शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
3
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
4
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
5
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
6
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
7
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
8
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
9
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
10
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
11
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
12
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
13
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
14
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
15
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
16
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
17
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
18
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
19
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
20
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम

...तर सहन करणंही कठीण होईल; चीनची भारताला पुन्हा धमकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2020 09:01 IST

चीनने भारताला लक्ष करत अमेरिका आणि चीनमध्ये सुरु असलेल्या कोल्ड वॉरपासून भारताने दूर राहण्याचा सल्ला चीनने दिला होता.

चीनमधील वुहान शहरातून सुरु झालेल्या कोरोना व्हायरसने जगभरता थैमान घातलं आहे. जगभरात जीवघेण्या कोरोना व्हायरसची लागण  74 लाख 47 हजार लोकांना झाली असून आतापर्यंत मृत्यूंची संख्या 4 लाख 18 हजार 870 वर पोहोचली आहे. कोरोना व्हायरस जागतीक महामारी बनला आहे. यामुळे जगातील सर्वच देश चीनला लक्ष्य करत आहेत. परंतु संपूर्ण जगाच्या टीकेला सामोरा जात असलेला चीन आता सर्वच देशांकडून घेरला जात आहे. मात्र, असे असतानाही त्याची मग्रुरी कमी झालेली नाही.

गेल्या काही दिवसांपासून अमेरिका आणि चीनमध्ये ट्रेंड वॉर सुरु आहे. तर दूसरीकडे अमेरिका आणि भारताची मैत्री आणखी घट्ट होत आहे. याचपार्श्वभूमीवर चीनने भारताला लक्ष करत अमेरिका आणि चीनमध्ये सुरु असलेल्या कोल्ड वॉरपासून भारताने दूर राहण्याचा सल्ला चीनने दिला होता. तसेच भारताने अमेरिकेला साथ देत चीनच्या विरोधात काहीही पाऊल उचलंल तर कोरोनासारख्या महामारीसोबतच आर्थिक परिणाम देखील खूप खराब होतील, असा इशारा देखील चीनने भारताला दिला होता. याचदरम्यान आता पुन्हा चीनने भारताला धमकी दिली आहे.

चीनमधील वृत्तपत्र ग्लोबल टाइम्समध्ये लिहिलं आहे की, मोदी सरकार चीनला मित्र मानत असेल तर चीन आणि भारतामधील आर्थिक संबंधात मोठ्या प्रमाणात वाढ होईल. मात्र भारताने चीनला कमी लेखण्यासाठी अमेरिकासोबत गेला तर चीन राजकीय असो किंवा आर्थिक कोणत्याही बाबतीत भारताचा विचार करणार नाही. तसेच भारताला चीनसारख्या मित्राला गमावण्याची मोठी किंमत चुकवावी लागेल आणि ते भारताला सहन करणंही कठीण होईल, असा इशारा चीनने भारताला दिला आहे.

ग्लोबल टाईम्सने चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते चुनिंग यांचे हवाल्याने सांगितले आहे की, चीन आणि भारत यांनी सीमेवरील तणाव कमी करण्यासाठी सकारात्मक पावलं उचलली जात आहे. तसेच काही चिनी वृत्तपत्राने असे म्हटले आहे की, काही विश्लेषकांनी भारत आणि चीनच्या या भूमिकेचे  कौतुक केले आहे. सीमेवरील तणाव कमी झाल्याने दोन्ही देशांमधील आर्थिक आणि व्यापारिक देवाण- घेवाण करण्यास संधी मिळेल, जे दोन्ही देशांसाठी महत्वाचे आहे.

दरम्यान, याआधी देखील अमेरिका आणि चीनमध्ये सुरु असलेल्या कोल्ड वॉरपासून भारताने दूर राहण्याचा सल्ला चीनने दिला होता. भारताने अमेरिका आणि चीनमध्ये सुरु असलेल्या प्रकरणांपासून दूर राहिल्यास चांगले होईल. भारताने अमेरिकेला साथ देत चीनच्या विरोधात काहीही पाऊल उचलंल तर कोरोनासारख्या महामारीसोबतच आर्थिक परिणाम देखील खूप खराब होतील, असा इशारा चीनने भारताला दिला होता. भारतासोबत सुरु असलेल्या व्यवसायात आणखी चांगले संबंध राखण्याचे आमचे लक्ष असल्याचे देखील चीनकडून सांगण्यात आले आहे.

अमेरिकेने चीनवर घातले निर्बंध -

डोनाल्ड ट्रम्प यांनी काही चीनी नागरिकांवर अमेरिकेत येण्यासाठी निर्बंध घालणार असल्याची घोषणा केली आहे.  एवढेच नाही, तर चीनमधून अमेरिकेत होणाऱ्या गुंतवणुकीचे नियमही  कठोर करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. काही दिवसांपूर्वी अमेरिकन काँग्रेसमध्ये चीनविरोधात कठोर पावले उचलण्यासंदर्भात एक विधेयकही सादर करण्यात आले आहे.

टॅग्स :IndiaभारतchinaचीनAmericaअमेरिकाNarendra Modiनरेंद्र मोदीDonald Trumpडोनाल्ड ट्रम्पcorona virusकोरोना वायरस बातम्या