शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
6
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
7
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
8
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
9
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
10
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
11
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
12
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
13
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
14
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
15
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
16
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
17
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
18
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
19
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
20
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
Daily Top 2Weekly Top 5

उत्तराखंडवर चीनची नजर; नियंत्रण रेषेनजीक ड्रॅगन वसवतोय लष्करी गावे

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2023 05:30 IST

चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीने उत्तराखंडलगतच्या भागात लष्करी पायाभूत सुविधा वाढवण्यावर लक्ष केंद्रित केले आहे.

बीजिंग : सिक्कीम, लडाख आणि अरुणाचल प्रदेशच्या सीमावर्ती भागातील कारवायानंतर आता चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीने उत्तराखंडलगतच्या भागात लष्करी पायाभूत सुविधा वाढवण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. ही अशी ठिकाणे आहेत जिथे आतापर्यंत कोणत्याही प्रकारच्या तणावाचे वृत्त नव्हते.

या सीमावर्ती भागात कोणतेही स्थलांतर झालेले नाही. त्यामुळे चीनने लष्करी हेतूने ही उभारणी केल्याचे स्पष्ट होते. गलवान घटनेनंतर भारत व चीन सतत लष्करी चर्चेसाठी आग्रही आहेत. मागील महिन्यात पूर्व लडाख क्षेत्रातील एलएसीवरील तणाव कमी करण्यासाठी दोन्ही देशांत मुत्सद्दी पातळीवर चर्चा झाली.  अलीकडेच भारत आणि चीनमध्ये पुन्हा एकदा कॉर्प्स कमांडर स्तरावर बैठक झाली. चर्चेच्या १८ व्या फेरीला वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

सैन्य समोरासमोर

चीन लडाखजवळील भागात आपले सैन्यदल बळकट करत आहे. एवढेच नाही गस्त घालणाऱ्या भारतीय विमानांना धोका निर्माण करण्यासाठी त्याने हवाई संरक्षण यंत्रणाही तैनात केली आहे. त्याचवेळी भारत चीनच्या कोणत्याही गैरकृत्याला प्रत्युत्तर देण्यासाठी पूर्व लडाख क्षेत्रात नियमितपणे नवीन रडार आणि हवाई संरक्षण यंत्रणा तैनात करत आहे.

वादग्रस्त सुस्ता भागात नेपाळने केली बांधकामे

भारत व नेपाळच्या सीमेवरील सुस्ता या भागाबाबत असलेला वाद पुन्हा उफाळून आला आहे. नेपाळने पूर्वकल्पना न देता या वादग्रस्त भागात पोलिस दलासाठी इमारत, मुलांसाठी एक शाळा तसेच आठ खोल्यांच्या आणखी एका इमारतीचे बांधकाम सुरू केले आहे. ही बांधकामे थांबवावीत, असे एसएसबीच्या २१व्या तुकडीचे कमांडंट प्रकाश यांनी म्हटले आहे.

काय आहे चाल?

चिनी सैन्य दीर्घकाळापासून भारतालगत विशेषतः पूर्व लडाख, सिक्कीम व अरुणाचल प्रदेशजवळील सीमावर्ती भागात गावे बांधत आहे. आता उत्तराखंडलगतच्या सीमावर्ती भागात गावे बांधणे सुरू केल्याचे समोर आले आहे. या उपग्रह प्रतिमांवरून असे दिसून येते की चीन अतिशय वेगाने लष्करी पायाभूत सुविधा उभारत आहे.

सीमेपलीकडील दहशतवादाला न्याय्य नाही. भारत आज जगावर  आर्थिक प्रभाव पाडत आहे, ज्याची जगानेही कबुली दिली आहे. ‘ग्लोबल साउथ’ भारताला विश्वासार्ह भागीदार म्हणून पाहतो. भारत कोणताही दबाव, खोडसाळपणा आणि चुकीच्या चर्चेला बळी पडत नाही. - एस. जयशंकर, परराष्ट्र व्यवहारमंत्री. 

टॅग्स :chinaचीनUttarakhandउत्तराखंडS. Jaishankarएस. जयशंकर