शहरं
Join us  
Trending Stories
1
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
2
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
3
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
4
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
5
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
6
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
7
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
8
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
9
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
10
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
11
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
12
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
13
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
14
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
15
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
16
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
17
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
18
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
19
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
20
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!

अफगाणिस्तानसाठी भारत महत्वाचा, चीनलाही अखेर ऐकावं लागलं; चर्चेसाठी पाठवला विशेष दूत!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2022 16:01 IST

अफगाणिस्तानसाठी चीनचे विशेष दूत यू शिआओंग या आठवड्यात भारत भेटीवर आले होते. यादरम्यान, त्यांनी युद्धग्रस्त देशात शांतता आणि स्थिरता सुनिश्चित करण्याच्या पद्धतींवर एका वरिष्ठ भारतीय अधिकाऱ्याशी चर्चा केली.

अफगाणिस्तानसाठीचीनचे विशेष दूत यू शिआओंग या आठवड्यात भारत भेटीवर आले होते. यादरम्यान, त्यांनी युद्धग्रस्त देशात शांतता आणि स्थिरता सुनिश्चित करण्याच्या पद्धतींवर एका वरिष्ठ भारतीय अधिकाऱ्याशी चर्चा केली. चीनच्या राजदूतानं अफगाणिस्तानसाठी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे 'पॉइंट पर्सन' जेपी सिंग यांच्याशी विस्तृत चर्चा केली. राजदूतानं ट्विटरवर आपली भेट चांगली झाल्याचं म्हटलं आहे. तसंच दोन्ही बाजूंनी संवाद वाढविण्यास आणि अफगाणिस्तानात शांतता, स्थिरतेसाठी सकारात्मक प्रयत्न करण्यास सहमती दर्शविली आहे.

दोन्ही नेत्यांमध्ये गुरुवारी ही चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, विशेष दूत शिओयोंग यांच्या भेटीबाबत परराष्ट्र मंत्रालयाकडून कोणतेही अधिकृत वक्तव्य करण्यात आलेलं नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चीनच्या राजदूताच्या या भेटीतून अफगाणिस्तानातील भारताची महत्त्वाची भूमिका दिसून येते. अफगाणिस्तानातील सध्याची परिस्थिती पाहता भारत अनेक सर्वोच्च शक्तींच्या संपर्कात आहे. भारताने जूनमध्ये अफगाणिस्तानची राजधानी काबूल येथील आपल्या दूतावासात पथक तैनात करून आपली राजनैतिक उपस्थिती पुन्हा मजबूत केली आहे.

अफगाणिस्तानावर गेल्या वर्षी तालिबानचा कब्जातालिबानने गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये अफगाणिस्तानचा ताबा घेतला होता. तालिबानच्या हल्ल्यानंतर भारताने काबूल येथील दूतावासातून आपले सर्व अधिकारी काढून घेतले होते. दूतावास पुन्हा सुरू झाल्यानंतर काही आठवड्यांनंतर, एका भारतीय पथकाने काबूलला भेट दिली आणि अफगाणिस्तानचे कार्यवाहक परराष्ट्र मंत्री अमीर खान मुत्तकी आणि तालिबानच्या काही सदस्यांची भेट घेतली.

अफगाणिस्तानात 110 अफगाण-शीख अजूनही अडकलेतालिबान-नियंत्रित अफगाणिस्तानात अजूनही ११० शीख भारतात येण्याची आतुरतेने वाट पाहत आहेत आणि त्यापैकी ६० जणांना त्यांचा ई-व्हिसा मिळणे बाकी आहे. शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समितीने (SGPC) गुरुवारी हा दावा केला गेला आहे. भारतीय जागतिक मंच आणि केंद्र सरकारच्या निर्वासन योजनेचा भाग म्हणून २६ प्रौढ आणि दोन लहान मुलांसह एकूण २८ अफगाण-शीख बुधवारी काबूलहून दिल्लीत दाखल झाले. याबाबत शिखांची सर्वोच्च धार्मिक संस्था एसजीपीसीने सांगितले की, अफगाणिस्तानातून आलेल्या या शीखांच्या राहण्याची व्यवस्था केली गेली आहे. तसंच अजूनही ११० शीख बांधव अजूनही अडकून आहेत असंही एसजीपीसीनं सांगितलं आहे. 

टॅग्स :Afghanistanअफगाणिस्तानchinaचीनIndiaभारत