शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

'ड्रॅगन'चा जळफळाट; 'ते' ३० हजार नकाशे चीनने नष्ट केले!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2019 17:41 IST

अरुणाचल प्रदेश भारताचा अभिन्न हिस्सा आहे. मात्र, चीन अरुणाचल प्रदेशवर दावा करत आला असून तेथे भारतीय नेत्यांना जाण्यासही विरोध करत असतो.

बीजिंग : एकीकडे इंटनेटसह सरकारी कार्यक्रमांमध्ये भारताचा आक्षेपार्ह नकाशा झळकत असताना चीननेअरुणाचल प्रदेश आणि तैवान त्यांचे क्षेत्र नाही असे दर्शविणारे तब्बल 30 हजार नकाशे नष्ट केले आहेत. महत्वाचे म्हणजे हे नकाशा एका अज्ञात देशाला पाठविण्यासाठी छापण्यात आले होते. 

अरुणाचल प्रदेशभारताचा अभिन्न हिस्सा आहे. मात्र, चीन अरुणाचल प्रदेशवर दावा करत आला असून तेथे भारतीय नेत्यांसह सैन्यालाही जाण्यास विरोध करत असतो. दोन्ही देशांदरम्यान 3488 किमीची प्रत्यक्ष नियंत्रण रेषा आहे. यावरूनही चीन वाद घालत असून भारतासोबत आतापर्यंत 21 चर्चा झाल्या आहेत. चीन पासून वेगळा असलेला देश तैवानवरही आपला हक्क सांगत आहे. 

चीनचे सरकारी वृत्तपत्र ग्लोबल टाईम्समधील वृत्तानुसार चीनच्या सीमा शुल्क विभागाने आंतरराष्ट्रीय नकाशा दर्शविणारे असे 30 हजार नकाशे नष्ट केले आहेत. चीनमध्ये या नकाशांची छपाई करण्यात आली होती. मंगळवारी हे वृत्त छापून आले आहे. हे नकाशे कोणत्यातरी देशाला पाठविण्यात येणार होते. मात्र, या देशाचे नाव समजलेले नाही. चीनच्या किंग्डाओमध्ये सीमा शुल्कच्या अधिकाऱ्यांनी हो नकाशे नष्ट केले. या नकाशांमध्ये तैवानला चीनपासून वेगळा देश दर्शविण्यात आले होते आणि चीन-भारत सीमेचे चुकीचे चित्रण केल्याचा आरोप होता. 

चीनच्या या कृत्याचे इंटरनॅशनल लॉ ऑफ चायना फॉरेन अफेयर्स युनिव्हर्सिटीचे प्राध्यापक लियु वेंगजोंग यांनी समर्थन केले आहे. चीनने यासंबंधी उचललेले पाऊल योग्य आहे. कारण कोणत्याही देशाला त्याचे सार्वभौमत्व आणि श्रेत्रीय अखंडता ठेवणे अत्यंत गरजेचे असते. तैवान आणि दक्षिण तिबेट हे भाग चीनचेच आहेत जे आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार चीनचे अभिन्न भाग आहेत. 

टॅग्स :chinaचीनArunachal Pradeshअरुणाचल प्रदेशIndiaभारतborder disputeसीमा वाद