शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

उत्तराखंडवर चीनची नजर; नियंत्रण रेषेनजीक ड्रॅगन वसवतोय लष्करी गावे

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2023 05:30 IST

चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीने उत्तराखंडलगतच्या भागात लष्करी पायाभूत सुविधा वाढवण्यावर लक्ष केंद्रित केले आहे.

बीजिंग : सिक्कीम, लडाख आणि अरुणाचल प्रदेशच्या सीमावर्ती भागातील कारवायानंतर आता चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीने उत्तराखंडलगतच्या भागात लष्करी पायाभूत सुविधा वाढवण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. ही अशी ठिकाणे आहेत जिथे आतापर्यंत कोणत्याही प्रकारच्या तणावाचे वृत्त नव्हते.

या सीमावर्ती भागात कोणतेही स्थलांतर झालेले नाही. त्यामुळे चीनने लष्करी हेतूने ही उभारणी केल्याचे स्पष्ट होते. गलवान घटनेनंतर भारत व चीन सतत लष्करी चर्चेसाठी आग्रही आहेत. मागील महिन्यात पूर्व लडाख क्षेत्रातील एलएसीवरील तणाव कमी करण्यासाठी दोन्ही देशांत मुत्सद्दी पातळीवर चर्चा झाली.  अलीकडेच भारत आणि चीनमध्ये पुन्हा एकदा कॉर्प्स कमांडर स्तरावर बैठक झाली. चर्चेच्या १८ व्या फेरीला वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

सैन्य समोरासमोर

चीन लडाखजवळील भागात आपले सैन्यदल बळकट करत आहे. एवढेच नाही गस्त घालणाऱ्या भारतीय विमानांना धोका निर्माण करण्यासाठी त्याने हवाई संरक्षण यंत्रणाही तैनात केली आहे. त्याचवेळी भारत चीनच्या कोणत्याही गैरकृत्याला प्रत्युत्तर देण्यासाठी पूर्व लडाख क्षेत्रात नियमितपणे नवीन रडार आणि हवाई संरक्षण यंत्रणा तैनात करत आहे.

वादग्रस्त सुस्ता भागात नेपाळने केली बांधकामे

भारत व नेपाळच्या सीमेवरील सुस्ता या भागाबाबत असलेला वाद पुन्हा उफाळून आला आहे. नेपाळने पूर्वकल्पना न देता या वादग्रस्त भागात पोलिस दलासाठी इमारत, मुलांसाठी एक शाळा तसेच आठ खोल्यांच्या आणखी एका इमारतीचे बांधकाम सुरू केले आहे. ही बांधकामे थांबवावीत, असे एसएसबीच्या २१व्या तुकडीचे कमांडंट प्रकाश यांनी म्हटले आहे.

काय आहे चाल?

चिनी सैन्य दीर्घकाळापासून भारतालगत विशेषतः पूर्व लडाख, सिक्कीम व अरुणाचल प्रदेशजवळील सीमावर्ती भागात गावे बांधत आहे. आता उत्तराखंडलगतच्या सीमावर्ती भागात गावे बांधणे सुरू केल्याचे समोर आले आहे. या उपग्रह प्रतिमांवरून असे दिसून येते की चीन अतिशय वेगाने लष्करी पायाभूत सुविधा उभारत आहे.

सीमेपलीकडील दहशतवादाला न्याय्य नाही. भारत आज जगावर  आर्थिक प्रभाव पाडत आहे, ज्याची जगानेही कबुली दिली आहे. ‘ग्लोबल साउथ’ भारताला विश्वासार्ह भागीदार म्हणून पाहतो. भारत कोणताही दबाव, खोडसाळपणा आणि चुकीच्या चर्चेला बळी पडत नाही. - एस. जयशंकर, परराष्ट्र व्यवहारमंत्री. 

टॅग्स :chinaचीनUttarakhandउत्तराखंडS. Jaishankarएस. जयशंकर