शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

संयुक्त राष्ट्रात चीन एकाकी पडेल, भारताला बहुतांश देशांचे समर्थन मिळेल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2020 09:57 IST

फ्रान्सचे समर्थन हे भारतासाठी त्याचप्रमाणे जसे की, कधीकाळी रशियाचे समर्थन भारताला होते.

नवी दिल्ली - चिनी सैनिकांबरोबर भारतीय जवानांच्या झालेल्या संघर्षानंतर भारत आणि चीनमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. या सीमावादानंतर चीनवर आंतरराष्ट्रीय पातळीवरुन दबाव वाढविण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. त्यामुळे, संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेतही चीन एकाकी पडण्याची शक्यता आहे. राष्ट्रीय सुरक्षा परिषदेत चीन वीटो पॉवर व इतर चार देशांसह स्थायी सदस्य आहे. मात्र, तेथेही भारताला अधिक देशांचे समर्थन आहे. अमेरिका, रशिया, फ्रान्स आणि ब्रिटेनच्या सीमा वादावर भारताची समजदारी सर्वात प्रभावी आहे. 

फ्रान्सचे समर्थन हे भारतासाठी त्याचप्रमाणे जसे की, कधीकाळी रशियाचे समर्थन भारताला होते. रशियाची चीनसोबतही मैत्री आहे, पण महत्वाच्या मुद्दयांवर भारताला समर्थन दिल्यामुळे दोन्ही देशांचा पारंपरिक विश्वास ऐकमेकांवर आहे. सद्यपरिस्थितीतही रशियाने भारताजी बाजू समजून घेतली आहे. तर, अमेरिकाही भारताचा सहकारी देश म्हणून पुढे येत आहे. हे सर्वच देश चीनच्या भारतविरोधी कुरापतीला संपविण्याचं काम करत असल्याचं सुत्रांनी सांगितलंय. संयुक्त राष्ट्रात अस्थायी सदस्यता मिळवल्यानंतर भारत इतर स्थायी व अस्थायी सदस्य देशांशी आपले संबंध अधिक बळकट करत आहे. त्यामुळे संयुक्त राष्ट्रात भारताची बाजू भक्कम होत आहे. 

भारताने आता हळू हळू संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेतील स्थायी सदस्यांना सद्यस्थितीबाबत माहिती देऊन या देशांना आपल्या समर्थनात आणण्याचे प्रयत्न करत आहे. जागतिक मुद्द्यांवरही भारत समजदारी वाढवून संगणमत साधण्याचा प्रयत्न करत आहे. यासंदर्भातच, सोमवारी भारत आणि फ्रान्सच्या परराष्ट्र सचिवांची चर्चा झाली आहे. त्यामध्ये सध्याचा सीमारेषेवरील तणावाचा मुद्दाही प्रकर्षाने चर्चिला आहे. तर, गेल्याच आठवड्यात जर्मनीच्या परराष्ट्र सचिवांशीही देशाच्या सचिवांची बोलणी झाली होती. 

संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत भारतासोबतच अस्थायी सदस्यत्व मिळवलेल्या देशांचे समर्थन घेऊन जागतिक पातळीवर आपला झेंडा फडकविण्याचा भारताचा प्रयत्न आहे. सध्या संयुक्त राष्ट्र संघातील अधिकतम देश थेट सैन्य लढाईसाठी इच्छुक नसल्याचेही दिसून येते. त्यामुळे, जागतिक पातळीवर भारत इतर देशांचे सहकार्य घेऊन चीनला एकाकी पाडण्याचा प्रयत्न करत आहे.

दरम्यान, हिंदी तसेच प्रशांत महासागर क्षेत्रात अमेरिका, भारत, ऑस्ट्रेलिया, जपान, फ्रान्स या देशांच्या नौदलांनी परस्पर सहकार्य वाढविण्यावर भर दिला आहे. या प्रदेशात चीनने आपला लष्करी प्रभाव वाढविण्यास सुरूवात केली होती. हे इतर देशांना मान्य नाही. चीनचे नौदल हिंदी तसेच प्रशांत महासागरात व दक्षिण चीनमधील समुद्रात कायम आक्रमक पवित्र्यात उभे असते. त्यामुळे या परिसरात भारत व जपानी नौदलाने केलेल्या एकत्रित युद्धसरावाला विशेष महत्त्व आहे. भारतीय नौदलाने चीनच्या हालचालींची माहिती मिळविण्यासाठी अमेरिकी नौदल तसेच जपानच्या सागरी संरक्षण दलाचीही मदत घेतली. या पट्ट्यात  चिनी नौदलाकडून नेहमी आगळीक होते. भारताच्या आयएनएस राणा, आयएनएस कुलीश तर जपानच्या जेएस कशिमा, जेएस शिमायुकी युद्धनौका सरावात सहभागी झाल्या.

सीमावादावर आज बैठक

सीमेवरील तणाव कमी करण्यासाठी भारत व चीन यांच्या वरिष्ठ लष्करी कमांडरांची तिसरी बैठक मंगळवारी होणार आहे. गेल्या बैठकीत दोन्ही देशांमध्ये सीमेवरील वादग्रस्त ठिकाणी सैन्य मागे घेण्यावर सहमती झाली होती. परंतु सैन्य मागे घेणे तर सोडाच, उलट चीनने या बैठकांनंतर सीमेवर अधिक सैन्याची व युद्धसाहित्याची जमवाजमव केली.

टॅग्स :chinaचीनIndiaभारतunited nationsसंयुक्त राष्ट्र संघ