शहरं
Join us  
Trending Stories
1
अंकारा हादरलं! लिबियाच्या मिलिट्री चीफना घेऊन जाणारं विमान कोसळलं, एअरपोर्ट तडकाफडकी बंद
2
Silver Returns: २५ वर्षांत २६ पट; २००० साली चांदीत ₹१०,००० गुंतवले असते तर आज किती मालामाल असता?
3
मूळच्या गुजराती कुटुंबाने खरेदी केली 'पाकिस्तान एअरलाईन्स'; कोण आहेत कराचीतील उद्योगपती आरिफ हबीब?
4
कोडीन कफ सिरप तस्करीचा मास्टरमाइंड शुभम जायसवालवर ५० हजारांचं इनाम; आता संपत्तीवर चालणार बुलडोझर!
5
PPF Calculator: दर महिन्याला ₹२,०००, ₹३,००० आणि ₹५,००० गुंतवले तर मॅच्युरिटीवर किती रक्कम मिळेल; पैसेही राहतील सुरक्षित
6
पाहुणी म्हणून आली, लाखोंचे दागिने घेऊन पसार झाली; बंगळुरुमध्ये महिलेला अटक
7
बांगलादेश भारताकडून ५०,००० टन तांदूळ खरेदी करणार; दोन्ही देशांचे संबंध सुधारण्यासाठी युनूस सरकारचे प्रयत्न
8
३० वर्षांचा संसार, क्षणाचा राग अन् होत्याचं नव्हतं झालं; संशयी पतीने पत्नीला क्रूरपणे संपवलं
9
मोठा गेम प्लॅन! भाजपने शिंदेसेनेचे ठाण्यामध्येच दाबले नाक; मुंबईत अधिक जागा मागू नये म्हणून...
10
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २४ डिसेंबर २०२५: धनलाभ होईल, नवे काम हाती घ्याल!
11
कोर्टात कराड प्रथमच बोलला; पण न्यायाधीशांनी थांबवले; संतोष देशमुख हत्या प्रकरणी दोषारोप निश्चित
12
संपादकीय: त्रिशंकूंची त्रेधातिरपीट! एचवन-बी व्हिसाधारक आज अक्षरशः लटकले आहेत...
13
महापालिका निवडणूक : मुंबईत भाऊबंध प्रयोगाचा आज आरंभ; पुण्यात पवार काका पुतण्यांचे मनाेमिलन होणार
14
बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी उद्धव ठाकरेंना काेर्टाचा दिलासा; मुलीनंतर पित्याची याचिका फेटाळली
15
पाच लाखांची लाच घेताना जीएसटी अधीक्षकाला अटक; अधिकाऱ्याकडे सापडले घबाड, सीबीआयची कारवाई
16
सरकारला मजुरांच्या घामाची किंमत आहे का? मनरेगा बदलण्यावर विस्तृत लेख...
17
प्रदूषणकारी मेट्रो-२ बीच्या आरएमसी प्लांटचे काम थांबवा; ‘एमएमआरडीए’च्या कंत्राटदाराला नोटीस 
18
निश्चित नसलेल्या जागी कुत्र्यांना अन्न देण्यापासून रोखणे गुन्हा ठरत नाही; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वपूर्ण निर्वाळा  
19
म्हाडा अधिकारी राजकीय दबावाला बळी का पडतात? पुनर्विकास थांबविल्याने उच्च न्यायालयाचा सवाल
20
गृहप्रकल्पात गोदरेजची ११० कोटींची फसवणूक; अहमदाबादच्या सिद्धी ग्रुपविरुद्ध गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अरुणाचल दौऱ्यामुळे चीनचा तीळपापड, नोंदवला विरोध 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2017 16:22 IST

संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांच्या अरुणाचल प्रदेश दौऱ्यामुळे चीनचा तीळपापड झाला आहे. सीमारामन यांच्या अरुणाचल दौऱ्याबाबत विरोध नोंदवताना चीनने सांगितले की, सीतारामन यांनी केलेला वादग्रस्त प्रदेशाचा दौरा शांतीप्रक्रियेसाठी प्रतिकूल आहे.

