शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

भारतीय जवानांशी टक्कर, एक पाऊल मागे हटण्यास चीन 'मजबूर'; म्हणाला...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2021 17:32 IST

तत्पूर्वी, भारतीय लष्कराने सोमवारी सांगितले होते, की सिक्किमच्या उत्तरेला असलेल्या नाकूला भागात 20 जानेवारीला भारत आणि चिनी सैन्यांत ‘सामान्य बाचाबाची’ झाली होती. निर्धारित प्रोटोकॉलनुसार, स्थानिक कमांडरांकडून हा वाद मिटवण्यात आला. 

गेल्या आठवड्यात सिक्किमच्या नाकू ला भागातील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर भारतीय लष्करासोबत झालेल्या झटापटीनंतर चीनला मागे हटावे लागले आहे. तसेच सीमा रेषेवर शांतता कायम ठेवण्यास आम्ही वचनबद्ध आहोत, असेही चीनने म्हटले आहे. याशिवाय, भारताने कुठल्याही प्रकारची एकतर्फी कारवाई करू नये, असेही चीनने म्हटले आहे. 

चिनी परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी म्हटले आहे की, आमचे सैनिक भारत-चीन सीमा भागात शांतता कायम ठेवण्यास वचनबद्ध आहेत. तसेच, चीन भारताला आवाहन करतो, की सीमेवरील परिस्थिती बिघडेल अशी एकतर्फी कारवाई होणार नाही याकडे भारताने लक्ष द्यावे. सीमावर्ती भागात शांतता रहावी यासाठी प्रयत्न करावेत."

तत्पूर्वी, भारतीय लष्कराने सोमवारी सांगितले होते, की सिक्किमच्या उत्तरेला असलेल्या नाकूला भागात 20 जानेवारीला भारत आणि चिनी सैन्यांत ‘सामान्य बाचाबाची’ झाली होती. निर्धारित प्रोटोकॉलनुसार, स्थानिक कमांडरांकडून हा वाद मिटवण्यात आला. 

पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, यासंदर्भात भारतीय लष्कराने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे, ‘‘स्पष्ट करण्यात येते, की उत्तर सिक्किमच्या नाकू ला येथे 20 जानेवारीला ‘सामान्य बाचाबाची’ झाली होती. हा वाद निर्धारित प्रोटोकॉलनुसार स्थानिक कमांडर्सनी सोडवला होता. माध्यमांना आवाहन करत आहोत, की ही घटना मोठी करून दाखवू नये. कारण ते तथ्यात्मक दृष्ट्या चुकीचे आहे.’’ घटनेची माहिती असणाऱ्यांनी सांगितल्यानुसार चिनी सैनिकांनी प्रत्यक्ष नियंत्रण रेषा (एलएसी) ओलांडून भारतीय हद्दीत घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, भारतीय जवानांनी त्यांना अडवले. त्यांचे म्हणणे आहे, की दोन्ही देशांच्या सैनिकांत भांडणही झाले होते.

गलवान घाटीमध्ये पहिला हल्ला -15 जूनला चीनच्या सैनिकांनी गलवान घाटीमध्ये पहिला हल्ला केला होता. खिळे असलेले लोखंडी रॉड, अणुकुचीदार जाळी आदींनी भारतीय जवानांवर हल्ला केला होता. भारतीय जवानांनी लगेचच सावध होत चीनच्या सैनिकांना चोख प्रत्यूत्तर दिले होते. यामध्ये २० भारतीय जवान शहीद झाले होते. तर ४० हून अधिक चिनी सैनिक मारले गेले होते. देशातील असंतोष रोखण्यासाठी चीनने अद्याप हे मान्य केलेले नाही. 

 

टॅग्स :india china faceoffभारत-चीन तणावsikkimसिक्किमBorderसीमारेषाchinaचीनSoldierसैनिकIndian Armyभारतीय जवान