शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
3
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
4
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
5
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
6
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
7
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
8
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
9
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
10
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
11
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
12
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
13
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
14
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
15
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
16
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
17
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
18
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
19
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
20
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
Daily Top 2Weekly Top 5

अफगाणिस्तानसाठी भारत महत्वाचा, चीनलाही अखेर ऐकावं लागलं; चर्चेसाठी पाठवला विशेष दूत!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2022 16:01 IST

अफगाणिस्तानसाठी चीनचे विशेष दूत यू शिआओंग या आठवड्यात भारत भेटीवर आले होते. यादरम्यान, त्यांनी युद्धग्रस्त देशात शांतता आणि स्थिरता सुनिश्चित करण्याच्या पद्धतींवर एका वरिष्ठ भारतीय अधिकाऱ्याशी चर्चा केली.

अफगाणिस्तानसाठीचीनचे विशेष दूत यू शिआओंग या आठवड्यात भारत भेटीवर आले होते. यादरम्यान, त्यांनी युद्धग्रस्त देशात शांतता आणि स्थिरता सुनिश्चित करण्याच्या पद्धतींवर एका वरिष्ठ भारतीय अधिकाऱ्याशी चर्चा केली. चीनच्या राजदूतानं अफगाणिस्तानसाठी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे 'पॉइंट पर्सन' जेपी सिंग यांच्याशी विस्तृत चर्चा केली. राजदूतानं ट्विटरवर आपली भेट चांगली झाल्याचं म्हटलं आहे. तसंच दोन्ही बाजूंनी संवाद वाढविण्यास आणि अफगाणिस्तानात शांतता, स्थिरतेसाठी सकारात्मक प्रयत्न करण्यास सहमती दर्शविली आहे.

दोन्ही नेत्यांमध्ये गुरुवारी ही चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, विशेष दूत शिओयोंग यांच्या भेटीबाबत परराष्ट्र मंत्रालयाकडून कोणतेही अधिकृत वक्तव्य करण्यात आलेलं नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चीनच्या राजदूताच्या या भेटीतून अफगाणिस्तानातील भारताची महत्त्वाची भूमिका दिसून येते. अफगाणिस्तानातील सध्याची परिस्थिती पाहता भारत अनेक सर्वोच्च शक्तींच्या संपर्कात आहे. भारताने जूनमध्ये अफगाणिस्तानची राजधानी काबूल येथील आपल्या दूतावासात पथक तैनात करून आपली राजनैतिक उपस्थिती पुन्हा मजबूत केली आहे.

अफगाणिस्तानावर गेल्या वर्षी तालिबानचा कब्जातालिबानने गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये अफगाणिस्तानचा ताबा घेतला होता. तालिबानच्या हल्ल्यानंतर भारताने काबूल येथील दूतावासातून आपले सर्व अधिकारी काढून घेतले होते. दूतावास पुन्हा सुरू झाल्यानंतर काही आठवड्यांनंतर, एका भारतीय पथकाने काबूलला भेट दिली आणि अफगाणिस्तानचे कार्यवाहक परराष्ट्र मंत्री अमीर खान मुत्तकी आणि तालिबानच्या काही सदस्यांची भेट घेतली.

अफगाणिस्तानात 110 अफगाण-शीख अजूनही अडकलेतालिबान-नियंत्रित अफगाणिस्तानात अजूनही ११० शीख भारतात येण्याची आतुरतेने वाट पाहत आहेत आणि त्यापैकी ६० जणांना त्यांचा ई-व्हिसा मिळणे बाकी आहे. शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समितीने (SGPC) गुरुवारी हा दावा केला गेला आहे. भारतीय जागतिक मंच आणि केंद्र सरकारच्या निर्वासन योजनेचा भाग म्हणून २६ प्रौढ आणि दोन लहान मुलांसह एकूण २८ अफगाण-शीख बुधवारी काबूलहून दिल्लीत दाखल झाले. याबाबत शिखांची सर्वोच्च धार्मिक संस्था एसजीपीसीने सांगितले की, अफगाणिस्तानातून आलेल्या या शीखांच्या राहण्याची व्यवस्था केली गेली आहे. तसंच अजूनही ११० शीख बांधव अजूनही अडकून आहेत असंही एसजीपीसीनं सांगितलं आहे. 

टॅग्स :Afghanistanअफगाणिस्तानchinaचीनIndiaभारत