शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
3
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
4
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
5
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
6
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
7
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
8
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
9
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
10
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
11
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
12
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
13
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
14
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
15
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
16
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
17
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
18
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
19
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
20
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन

कंगाल पाकिस्तानवर युद्धाचे ढग, नव्या युद्धाला तोंड फुटण्याची शक्यता; विश्लेषकांच्या दाव्याने खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2025 18:14 IST

गेल्या काही महिन्यांपासून अफगानिस्तान आणि पाकिस्तानच्या सीमेवर सातत्याने अफगाणिस्तानचे दहशतवादी हल्ले करत आहेत. जे पाकिस्तानने भारतासोबत केले तेच आता त्यांच्यासोबत होऊ लागले आहे.

गेल्या काही दशकांत सतत भारताशी युद्ध करून सतत हरणाऱ्या पाकिस्तानवर नव्या युद्धाला सामोरे जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. भारताविरोधात दहशतवादाला पोसून आधीच कंगाल झालेल्या पाकिस्तानला त्यांनीच पाळलेला अस्तनीतला साप डसू लागला आहे. अमेरिकेला या सापाचे तोंड ठेचता आले नाही त्याला संपविण्यासाठी पाकिस्तान युद्ध पुकारण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 

गेल्या काही महिन्यांपासून अफगानिस्तान आणि पाकिस्तानच्या सीमेवर सातत्याने अफगाणिस्तानचे दहशतवादी हल्ले करत आहेत. जे पाकिस्तानने भारतासोबत केले तेच आता त्यांच्यासोबत होऊ लागले आहे. अफगानिस्तानचे दहशतवादी पाकिस्तानचे एकामागोमाग एक लचके तोडू लागले आहेत. यामुळे पाकिस्तानला आता तालिबानशी युद्ध करावे लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याच पाकिस्तानने अमेरिका अफगानिस्तान सोडून जात असताना तालिबानी दहशतवाद्यांना शरण दिली होती, ट्रेन केले होते आणि त्यांना पुन्हा अफगानिस्तानमध्ये घुसविले होते.

अफगानिस्तान ताब्यात घेतल्यानंतर आता हेच दहशतवादी पुन्हा पाकिस्तान सीमेवर आले आहेत.  पाकिस्तानचे पत्रकार आणि विश्लेषक सुहेल वराइच यांनी पाकिस्तान एका नव्या युद्धाच्या दिशेने जात असल्याचे म्हटले आहे. याचा भौगोलिक आणि राजनितीक परिणाम होणार असल्याचाही त्यांनी अंदाज व्यक्त केला आहे. 

पाकिस्तानचा इतिहास हा युद्ध आणि संघर्षांनी भरलेला आहे. स्वातंत्र्यानंतर पाकिस्तानने सहा युद्ध लढली आहेत. तसेच अनेक सीक्रेट युद्धांत सहभागी झाला आहे. पाकिस्तानच्या सीमा या भारत, अफगानिस्तान, इराण आणि चीनला लागून आहेत. चीन सोडला तर उर्वरित सर्व देशांसोबत काही ना काही वाद सुरु आहेत. भारताविरोधातच पाकिस्तानने चार युद्धे लढली आहेत, असे ते म्हणाले. 

''भारताशी युद्ध करून चांगले केले''  पाकिस्तानच्या सार्वभौमत्वाचे रक्षण करण्यासाठी भारतासोबत युद्धे आवश्यक होती. जर पाकिस्तानने लढाई केली नसती तर नेपाळ आणि भूतानप्रमाणे ते भारतासमोर शरण गेले असते. या युद्धांनी हे सिद्ध केले की पाकिस्तान एक स्वतंत्र राष्ट्र आहे आणि भारतासारख्या मोठ्या देशासमोर झुकणार नाही. भारतासोबत मिळते जुळते घेतले असते तर पाकिस्तानमध्ये शांतता आणि आर्थिक विकास होऊ शकला असता, परंतु त्याची किंमत काश्मीर मुद्द्यावरील आपली भूमिका सोडून देणे ही होती, असेही ते म्हणाले.  

टॅग्स :Pakistanपाकिस्तानAfghanistanअफगाणिस्तानTalibanतालिबान