शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
5
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
6
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
7
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
8
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
9
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
10
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
11
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
12
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
13
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
14
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
15
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
16
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
17
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
18
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ
19
"सत्याचा मोर्चा नाही तर ढोंग्यांचा मोर्चा..."; मनसे-मविआच्या मोर्चाला गुणरत्न सदावर्तेंचा विरोध
20
१ नोव्हेंबरपासून 'हे' महत्वाचे नियम बदलणार; बँक खातेधारकांपासून ते सरकारी कर्मचाऱ्यांपर्यंत, सर्वांवरच परिणाम होणार!

सेमीकंडक्टरसाठी भारताशी सहकार्य; परराष्ट्रमंत्री डॉ. लीन जिया लाँग यांचे वक्तव्य

By विजय बाविस्कर | Updated: October 10, 2024 07:29 IST

तैवान व भारतामध्ये सहकार्य वाढले पाहिजे. भारताने प्रगतीबाबत जी महत्त्वाकांक्षा बाळगली आहे, त्याच्याशी सुसंगत अशीच ही पावले आहेत. 

विजय बाविस्कर, थेट तैवान येथून, लोकमत न्यूज नेटवर्क, तैपेई : भारत, तैवानला चीनच्या विस्तारवादाचा, आर्थिक बळजोरीचा सामना करावा लागत आहे, असे तैवानचे परराष्ट्रमंत्री डॉ. लीन जिया लाँग यांनी म्हटले आहे. त्यांनी सांगितले की, भारत व तैवानच्या अर्थव्यवस्था परस्परांना पूरक आहेत. दोन्ही देशांतील व्यापार वाढविण्यास मुक्त व्यापार करार (एफटीए) करता येईल किंवा तैवानमधील लघु व मध्यम उद्योगांना भारतीय बाजारपेठेत गुंतवणुकीसाठी अनुकूल वातावरण भारत निर्माण करू शकतो.

तैवानमध्ये १० ऑक्टोबरला राष्ट्रीय दिनानिमित्त मोठा समारंभ होणार असून, त्यासाठी भारतासह अन्य देशांतील पत्रकारांना आमंत्रित करण्यात आले आहे. या पत्रकारांशी डॉ. लीन जिया लाँग संवाद साधत होते.  

तैवानचे भारतविषयक परराष्ट्र धोरण नेमके काय आहे असा प्रश्न ‘लोकमत’ने डॉ. लीन जिया लाँग यांना विचारला. त्यावर ते म्हणाले की, तैवान सेमीकंडक्टर मॅन्युफॅक्चरिंग कंपनी विविध देशांत गुंतवणूक करत आहे. पॉवरचीप सेमीकंडक्टर मॅन्युफॅक्चरिंग कॉर्पोरशनने  व अन्य एक सेमीकंडक्टर कंपनी भारत सरकारबरोबर सहप्रकल्प साकारत आहे. तैवान व भारतामध्ये सहकार्य वाढले पाहिजे. भारताने प्रगतीबाबत जी महत्त्वाकांक्षा बाळगली आहे, त्याच्याशी सुसंगत अशीच ही पावले आहेत. 

तैवान ही हार्डवेअरची तर भारत सॉफ्टवेअरची महासत्ता आहे. जगात एआयचे महत्त्व वाढत असताना त्यासाठी या दोन्ही गोष्टींची नितांत गरज आहे. त्यासाठी दोन्ही महासत्तांनी एकत्र येणे गरजेचे आहे. - डॉ. लीन जिया लाँग, परराष्ट्रमंत्री, तैवान.

 

टॅग्स :Internationalआंतरराष्ट्रीय