शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
4
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
5
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
6
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
7
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
8
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
9
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
10
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
11
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
12
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
13
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
14
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
15
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
16
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
17
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
18
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
19
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
20
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI

संयुक्त राष्ट्रात चीन एकाकी पडेल, भारताला बहुतांश देशांचे समर्थन मिळेल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2020 09:57 IST

फ्रान्सचे समर्थन हे भारतासाठी त्याचप्रमाणे जसे की, कधीकाळी रशियाचे समर्थन भारताला होते.

नवी दिल्ली - चिनी सैनिकांबरोबर भारतीय जवानांच्या झालेल्या संघर्षानंतर भारत आणि चीनमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. या सीमावादानंतर चीनवर आंतरराष्ट्रीय पातळीवरुन दबाव वाढविण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. त्यामुळे, संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेतही चीन एकाकी पडण्याची शक्यता आहे. राष्ट्रीय सुरक्षा परिषदेत चीन वीटो पॉवर व इतर चार देशांसह स्थायी सदस्य आहे. मात्र, तेथेही भारताला अधिक देशांचे समर्थन आहे. अमेरिका, रशिया, फ्रान्स आणि ब्रिटेनच्या सीमा वादावर भारताची समजदारी सर्वात प्रभावी आहे. 

फ्रान्सचे समर्थन हे भारतासाठी त्याचप्रमाणे जसे की, कधीकाळी रशियाचे समर्थन भारताला होते. रशियाची चीनसोबतही मैत्री आहे, पण महत्वाच्या मुद्दयांवर भारताला समर्थन दिल्यामुळे दोन्ही देशांचा पारंपरिक विश्वास ऐकमेकांवर आहे. सद्यपरिस्थितीतही रशियाने भारताजी बाजू समजून घेतली आहे. तर, अमेरिकाही भारताचा सहकारी देश म्हणून पुढे येत आहे. हे सर्वच देश चीनच्या भारतविरोधी कुरापतीला संपविण्याचं काम करत असल्याचं सुत्रांनी सांगितलंय. संयुक्त राष्ट्रात अस्थायी सदस्यता मिळवल्यानंतर भारत इतर स्थायी व अस्थायी सदस्य देशांशी आपले संबंध अधिक बळकट करत आहे. त्यामुळे संयुक्त राष्ट्रात भारताची बाजू भक्कम होत आहे. 

भारताने आता हळू हळू संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेतील स्थायी सदस्यांना सद्यस्थितीबाबत माहिती देऊन या देशांना आपल्या समर्थनात आणण्याचे प्रयत्न करत आहे. जागतिक मुद्द्यांवरही भारत समजदारी वाढवून संगणमत साधण्याचा प्रयत्न करत आहे. यासंदर्भातच, सोमवारी भारत आणि फ्रान्सच्या परराष्ट्र सचिवांची चर्चा झाली आहे. त्यामध्ये सध्याचा सीमारेषेवरील तणावाचा मुद्दाही प्रकर्षाने चर्चिला आहे. तर, गेल्याच आठवड्यात जर्मनीच्या परराष्ट्र सचिवांशीही देशाच्या सचिवांची बोलणी झाली होती. 

संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत भारतासोबतच अस्थायी सदस्यत्व मिळवलेल्या देशांचे समर्थन घेऊन जागतिक पातळीवर आपला झेंडा फडकविण्याचा भारताचा प्रयत्न आहे. सध्या संयुक्त राष्ट्र संघातील अधिकतम देश थेट सैन्य लढाईसाठी इच्छुक नसल्याचेही दिसून येते. त्यामुळे, जागतिक पातळीवर भारत इतर देशांचे सहकार्य घेऊन चीनला एकाकी पाडण्याचा प्रयत्न करत आहे.

दरम्यान, हिंदी तसेच प्रशांत महासागर क्षेत्रात अमेरिका, भारत, ऑस्ट्रेलिया, जपान, फ्रान्स या देशांच्या नौदलांनी परस्पर सहकार्य वाढविण्यावर भर दिला आहे. या प्रदेशात चीनने आपला लष्करी प्रभाव वाढविण्यास सुरूवात केली होती. हे इतर देशांना मान्य नाही. चीनचे नौदल हिंदी तसेच प्रशांत महासागरात व दक्षिण चीनमधील समुद्रात कायम आक्रमक पवित्र्यात उभे असते. त्यामुळे या परिसरात भारत व जपानी नौदलाने केलेल्या एकत्रित युद्धसरावाला विशेष महत्त्व आहे. भारतीय नौदलाने चीनच्या हालचालींची माहिती मिळविण्यासाठी अमेरिकी नौदल तसेच जपानच्या सागरी संरक्षण दलाचीही मदत घेतली. या पट्ट्यात  चिनी नौदलाकडून नेहमी आगळीक होते. भारताच्या आयएनएस राणा, आयएनएस कुलीश तर जपानच्या जेएस कशिमा, जेएस शिमायुकी युद्धनौका सरावात सहभागी झाल्या.

सीमावादावर आज बैठक

सीमेवरील तणाव कमी करण्यासाठी भारत व चीन यांच्या वरिष्ठ लष्करी कमांडरांची तिसरी बैठक मंगळवारी होणार आहे. गेल्या बैठकीत दोन्ही देशांमध्ये सीमेवरील वादग्रस्त ठिकाणी सैन्य मागे घेण्यावर सहमती झाली होती. परंतु सैन्य मागे घेणे तर सोडाच, उलट चीनने या बैठकांनंतर सीमेवर अधिक सैन्याची व युद्धसाहित्याची जमवाजमव केली.

टॅग्स :chinaचीनIndiaभारतunited nationsसंयुक्त राष्ट्र संघ