बीजिंग - संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांच्या अरुणाचल प्रदेश दौऱ्यामुळे चीनचा तीळपापड झाला आहे. सीमारामन यांच्या अरुणाचल दौऱ्याबाबत विरोध नोंदवताना चीनने सांगितले की, सीतारामन यांनी केलेला वादग्रस्त प्रदेशाचा दौरा शांतीप्रक्रियेसाठी प्रतिकूल आहे. संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांनी संरक्षण सज्जतेचा आढावा घेण्यासाठी रविवारी अरुणाचल प्रदेशमधील अंजा जिल्ह्याचा दौरा केला होता.  सीतारामन यांच्या अरुणाचल दौऱ्यावर प्रतिक्रिया देताना चीनच्या संरक्षणमंत्रालयाचे प्रवक्ते हुआ चुनयिंग म्हणाले की, "चीन आणि भारताच्या सीमेवरील पूर्वेकडील एका प्रदेशाबाबत विवाद सुरू आहे. या विवादित भागात भारताकडून करण्यात आलेला हा दौरा संबंधित भागातील शांततेसाठी प्रतिकूल आहे."चर्चेद्वारे सीमाविदाद सोडवण्यासाठी भारतीय पक्षकारांनी चीनी पक्षकारांसोबत काम केले पाहिजे. भारत हा मुद्दा सोडवण्यासाठी चीनसोबत काम करेल अशी अपेक्षा आहे. या प्रकरणात दोन्ही पक्षांना मान्य होईल, असा स्वीकार्ह तोडगा निघेल आणि आमच्या चिंतेचे निराकरण होईल, अशी भूमिका भारताची असेल, असी अपेक्षा चीनच्या प्रवक्त्यांनी व्यक्त केली.  अरुणाचल प्रदेश हा दक्षिण तिबेटचा भाग असल्याचा दावा चीनकडून करण्यात येत असतो. तसेच भारतीय अधिकाऱ्यांकडून या प्रदेशावरील अधिकाराबाबत करण्यात येणाऱ्या दाव्यांवर चीनकडून सातत्याने सातत्याने विरोध करण्यात येतो. भारत आणि चीनमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषा 3 हजार 488 किमी लांब आहे. या रेषेबाबतचा वाद सोडवण्यासाठी दोन्ही पक्षांनी आतापर्यंत विशेष प्रतिनिधींच्या माध्यमातून 19 फेऱ्यांतील चर्चा झाली आहे. दरम्यान, संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांनी गेल्या महिन्यात सिक्किममधील भारत आणि चीन सीमेजवळील. नथू ला भागाचा दौऱा केला होता. त्यावेळी सीतारामन यांनी सीमेपलिकडे उभ्या असलेल्या पीपल्स लिबरेशन आर्मीच्या सैनिकांची भेटही घेतली होती.   

मनिलामध्ये होणा-या पूर्व आशिया परिषदेच्या पार्श्वभूमीवर भारत, अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि जपान हे चार देश एकत्र येऊन चर्चा करणार आहेत. हे चार देश एकत्र येत असल्याने चीन सध्या चिंतेमध्ये आहे. आपला आंतरराष्ट्रीय प्रभाव कमी करण्यासाठी हे चार देश एकत्र येत असल्याची चीनची भावना झाली आहे. जवळपास दशकभरापासून या चार देशांमध्ये खंडीत झालेली चर्चा पुन्हा सुरु होणार आहे. येत्या 13 नोव्हेंबरला मनिलामध्ये पूर्व आशिया परिषद होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी या परिषदेला उपस्थित राहू शकतात. 

या बैठकीमुळे कुठल्या तिस-या पक्षाच्या हिताला बाधा पोहोचणार नाही किंवा कुणाला लक्ष्य करणार नाही अशी अपेक्षा चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने व्यक्त केली आहे. भारत, अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि जपान या चार देशांच्या बैठकीमुळे प्रदेशामध्ये शांतता, विकास, सहकार्य आणि समृद्धी वाढेल अशी अपेक्षा आहे. या बैठकीतून कुणाच्याही हिताला बाधा पोहोचणार नाही किंवा कुणाला लक्ष्य करणार नाही अशी अपेक्षा आहे असे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे. 

टॅग्स :Nirmala Sitaramanनिर्मला सीतारामनIndiaभारतchinaचीनArunachal Pradeshअरुणाचल प्रदेश