शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
2
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
3
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
4
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
5
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
6
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
7
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट
8
अरे बापरे! डोक सटकलं आणि गेम झोनच्या कर्मचाऱ्याचे नाक युवकाने हातोड्याने फोडले
9
११ कोटींची लॉटरी जिंकणारा 'तो' व्यक्ती अखेर सापडला! रस्त्यावर विकत होता कांदे-बटाटे अन्...
10
Smartphones: २४ जीबी रॅम, ७५०० mAh बॅटरी आणि सुपरफास्ट चार्जिंग; जबरदस्त फोन लॉन्च!
11
आता 'या' देशात पर्यटकही धूम्रपान करू शकणार नाहीत! सेलिब्रेटींमध्ये लोकप्रिय असणाऱ्या देशाचे नियम बदलले
12
भारताला डिवचण्याचा प्रयत्न; मोहम्मद युनूस यांनी पाकिस्ताननंतर तुर्कीला दिला वादग्रस्त नकाशा
13
Viral Video: लग्नात स्वयंपाक बनवताना तरुणाचं घाणेरडं कृत्य; व्हिडिओ समोर येताच अटक!
14
३०, ४० आणि ५० व्या वर्षी 'कोट्यधीश' व्हायचेय? तुमच्या वयानुसार निवडा गुंतवणुकीची योग्य स्ट्रॅटेजी!
15
Maharashtra Local Body Elections: २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतीसाठी निवडणूक जाहीर; 'असा' आहे कार्यक्रम, 'दुबार मतदार'ही समजणार
16
ICC Rankings : हातात विश्वचषकाचा 'दागिना'; पण जाता जाता लॉरानं 'वनडे क्वीन’ स्मृतीचा मुकूट हिसकावला!
17
दुबार मतदारांच्या नावासमोर 'डबल स्टार' येणार; राज्य निवडणूक आयोगाचं मोठं पाऊल, कशी असेल नवी मोहीम?
18
सलग चौथ्या दिवशी बाजारात घसरण! गुंतवणूकदारांचे २.६ लाख कोटी पाण्यात; 'ही' आहेत ५ कारणे
19
लग्नात का येताहेत समस्या? कोणत्या सुधारणा आवश्यक? न्यायालयानं स्पष्टच सांगितलं
20
मंदिराच्या गर्भगृहाची दुरुस्ती करताना सापडलं घबाड, कलशात होती सोन्याची एवढी नाणी...  

Bhushan Gavai: संविधान हा सतत विकसित होणारा दस्तऐवज- सरन्यायाधीश

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2025 14:34 IST

भारतीय संविधान हा एक सतत विकसित होणारा दस्तऐवज असल्याचे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी म्हटले आहे.

लंडन: भारतीय संविधान हा एक सतत विकसित होणारा दस्तऐवज आहे. तो एक प्रकारचा सामाजिक करार असून त्याने जातीपाती, भेदभाव, अन्याय या गोष्टी अमान्य केल्या आहेत, असे प्रतिपादन सरन्यायाधीश भूषण गवई यांनी एडिनबर्ग लाॅ स्कूल येथील एका कार्यक्रमात शुक्रवारी केले.

ते म्हणाले की, भारतीय संविधानात असलेल्या परिवर्तनशीलतेमुळे शोषित वर्गांना न्याय मिळण्याची आशा कायम जिवंत राहिली आहे. आरक्षण ही केवळ जागांची विभागणी नसून ती एक नैतिक तसेच लोकशाहीची गरज आहे. विषमतेने भरलेल्या समाजात सत्ता समतोल साधण्यासाठी आरक्षणाची तरतूद आवश्यक आहे. हे विषद करताना गवई यांनी राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या वक्तव्यांचेही दाखले आपल्या भाषणात दिले. आपले प्रारंभीचे दिवस ते सरन्यायाधीशपदावर नियुक्ती होणे हा सारा जीवनप्रवास सरन्यायाधीश गवई यांनी उलगडून दाखविला. 

गवई यांनी सांगितले की, ट्रान्सजेंडर व्यक्तींना त्यांचे हक्क प्रदान करण्याचा निकाल नाल्सा प्रकरणात घेण्यात आला. तसेच लष्करात महिलांना पुरुषांप्रमाणेच दीर्घकालीन सेवेची संधी मिळायला हवी, त्यांची विविध महत्त्वाच्या पदांवर नियुक्ती व्हावी याकरिता सर्वोच्च न्यायालयाने बबिता पुनिया खटल्याचा निकाल देताना मार्ग मोकळा करून दिला.

‘भावी पिढ्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी संविधान सक्षम’सरन्यायाधीश भूषण गवई म्हणाले की, भारतीय लोकशाही सतत विकसित होत आहे. महिलांकरिता राजकीय आरक्षणासंदर्भात नुकत्याच झालेल्या घटनादुरुस्त्या आणि अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणास सर्वोच्च न्यायालयाने दिलेली मान्यता या गोष्टींचा उल्लेख त्यांनी केला. भारतीय संविधान हा लवचिक आणि सतत नव्याला गोष्टींना सामोरे जाणारा व योग्य गोष्टींचा स्वत:मध्ये अंतर्भाव करणारा महत्त्वाचा दस्तऐवज आहे. भावी पिढ्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी हे संविधान सक्षम आहे, असेही ते म्हणाले.