शहरं
Join us  
Trending Stories
1
India Lifts First ODI World Cup Trophy: हरमनप्रीतसह संघातील खेळाडूंनी खास अंदाजात उंचावली ट्रॉफी (VIDEO)
2
जोधपूरमध्ये भीषण अपघात, टेम्पो ट्रॅव्हलर उभ्या असलेल्या ट्रकला धडकला, १५ जणांचा मृत्यू
3
भारताच्या लेकींनी 'जग जिंकलं'! द. आफ्रिकेला हरवून टीम इंडिया अजिंक्य; स्वप्ननगरीत अधुरं स्वप्न साकार!
4
धक्कादायक! बंगालमध्ये सातवीत शिकणाऱ्या मुलीवर सामुहिक अत्याचार; तिघांना अटक
5
IND vs SA Final :अमनजोत कौरनं घेतलेल्या लॉराच्या कॅचवर फिरली मॅच; व्हिडिओ बघाच
6
निवडणुकांमुळे हिवाळी अधिवेशन दहा दिवस पुढे ढकलले जाणार ? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
7
Womens World Cup Final:'वाइल्ड कार्ड' एन्ट्रीसह आली अन् बॅटिंगनंतर बॉलिंगमध्येही 'ट्रम्प कार्ड' ठरली (VIDEO)
8
महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्षपद अजित पवारांकडेच; चौथ्यांदा मिळवली जबाबदारी
9
IND vs SA Womens World Cup 2025 Final : ...अन् अमनजोतच्या 'रॉकेट थ्रो'सह मिळाला मोठा दिलासा (VIDEO)
10
शफालीसह दीप्तीचं अर्धशतक! दक्षिण आफ्रिकेसमोर टीम इंडियानं सेट केलं २९९ धावांचे टार्गेट
11
मोठे आश्वासन देऊ नका; 10-20%..; अमेरिकन टॅरिफबाबत रघुराम राजन यांचा इशारा
12
वर्ल्ड कप फायनलमध्ये 'लेडी सेहवाग'चा विक्रमी धमाका! धोनी-गंभीरला मागे टाकण्याचीही होती संधी, पण...
13
पाकिस्तान करतोय हल्ले, भारतानं पाठवली 'अनमोल' मदत...; दिल्लीच्या निर्णयानं अफगाणिस्तानचं मन जिंकलं, मुनीरला मिरची लागणार!
14
2026 मध्ये किती रुपयांपर्यंत जाऊ शकतं सोनं? जाणून थक्क व्हाल! आता ₹10 हजारनं स्वस्त मिळतंय, एक्सपर्ट म्हणतायत चांगली संधी
15
Fact Check: आधार कार्ड दाखवून फुकटात मिळतेय बाईक? मोदींचा व्हिडीओ व्हायरल! सत्य समोर!
16
मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण स्फोट, २३ जणांचा मृत्यू; नेमके काय घडले?
17
IND W vs SA W Final : वनडे 'क्वीन' स्मृतीनं रचला इतिहास! मितालीचा विक्रम मोडत ठरली 'नंबर वन'
18
शत्रूच्या हालचालींवर भारताची करडी नजर! ISRO ने लॉन्च केले नौदलाचे सर्वात शक्तिशाली सॅटेलाईट
19
'दहशतवादी हल्ल्याचा कट अमेरिकेने रचला, पाकिस्तानने घडवून आणला'; शेख हसीना यांनी मौन सोडले
20
अभिषेक शर्माचा मोठा कारनामा! हिटमॅन रोहितसह गब्बरचा विक्रम मोडत रचला नवा इतिहास

चीनमधील २०० अमेरिकी कंपन्या येणार भारतात

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2019 06:19 IST

रोजगार निर्मिती : निवडणुकीनंतर कंपन्या स्थलांतरित करण्याची तयारी

वॉशिंग्टन : अमेरिका आणि चीन यांच्यात व्यापार युद्ध सुरू असताना चीनसाठी एक नकारात्मक वृत्त आहे. अमेरिकेतील जवळपास २०० कंपन्या लोकसभा निवडणुकीनंतर आपले प्रकल्प चीनमधून भारतात स्थलांतरित करणार आहेत. अमेरिका आणि भारत यांच्यातील संबंध दृढ करू पाहणाऱ्या यूएस- इंडिया स्ट्रॅटेजिक अ‍ॅण्ड पार्टनरशिप फोरमने ही माहिती दिली आहे.

या स्वयंसेवी समूहाने म्हटले आहे की, चीनऐवजी अन्य पर्याय शोधू पाहणाऱ्या या कंपन्यांसाठी भारत एक शानदार पर्याय आहे. या समूहाचे अध्यक्ष मुकेश अघी यांनी सांगितले की, अनेक कंपन्या आमच्याशी चर्चा करीत आहेत आणि विचारत आहेत की, भारतात गुंतवणूक करून कशाप्रकारे चीनला पर्याय शोधला जाऊ शकतो. निवडणुकानंतर भारतात स्थापन होणाऱ्या नव्या सरकारला हा समूह सुधारणांबाबतचा सल्ला देणार आहे. मुकेश अघी सांगितले की, भारत- अमेरिका यांच्यातील मुक्त व्यापाराचे आम्ही समर्थन करतो.नव्या सरकारने सुधारणांना गती द्यावी

गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी नव्या सरकारने काय करायला हवे? असा प्रश्न केला असता मुकेश अघी यांनी सांगितले की, सरकारने सुधारणांची गती वाढवायला हवी. निर्णय घेण्याच्या प्रक्रियेत पारदर्शकता आणायला हवी. अधिक पक्षांसोबत चर्चा करण्यावर भर द्यायला हवा. यामुळे मोठ्या देशात मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होण्यास मदत होणार आहे.

चीनला दे धक्काचीनमधील २०० हून अधिक अमेरिकी कंपन्या भारतात येण्याचा विचार करत असल्याने चीनला हा मोठा दणका मानला जात आहे. यातून भारतीय अर्थव्यवस्थेला चालना मिळणार असून मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होऊ शकते.

अमेरिकेतील तंत्रज्ञान आणि भारतीय मनुष्यबळ यांच्या एकत्रीकरणातून आर्थिक विकासाला चालना मिळणार आहे. त्यामुळे या अमेरिकन कंपन्यांना कशा प्रकारे आकर्षित करायचे याचा सरकारने विचार करावा. यासाठी भूसंपादनापासून ते परवानगी आणि कर आदी बाबींमध्ये सुटसुटीतपणा आणावा लागेल.

टॅग्स :chinaचीनIndiaभारतAmericaअमेरिका