शहरं
Join us  
Trending Stories
1
आता ठाकरेंची वेळ! शिंदेच्या ठाण्यातील बडा नेता उद्धवसेनेत; म्हणाले, “सत्तेसाठी लाचारी...”
2
मिशन 2026! बंगाल, असम, केरळ आणि तामिळनाडूसाठी भाजपचा प्लान तयार..!
3
इम्रान खान जिवंत की मृत? तुरुंगात भेटायला गेलेली डॉक्टर बहीण बाहेर आली, म्हणाली... 
4
भाजपचे उमेदवार अजय अग्रवाल बोगस मतदान करुन घेत असल्याचा खळबळजनक आरोप ! फार्म हाऊसवर मिळाले महत्वाचे पुरावे
5
रोहित तयार, पण किंग कोहलीच्या मनात वाजतंय "आम्ही नाही जा.." गाणं; गंभीर-आगरकरचा 'तो' डाव फसणार?
6
“नगरपालिका निवडणुकीत आचारसंहितेची पायमल्ली, महायुतीविरोधात हजारो तक्रारी”; काँग्रेसची टीका
7
दिल्लीच्या CM रेखा गुप्ता यांच्या हस्ते पिकलबॉल लीग ट्रॉफीचे अनावरण; मुंबई-चेन्नईसह ६ फ्रँचायझी संघात रंगणार स्पर्धा
8
२०२५ची शेवटची पौर्णिमा: ३ गोष्टी कराच, महालक्ष्मी दोन्ही हातांनी भरभरून देईल; भरभराट होईल!
9
Video: निरागस बाबा..! लेकीनं दाखवलं 'कोरियन हार्ट' पण बापाला वाटलं वेगळंच.. पुढे काय झालं?
10
२०२५ संपताना हवं ते देणार, ८ राशींना सगळं मिळणार; गुरु-बुधाचा षडाष्टक योग, सोन्यासारखे दिवस!
11
“शिंदे मालवणात आले, येताना बॅगेतून काय आणले?”; थेट व्हिडिओ दाखवत संजय राऊतांचा सवाल
12
प्राजक्ता-शंभूराजच्या लग्नाचा अल्बम आला समोर; राजेशाही थाटात पार पडला लग्नसोहळा
13
हसावे की...! मतदान केंद्रातील कर्मचारी बोटाला शाई लावायची सोडून गप्पा हाणत बसला; मतदार मतदान करून...
14
Travel : भारतीयांसाठी व्हिसा फ्री एन्ट्री! पण, मलेशिया फिरायला किती खर्च येतो? जायचा विचार करताय तर जाणून घ्या...
15
आकाशाला गवसणी! चंद्र-ताऱ्यांची स्वप्न पाहणारी भारताची मिसाईल वुमन; पुरस्काराने झाला सन्मान
16
१.१७ कोटींची बोली लावली, प्रसिद्धी मिळविली, आता म्हणतोय...'नको'; HR 88 B 8888 नंबर प्लेटचा पुन्हा लिलाव होणार
17
IPL 2026 Auction: भारताच्या 'या' Top 10 स्टार क्रिकेटपटूंनी लिलावासाठी केली 'रजिस्ट्रेशन'
18
इथे मतदान करा, तिकडचे बटन दाबा...! आमदार संतोष बांगर यांच्याकडून मतदान केंद्रातच महिलेला सूचना, गुन्हा दाखल...
19
आधी फिरून येऊ म्हणाला, मग भांडण उकरून काढलं; संतापलेल्या रिक्षा चालकानं गर्लफ्रेंडला काचेच्या बाटलीनं मारलं!
20
पिण्याच्या पाण्यासाठी 'पादत्राणांचा त्याग', परमेश्वर कदम यांच्या सेवाभावी कार्याचा 'महाराष्ट्र समाजभूषण' पुरस्काराने गौरव!
Daily Top 2Weekly Top 5

