी असेल.

३२४ भारतीयांना चीनमधून आणले

वुहानमध्ये अडकलेल्या सहा भारतीयांना ताप असल्याने एअर इंडियाच्या पहिल्या विशेष उड्डाणात बसू दिले नाही. तेथील भारतीयांना आणण्यासाठी एअर इंडियाचे दुसरे विमान दिल्ली विमानतळावरून दाखल झाले आहे. तत्पूर्वी, एअर इंडियाच्या एका विमानातून चीनच्या वुहानमधून ३२४ भारतीयांना घेऊन एक विमान शनिवारी सकाळी दिल्लीत दाखल झाले. वुहानमधून आणलेल्या भारतीयांत ३ अल्पवयीन, २११ विद्यार्थी आणि ११० कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

टॅग्स :corona virusकोरोनाchinaचीनIndiaभारत