शहरं
Join us  
Trending Stories
1
एपस्टीन सेक्स स्कँडल: जगभरातील नेत्यांची झोप उडाली! दोन दिवस उरले, भारतीय नेत्यांचेही नाव?
2
तुळजापुरात भाजप-मविआच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा; काग्रेस उमेदवाराचा पुतण्या गंभीर जखमी
3
दिल्लीत ५० टक्के कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम देण्याचे सरकारचे आदेश; कुणाला मिळणार १० हजार?
4
बारामतीतील मुलीवर अंबाजोगाईमध्ये सामूहिक बलात्कार, बदामबाईने आधी कला केंद्रावर नेलं, नंतर लॉजवर...
5
संतापजनक...! IAS अधिकाऱ्याची गाडी तपासली; गोव्याच्या एसपींनी पोलिसांनाच दिली उठाबशांची शिक्षा...
6
निवृत्तीनंतर हातात येणार रग्गड पैसा! NPS चे नवीन नियम लागू; ५ वर्षांचा 'लॉक-इन' कालावधी संपला
7
माणिकराव कोकाटे यांचे मंत्रिपद जाणार? आज अजित पवार यांची भेट घेणार, मोठ्या निर्णयाची शक्यता
8
शिंदेसेना ही अमित शाहांची 'टेस्ट ट्यूब बेबी', त्यांचा नैसर्गिक जन्म नाही; राऊतांची बोचरी टीका
9
Video - बापमाणूस! ६० फूट खोल बोरवेलमध्ये पडलेल्या लेकीसाठी वडिलांनी लावली जिवाची बाजी
10
विमा क्षेत्रात आता १००% परकीय गुंतवणुकीला मंजुरी; सर्वसामान्यांना स्वस्त पॉलिसी आणि चांगले पर्याय मिळणार?
11
'इस्लामिक दहशतवादाविरोधात उभे राहण्याची गरज', व्हाइट हाऊसमधून ट्रम्प यांचं आवाहन; केली मोठी घोषणा
12
महायुतीत एकनाथ शिंदेंची कोंडी; मुंबईत भाजपानं शिंदेसेनेला केवळ ५२ जागांचा दिला प्रस्ताव?
13
१९ तारखेला अत्यंत स्फोटक माहिती उघड होणार, ज्यानं भाजपा नेत्यांची फजिती होईल; संजय राऊतांचा दावा
14
टीम इंडियाला मल्टीप्लेक्समध्ये पाहून सगळचे चकीत झाले...; मैदानातील सगळेच धुरंधर 'धुरंधर' पहायला गेलेले...
15
Crime: बुरखा न घातल्यानं पती संतापला, पत्नीसह पोटच्या २ मुलींना संपवलं; मृतदेह पुरले खड्ड्यात!
16
कोण आहे डोनाल्ड ट्रम्प यांची होणारी सून...! मंगळवारीच उरकला साखरपुडा, दोघे भारतातही येऊन गेलेले...
17
उद्धव-राज विरुद्ध भाजप-शिंदेसेना असाच सामना; १३८ मराठी बहुल मतदारसंघ या निवडणुकीत ठरणार निर्णायक
18
सरकार आणखी एका बँकेतील हिस्सा विकण्याच्या तयारीत; खात्यात येणार २१०० कोटी, सध्या आहे ९५% हिस्सा
19
'उद्याच्या तेजस्वी पहाटेसाठी!' रितेश देशमुखचा छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेतील पहिला लूक समोर
20
प्रसिद्ध दिग्दर्शक आणि पत्नीच्या हत्या प्रकरणाला नवं वळण, पोलिसांनी लेकालाच केली अटक
Daily Top 2Weekly Top 5

भारतीय जवानांशी टक्कर, एक पाऊल मागे हटण्यास चीन 'मजबूर'; म्हणाला...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2021 17:32 IST

तत्पूर्वी, भारतीय लष्कराने सोमवारी सांगितले होते, की सिक्किमच्या उत्तरेला असलेल्या नाकूला भागात 20 जानेवारीला भारत आणि चिनी सैन्यांत ‘सामान्य बाचाबाची’ झाली होती. निर्धारित प्रोटोकॉलनुसार, स्थानिक कमांडरांकडून हा वाद मिटवण्यात आला. 

गेल्या आठवड्यात सिक्किमच्या नाकू ला भागातील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर भारतीय लष्करासोबत झालेल्या झटापटीनंतर चीनला मागे हटावे लागले आहे. तसेच सीमा रेषेवर शांतता कायम ठेवण्यास आम्ही वचनबद्ध आहोत, असेही चीनने म्हटले आहे. याशिवाय, भारताने कुठल्याही प्रकारची एकतर्फी कारवाई करू नये, असेही चीनने म्हटले आहे. 

चिनी परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी म्हटले आहे की, आमचे सैनिक भारत-चीन सीमा भागात शांतता कायम ठेवण्यास वचनबद्ध आहेत. तसेच, चीन भारताला आवाहन करतो, की सीमेवरील परिस्थिती बिघडेल अशी एकतर्फी कारवाई होणार नाही याकडे भारताने लक्ष द्यावे. सीमावर्ती भागात शांतता रहावी यासाठी प्रयत्न करावेत."

तत्पूर्वी, भारतीय लष्कराने सोमवारी सांगितले होते, की सिक्किमच्या उत्तरेला असलेल्या नाकूला भागात 20 जानेवारीला भारत आणि चिनी सैन्यांत ‘सामान्य बाचाबाची’ झाली होती. निर्धारित प्रोटोकॉलनुसार, स्थानिक कमांडरांकडून हा वाद मिटवण्यात आला. 

पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, यासंदर्भात भारतीय लष्कराने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे, ‘‘स्पष्ट करण्यात येते, की उत्तर सिक्किमच्या नाकू ला येथे 20 जानेवारीला ‘सामान्य बाचाबाची’ झाली होती. हा वाद निर्धारित प्रोटोकॉलनुसार स्थानिक कमांडर्सनी सोडवला होता. माध्यमांना आवाहन करत आहोत, की ही घटना मोठी करून दाखवू नये. कारण ते तथ्यात्मक दृष्ट्या चुकीचे आहे.’’ घटनेची माहिती असणाऱ्यांनी सांगितल्यानुसार चिनी सैनिकांनी प्रत्यक्ष नियंत्रण रेषा (एलएसी) ओलांडून भारतीय हद्दीत घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, भारतीय जवानांनी त्यांना अडवले. त्यांचे म्हणणे आहे, की दोन्ही देशांच्या सैनिकांत भांडणही झाले होते.

गलवान घाटीमध्ये पहिला हल्ला -15 जूनला चीनच्या सैनिकांनी गलवान घाटीमध्ये पहिला हल्ला केला होता. खिळे असलेले लोखंडी रॉड, अणुकुचीदार जाळी आदींनी भारतीय जवानांवर हल्ला केला होता. भारतीय जवानांनी लगेचच सावध होत चीनच्या सैनिकांना चोख प्रत्यूत्तर दिले होते. यामध्ये २० भारतीय जवान शहीद झाले होते. तर ४० हून अधिक चिनी सैनिक मारले गेले होते. देशातील असंतोष रोखण्यासाठी चीनने अद्याप हे मान्य केलेले नाही. 

 

टॅग्स :india china faceoffभारत-चीन तणावsikkimसिक्किमBorderसीमारेषाchinaचीनSoldierसैनिकIndian Armyभारतीय जवान