शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

भारताच्या 'अग्नि-5'मुळे चीनच्या पोटात जळजळ! परीक्षणावर म्हणाले- "आम्ही नाही घाबरत.."

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2024 11:51 IST

India Agni 5 Missile Test , China: अग्नि-५ चे यशस्वी परीक्षण म्हणजे चीनला इशारा असे पाश्चात्त्य देशांकडून वर्णन

India Agni 5 Missile Test , China: भारताच्या स्वदेशी बनावटीच्या अग्नी-5 क्षेपणास्त्राच्या यशस्वी चाचणीने चीनच्या पोटात जळजळ झाल्याचे दिसत आहे. चीन मान्य करत नसला तरी हे भारताचे मोठे यश असल्याचे त्यांनाही माहिती आहे. म्हणून चीनकडून या परीक्षणानंतर प्रतिक्रिया आली आहे. कोणत्याही देशाला किंवा त्यांच्याकडे असलेल्या शस्त्रांना आपण घाबरत नसल्याचेही चीनकडून आपणहून सांगण्यात आले आहे. चीनच्या चिडचिडीचा अंदाज त्याच्या अलीकडच्या विधानावरून लावता येतो, ज्यात अरुणाचल प्रदेशाबाबतही त्यांनी बेताल वक्तव्ये केली होती.

भारताने सोमवारी अग्नी-5 क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली आणि आंतरखंडीय क्षेपणास्त्र (ICBM) असलेल्या आघाडीच्या देशांच्या यादीत आपला समावेश केला. हे क्षेपणास्त्र मल्टिपल इंडिपेंडेंटली टार्गेटेबल री-एंट्री व्हेईकल (MIRV) तंत्रज्ञानाने सुसज्ज आहे. देशाच्या या यशाचे वर्णन पाश्चिमात्य माध्यमांनी चीन आणि पाकिस्तानला इशारा म्हणून केले आहे. चीनला ही गोष्ट पचनी पडलेली नाही. त्यामुळे त्यांच्या पोटात जळजळ सुरु झाली आहे.

ग्लोबल टाईम्समध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीत भारताने अग्नी-5 क्षेपणास्त्राची चाचणी केली आहे, ज्याची मारक श्रेणी 5 हजार किमी आहे. चिनी तज्ज्ञांनी याला आक्रमक म्हटले आहे. त्यात असेही लिहिले आहे की, अग्नी-5 ची यशस्वी चाचणी भारताने लांब पल्ल्याच्या शस्त्रास्त्रांच्या क्षेत्रात एक नवीन यश मिळवल्याचे सूचित करते. सिंघुआ विद्यापीठातील नॅशनल स्ट्रॅटेजी इन्स्टिट्यूटमधील संशोधन विभागाचे संचालक कियान फेंग म्हणाले की, पाश्चात्य मीडिया चीनला भारताचा काल्पनिक शत्रू मानतो. त्यामुळेच भारताचे उद्दिष्ट चीनवर क्षेपणास्त्र कव्हरेज असल्याचे सांगितले जात आहे.

आम्ही कुणालाच घाबरत नाही

चीन देशाच्या संरक्षणासाठी आणि सार्वभौमत्वासाठी सामरिक शस्त्रास्त्रांसह लष्करी तंत्रज्ञान विकसित करतो या भूमिकेवर चीन कायम ठाम असल्याचे चिनी तज्ञांचे म्हणणे आहे. भारत किंवा इतर कोणत्याही देशासोबत शस्त्रास्त्रांच्या शर्यतीत सहभागी होण्याचा त्यांचा कोणताही हेतू नाही. अर्थातच आम्ही शस्त्रास्त्रांच्या शर्यतीत सहभागी नाही, परंतु आम्ही कोणत्याही देशाच्या शस्त्रास्त्रांना किंवा त्यांच्या तथाकथित लष्करी दबावाला घाबरत नाही, असे चीनकडून सांगण्यात आले आहे.

टॅग्स :IndiaभारतXi Jinpingशी जिनपिंगchinaचीन