शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
2
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
3
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
4
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
5
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
6
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
7
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
8
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
9
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
10
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
11
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
12
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
13
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
14
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
15
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
16
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
17
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
18
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
19
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
20
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!

Mission Shakti: भारताच्या 'मिशन शक्ती'वर चीन म्हणाला...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2019 19:56 IST

भारतानं क्षेपणास्त्राच्या मदतीने उपग्रह नष्ट करण्याची शक्ती मिळवल्यानंतर चीनकडूनही प्रतिक्रिया आली आहे.

बीजिंग- भारतानं क्षेपणास्त्राच्या मदतीने उपग्रह नष्ट करण्याची शक्ती मिळवल्यानंतर चीनकडूनही प्रतिक्रिया आली आहे. सर्वच देशांनी अवकाशाच्या कक्षेत शांती प्रस्थापित करावी, अशी आशा चीननं व्यक्त केली आहे. भारतानंमिशन शक्ती यशस्वी केल्यानंतर पाकिस्ताननं आगपाखड केली आहे, तर चीननं भारताला अवकाशात शांती प्रस्थापित करण्याचा सल्ला दिला आहे.चीनच्या परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलं आहे की, आम्हाला बातमी समजली. आम्ही आशा करतो की प्रत्येक देश हा अंतरिक्ष कक्षेत शांती प्रस्थापित करण्यावर भर देईल. चीननं 2007मध्ये अशा प्रकारची चाचणी केली होती. त्यावेळीही क्षेपणास्त्रानं चीननं उपग्रह पाडला होता. भारताच्या या यशानंतर पाकिस्तानमध्येही खळबळ उडाली. पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयानं एक पत्रक प्रसिद्धीस दिलं आहे. त्या पत्रकात म्हटलं आहे की, पाकिस्तान हा अंतरिक्षाला मानवतेचा वारसा या दृष्टीनं पाहतो. प्रत्येक देशानं अशा हालचालींपासून दूर राहिलं पाहिजे. जेणेकरून अंतरिक्षाचं सैन्यीकरण होणार नाही.गेल्या अनेक काळापासून ज्या देशांनी याविरोधात आवाज उठवला आहे, ते पुन्हा एकदा यासंदर्भात आवाज उठवतील, अशी आशा पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयानं प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकातून व्यक्त केली आहे. भारतानं मिसाइलच्या सहाय्यानं उपग्रह पाडला आहे. अशा प्रकारे मिसाइलच्या सहाय्यानं उपग्रह पाडणाऱ्या देशांच्या यादीत अमेरिका, रशिया आणि चीननंतर भारत चौथा देश ठरला आहे. भारतानं अवकाश संशोधन क्षेत्राच्या इतिहासात स्वतःचं नाव कोरलं आहे. उपग्रहरोधक शस्त्र म्हणजेच A-SAT ने लाईव्ह सॅटेलाइटचा वेध घेतल्यानं भारताला अवकाश संशोधन क्षेत्रात मोठं यश मिळालं आहे.

अशा प्रकारे मिसाइलच्या सहाय्यानं उपग्रह पाडणाऱ्या देशांच्या यादीत अमेरिका, रशिया आणि चीननंतर भारत चौथा देश ठरला आहे. यावेळी मोदींनी या क्षेपणास्त्राची निर्मिती करणाऱ्या डीआरडीओच्या शास्त्रज्ञांचं अभिनंदन केलं. भारतीय क्षेपणास्त्रानं (A-SAT) पृथ्वीपासून 300 किलोमीटर अंतरावर असलेला उपग्रह पाडला. या मोहिमेला 'शक्ती' असं नाव देण्यात आलं होतं.

टॅग्स :Mission Shaktiमिशन शक्तीchinaचीनIndiaभारत