शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू- काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात पुण्यातील दोघांचा मृत्यू
2
सौदीतून परतलेल्या मोदींना डोभाल आणि जयशंकर यांनी विमानतळावरच दिली पहलगाम हल्ल्याबाबत माहिती, मोठा निर्णय होणार?   
3
पत्नीच्या मदतीनं करू शकता ₹४४,७९३ च्या मंथली पेन्शनचा जुगाड; एका झटक्यात मिळतील ₹१,११,९८,४७१
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर उरीमध्ये घुसखोरीचा प्रयत्न उधळला; लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरूच
5
पहलगाम हल्ल्यावरून राज ठाकरे संतप्त, केंद्राला म्हणाले, "दहशतवाद्यांच्या पुढच्या १० पिढ्यांचा थरकाप उडेल असा...’’,   
6
Pahalgam Terror Attack: गोळ्या झाडल्या जात होत्या, मागे राहिलेले मारले जात होते... धावत होते
7
काश्मिरात अतिरेकी हल्ला, २८ ठार; 'टार्गेट किलिंग'मध्ये महाराष्ट्रातील पर्यटकांचाही समावेश
8
UPSC Result : वडिलांचे छत्र हरपले तरी साेडली नाही जिद्द; पुण्यात राहून घेतली ‘यूपीएससी’त झेप
9
भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वानं टाकला नवा बॉम्ब; आजी-माजी आमदार, खासदारांना दणका
10
UPSC Result : निरक्षर आईने दाखविला यूपीएससीचा मार्ग;डाॅ. अक्षय मुंडे याची यशाला गवसणी
11
अहिल्यानगरमधील चोंडीतील मंत्रिमंडळ बैठक पुढे ढकलली; नवी तारीख कोणती?
12
Todays Horoscope : आज आर्थिक गुंतवणूक विचारपूर्वक करा; जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
13
वाह रे पठ्ठया...! २२ व्या वर्षीच झाला आयएएस; पुण्याच्या शिवांशचं पहिल्याच प्रयत्नात यश
14
रुपचंदानी कुटुंबीय पहलगाममध्ये सुखरूप; काळजीनं नातेवाईकांचा जीव लागला होता टांगणीला
15
'यूपीएससी'त पुण्याचा अर्चित डोंगरे तिसरा; राज्यातील ९५ विद्यार्थ्यांनी घातली यशाला गवसणी
16
पोप फ्रान्सिस यांच्या निधनामुळे कर्मयोगी जवाहरलाल दर्डा यांच्या पुतळ्याचे अनावरण स्थगित
17
KL राहुलचं एकदम कूल सेलिब्रेशन! मग संजीव गोयंका यांच्या हातात हात दिला; पण... (VIDEO)
18
मत्स्य व्यवसायाला कृषी समकक्ष दर्जा, मंत्रिमंडळाचा निर्णय; मच्छीमारांना ६ हजाराचा लाभ मिळणार
19
भिसेंवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांची होणार चौकशी; महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचा निर्णय
20
एक मंदिर, एक विहीर, एक स्मशान...डॉ. भागवतांच्या संप्रदायाला ही एकता समजली तरी खूप बरे होईल

कंगाल पाकिस्तानवर युद्धाचे ढग, नव्या युद्धाला तोंड फुटण्याची शक्यता; विश्लेषकांच्या दाव्याने खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2025 18:14 IST

गेल्या काही महिन्यांपासून अफगानिस्तान आणि पाकिस्तानच्या सीमेवर सातत्याने अफगाणिस्तानचे दहशतवादी हल्ले करत आहेत. जे पाकिस्तानने भारतासोबत केले तेच आता त्यांच्यासोबत होऊ लागले आहे.

गेल्या काही दशकांत सतत भारताशी युद्ध करून सतत हरणाऱ्या पाकिस्तानवर नव्या युद्धाला सामोरे जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. भारताविरोधात दहशतवादाला पोसून आधीच कंगाल झालेल्या पाकिस्तानला त्यांनीच पाळलेला अस्तनीतला साप डसू लागला आहे. अमेरिकेला या सापाचे तोंड ठेचता आले नाही त्याला संपविण्यासाठी पाकिस्तान युद्ध पुकारण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 

गेल्या काही महिन्यांपासून अफगानिस्तान आणि पाकिस्तानच्या सीमेवर सातत्याने अफगाणिस्तानचे दहशतवादी हल्ले करत आहेत. जे पाकिस्तानने भारतासोबत केले तेच आता त्यांच्यासोबत होऊ लागले आहे. अफगानिस्तानचे दहशतवादी पाकिस्तानचे एकामागोमाग एक लचके तोडू लागले आहेत. यामुळे पाकिस्तानला आता तालिबानशी युद्ध करावे लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याच पाकिस्तानने अमेरिका अफगानिस्तान सोडून जात असताना तालिबानी दहशतवाद्यांना शरण दिली होती, ट्रेन केले होते आणि त्यांना पुन्हा अफगानिस्तानमध्ये घुसविले होते.

अफगानिस्तान ताब्यात घेतल्यानंतर आता हेच दहशतवादी पुन्हा पाकिस्तान सीमेवर आले आहेत.  पाकिस्तानचे पत्रकार आणि विश्लेषक सुहेल वराइच यांनी पाकिस्तान एका नव्या युद्धाच्या दिशेने जात असल्याचे म्हटले आहे. याचा भौगोलिक आणि राजनितीक परिणाम होणार असल्याचाही त्यांनी अंदाज व्यक्त केला आहे. 

पाकिस्तानचा इतिहास हा युद्ध आणि संघर्षांनी भरलेला आहे. स्वातंत्र्यानंतर पाकिस्तानने सहा युद्ध लढली आहेत. तसेच अनेक सीक्रेट युद्धांत सहभागी झाला आहे. पाकिस्तानच्या सीमा या भारत, अफगानिस्तान, इराण आणि चीनला लागून आहेत. चीन सोडला तर उर्वरित सर्व देशांसोबत काही ना काही वाद सुरु आहेत. भारताविरोधातच पाकिस्तानने चार युद्धे लढली आहेत, असे ते म्हणाले. 

''भारताशी युद्ध करून चांगले केले''  पाकिस्तानच्या सार्वभौमत्वाचे रक्षण करण्यासाठी भारतासोबत युद्धे आवश्यक होती. जर पाकिस्तानने लढाई केली नसती तर नेपाळ आणि भूतानप्रमाणे ते भारतासमोर शरण गेले असते. या युद्धांनी हे सिद्ध केले की पाकिस्तान एक स्वतंत्र राष्ट्र आहे आणि भारतासारख्या मोठ्या देशासमोर झुकणार नाही. भारतासोबत मिळते जुळते घेतले असते तर पाकिस्तानमध्ये शांतता आणि आर्थिक विकास होऊ शकला असता, परंतु त्याची किंमत काश्मीर मुद्द्यावरील आपली भूमिका सोडून देणे ही होती, असेही ते म्हणाले.  

टॅग्स :Pakistanपाकिस्तानAfghanistanअफगाणिस्तानTalibanतालिबान