शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
2
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
3
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
4
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
5
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
6
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
7
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
8
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
9
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
10
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
11
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
12
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
13
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
14
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
15
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
16
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
17
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!
18
Pune Rave Party: "तुमच्या तर दिव्याखालीच अंधार"; चित्रा वाघांनी सुप्रिया सुळे, रोहिणी खडसेंना सुनावले
19
"पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विष्णूचे ११ वे अवतार, डोनाल्ड ट्रम्प त्यांना..."; भाजपा नेत्याचा मोठा दावा
20
आजारी लेकीला रुग्णालयात घेऊन चाललेले वडील, BMW ची धडक; मन हेलावून टाकणारी घटना

सेमीकंडक्टरसाठी भारताशी सहकार्य; परराष्ट्रमंत्री डॉ. लीन जिया लाँग यांचे वक्तव्य

By विजय बाविस्कर | Updated: October 10, 2024 07:29 IST

तैवान व भारतामध्ये सहकार्य वाढले पाहिजे. भारताने प्रगतीबाबत जी महत्त्वाकांक्षा बाळगली आहे, त्याच्याशी सुसंगत अशीच ही पावले आहेत. 

विजय बाविस्कर, थेट तैवान येथून, लोकमत न्यूज नेटवर्क, तैपेई : भारत, तैवानला चीनच्या विस्तारवादाचा, आर्थिक बळजोरीचा सामना करावा लागत आहे, असे तैवानचे परराष्ट्रमंत्री डॉ. लीन जिया लाँग यांनी म्हटले आहे. त्यांनी सांगितले की, भारत व तैवानच्या अर्थव्यवस्था परस्परांना पूरक आहेत. दोन्ही देशांतील व्यापार वाढविण्यास मुक्त व्यापार करार (एफटीए) करता येईल किंवा तैवानमधील लघु व मध्यम उद्योगांना भारतीय बाजारपेठेत गुंतवणुकीसाठी अनुकूल वातावरण भारत निर्माण करू शकतो.

तैवानमध्ये १० ऑक्टोबरला राष्ट्रीय दिनानिमित्त मोठा समारंभ होणार असून, त्यासाठी भारतासह अन्य देशांतील पत्रकारांना आमंत्रित करण्यात आले आहे. या पत्रकारांशी डॉ. लीन जिया लाँग संवाद साधत होते.  

तैवानचे भारतविषयक परराष्ट्र धोरण नेमके काय आहे असा प्रश्न ‘लोकमत’ने डॉ. लीन जिया लाँग यांना विचारला. त्यावर ते म्हणाले की, तैवान सेमीकंडक्टर मॅन्युफॅक्चरिंग कंपनी विविध देशांत गुंतवणूक करत आहे. पॉवरचीप सेमीकंडक्टर मॅन्युफॅक्चरिंग कॉर्पोरशनने  व अन्य एक सेमीकंडक्टर कंपनी भारत सरकारबरोबर सहप्रकल्प साकारत आहे. तैवान व भारतामध्ये सहकार्य वाढले पाहिजे. भारताने प्रगतीबाबत जी महत्त्वाकांक्षा बाळगली आहे, त्याच्याशी सुसंगत अशीच ही पावले आहेत. 

तैवान ही हार्डवेअरची तर भारत सॉफ्टवेअरची महासत्ता आहे. जगात एआयचे महत्त्व वाढत असताना त्यासाठी या दोन्ही गोष्टींची नितांत गरज आहे. त्यासाठी दोन्ही महासत्तांनी एकत्र येणे गरजेचे आहे. - डॉ. लीन जिया लाँग, परराष्ट्रमंत्री, तैवान.

 

टॅग्स :Internationalआंतरराष्ट्रीय