चीन-भारत संबंधांना तिसऱ्या देशाच्या नजरेची गरज नाही, मोदी आणि जिनपिंग यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना सुनावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2025 18:54 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांची रविवारी भेट झाली. या भेटीवर जगाच्या नजरा होत्या. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर लादलेल्या करानंतर जिनपिंग आणि मोदी यांची पहिलीच भेट आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांची रविवारी भेट झाली. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर लादलेल्या करानंतर जिनपिंग आणि मोदी यांची पहिलीच भेट आहे. यामुळे या भेटीकडे संपूर्ण जगाच्या नजरा होत्या. या भेटीमुळे आता भारत आणि चीनमधील संबंध पुन्हा एकदा चांगले होत आहेत. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठे विधान केले.' भारत-चीन संबंधांकडे कोणत्याही तिसऱ्या देशाच्या दृष्टिकोनातून पाहण्याची गरज नाही' असे विधान मोदींनी केले. हे विधान डोनाल्ड ट्रम्प यांच्यासाठी असल्याचे मानले जात आहे.

राहुल गांधींच्या 'मतदार हक्क यात्रेत' वापरलेली बाईक गायब, मालक चिंतेत; बुलेटही लॉक अवस्थेत सापडली

परराष्ट्र मंत्रालयानेही पंतप्रधान मोदी आणि जिनपिंग यांच्या भेटीबाबत एक निवेदन जारी केले. 'दोन्ही नेत्यांनी द्विपक्षीय, प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवर आणि बहुपक्षीय मंचांवर दहशतवाद आणि निष्पक्ष व्यापार यासारख्या आव्हानांवर समान आधार वाढवणे आवश्यक मानले', असे निवेदनात म्हटले आहे.

दोन्ही देशातील संबंध सुधारत आहेत

३१ व्या एससीओ शिखर परिषदेच्या वेळी मोदी आणि जिनपिंग यांची भेट झाली. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाचे तेल खरेदी करण्यासाठी भारतावर ५० टक्के कर लादला आहे. ट्रम्प यांच्या निर्णयानंतर पंतप्रधान मोदी यांनी जपान आणि चीनला भेट दिली. चीनचा हा दौरा महत्त्वाचा आहे कारण पंतप्रधान मोदी सात वर्षानंतर चीनमध्ये गेले. गलवानमधील संघर्षानंतर दोन्ही देशांमधील संबंध खराब झाले होते. दरम्यान, आता या भेटीमुळे दोन्ही देशातील संबंध सुधारण्यास सुरुवात होत आहे.

परराष्ट्र मंत्रालयाच्या निवेदनानुसार, दोन्ही नेत्यांनी सांगितले की, कोणत्याही प्रकारच्या मतभेदाचे रूपांतर भांडणात होऊ नये. मोदी आणि शी जीनपिंग यांनी जागतिक व्यापार स्थिर करण्यात त्यांच्या दोन्ही अर्थव्यवस्थांच्या भूमिकेची कबुली दिली. तसेच सीमा वादावर निष्पक्ष, तर्कसंगत आणि परस्पर तोडगा काढण्याबद्दल चर्चा केली.

ऑक्टोबर २०२४ मध्ये काझान (रशिया) येथे झालेल्या शेवटच्या बैठकीपासून द्विपक्षीय संबंधांमध्ये सकारात्मक गती आणि स्थिर प्रगतीचे दोन्ही नेत्यांनी स्वागत केले. दोन्ही देश विकासात भागीदार आहेत, प्रतिस्पर्धी नाहीत. त्यांच्या मतभेदांचे रूपांतर वादात होऊ नये, असेही त्यांनी सांगितले.

दोन्ही देशातील संबंध मजबूत असणे गरजेचे

भारत-चीन आणि त्यांच्या २.८ अब्ज लोकांमध्ये परस्पर आदर, हित आणि संवेदनशीलतेच्या आधारावर स्थिर संबंध आणि सहकार्य आवश्यक आहे. दोन्ही देशांच्या विकास आणि प्रगतीसाठी तसेच २१ व्या शतकातील ट्रेंडनुसार बहुध्रुवीय जग आणि बहुध्रुवीय आशियासाठी देखील हे आवश्यक आहे. थेट विमानसेवा आणि व्हिसाद्वारे लोकांमधील संबंधांना देखील सकारात्मक पाऊल म्हणून वर्णन करण्यात आले. यामध्ये देखील कैलास मानसरोवर यात्रा पुन्हा सुरू करणे विशेष आहे, असेही निवेदनात म्हटले आहे.

टॅग्स :chinaचीनIndiaभारतNarendra Modiनरेंद्र मोदी