शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
3
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
4
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
5
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
6
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
7
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
8
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
9
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
10
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
11
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
12
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
13
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
14
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
15
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
16
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
17
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
18
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
19
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
20
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
Daily Top 2Weekly Top 5

भारतीय लष्कराच्या दणक्याने ड्रॅगनचे धाबे दणाणले, राजनाथ सिंहांच्या भेटीसाठी मॉस्कोमध्ये चिनी संरक्षण मंत्र्यांची धावाधाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2020 07:18 IST

भारतीय लष्कराने प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर तैनाती वाढवल्याने घुसखोरीच्या प्रयत्नात असलेल्या चीनची कोंडी झाली आहे.

मॉस्को/ नवी दिल्ली - पूर्व लडाखमध्ये भारत आणि चीनमध्ये सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर चीनचे संरक्षण मंत्री वेई फेंघे यांनी भारतासोबत चर्चा करण्याची विनंती केली आहे. सूत्रांकडून मिळत असलेल्या माहितीनुसार चीनचे संरक्षण मंत्री वेई फेंघे यांनी भारताचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्यासोबत चर्चा करण्यासाठी शुक्रवारची वेळ मागितली आहे. मात्र भारताकडून त्याला अद्याप प्रतिसाद देण्यात आलेला नाही.भारत आणि चीनच्या सैन्यामध्ये गेल्या पाच महिन्यांपासून लडाखमध्ये तणावपूर्ण परिस्थिती आहे. दरम्यान, २९-३० रोजी पँगाँग सरोवर परिसरात झालेल्या झटापटीवेळी भारतीय लष्कराने चिनी सैन्याला पुन्हा एकदा आपला हिसका दाखवला होता. तसेच सामरिक दृष्ट्या महत्त्वपूर्ण भागांवर आपले पाय रोवले होते. त्यामुळे चिनी सैन्याला माघार घ्यावी लागली होती. दरम्यान, भारतीय लष्कराने प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर तैनाती वाढवल्याने घुसखोरीच्या प्रयत्नात असलेल्या चीनची कोंडी झाली आहे.

दरम्यान, सध्या भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि त्यांचे चिनी समकक्ष वेई फेंघे हे शांघाई सहयोग संघटना (एससीओ) च्या बैठकीसाठी मॉस्कोमध्ये आहेत. दरम्यान, चिनी संरक्षण मंत्र्यांनी लडाखमध्ये तणाव वाढलेला असतानाच चर्चेसाठी विनंती केल्याने त्याचं महत्त्व वाढलं आहे.रशियासोबत मोठी डील! लडाखमध्ये लढण्यासाठी खतरनाक AK-47 203 मिळणारचीनला एकदा दोनदा नाही अनेकदा नडणाऱ्या भारतीय सैनिकांना मोठे घातक शस्त्र मिळणार आहे. भारत आणि रशियाने अद्ययावत अङ-47 203 रायफलींची डील फायनल केली आहे. जुन्या मॉडेलपेक्षा ही रायफल हिमालयाच्या पर्वतरांगांमध्ये, लडाखसारख्या किंवा कारगिलसारख्या उंच ठिकाणी लढण्यासाठी खूपच उपयुक्त आहे. यामुळे उंचीवर लपलेल्या शत्रूच्या सैनिकांना खालूनच अचूक टिपता येणार आहे. चीनसोबतचा तणाव आणि पूर्वोत्तर राज्यांमध्ये सीमाविवाद पाहता ही डील खूप महत्वाची मानली जात आहे. रशियन वृत्तसंस्थांनुसार भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह रशियाच्या दौऱ्यावर असून हा निर्णय त्यांच्याच मार्गदर्शनात घेण्यात आला आहे. महत्वाचे म्हणजे पहिली  AK-47  ही रायफल रशियानेच तयार केली होती. आता जगभरात या रायफली बनविल्या जातात. परंतू रशियाकडे सध्या नवीन पिढीची खतरनाक रायफल आहे. ही रायफल भारताकडील इन्सास रायफलींची जागा घेणार आहे. हिमालयाच्या उंच जागांवर ही रायफल जाम होणे किंवा मॅगझिन तुटण्यासारख्या घटना वाढल्या आहेत. यामुळे नवीन राफलची भारतीय सैन्याला नितांत गरज आहे. 

टॅग्स :india china faceoffभारत-चीन तणावIndiaभारतchinaचीनRajnath Singhराजनाथ सिंह