शहरं
Join us  
Trending Stories
1
भावाचा हातात हात, तोंडावर मास्क, हात उंचावून अभिवादन; आजारपणातही संजय राऊत बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळावर
2
"बाळासाहेबांची प्रतिमा चोरून हिंदुत्वाचे वारस म्हणून मतं मागणाऱ्यांची..."; राज ठाकरेंचे 'फटकारे', कुणावर डागली तोफ?
3
"मी हे मान्यच करू शकत नाही..."; टीम इंडियाच्या पराभवानंतर चेतेश्वर पुजाराने चांगलंच सुनावलं
4
५ वर्षांत ५३०० टक्के रिटर्न; आता 'हा' शेअर पुन्हा सुस्साट! सातत्यानं लागतंय अपर सर्किट, कारण काय?
5
भारताचा अमेरिकेसोबत ऐतिहासिक LPG करार; घरगुती गॅस सिलिंडरची किंमत कमी होणार?
6
Protest: आधी ‘शेल्टर’ची व्यवस्था करा, नंतरच श्वानांना हात लावा; प्राणीमित्र संघटना रस्त्यावर!
7
गौतम अदानी आणताहेत देशातील सर्वात मोठा राइट्स इश्यू; ७१६ रुपये स्वस्त मिळतोय शेअर, पाहा डिटेल्स
8
खळबळजनक! थारसाठी पत्नीची हत्या, हुंड्यासाठी पती झाला हैवान; भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
9
SIR च्या कामाचा भार असह्य; वरिष्ठाच्या धमक्यांना कंटाळून शिक्षकाची रेल्वेखाली उडी, एकाच दिवशी दोन कर्मचाऱ्यांचे टोकाचे पाऊल
10
Ritual: पानाच्या टपरीवर का असते शंकराची पितळी मूर्ती? धार्मिक मान्यता की आणखी काही?
11
सौदी अरेबियात भीषण अपघात, ४२ भारतीयांचा मृत्यू; प्रवासी बस डिझेल टँकरला धडकली, आगीचा उडाला भडका
12
सुश्मिता सेनने पूर्ण शुद्धीत राहूनच केलेली अँजिओप्लास्टी, दोन वर्षांपूर्वी आलेला हार्टॲटॅक
13
काँगोमधील तांब्याच्या खाणीत मोठी दुर्घटना; पूल कोसळून ३२ जणांचा मृत्यू, अनेक जण अजूनही बेपत्ता
14
आई वडिलांची एक चूक नडली, मुलाला झाला गंभीर आजार; हाताचे बोट कापावे लागले, कारण काय?
15
Delhi Blast : दिल्ली स्फोटातील डॉ. शाहीनच्या कोट्यवधींच्या फंडिंगबाबत धक्कादायक खुलासा, ATS-NIA चे छापे
16
टॅक्स भरणे झाले सोपे! बँक, नेट बँकिंगचा झंझट नाही; आता UPI ॲपद्वारे मिनिटांत भरा प्राप्तीकर
17
पालघर साधू हत्याकांडात आरोप केले, त्यालाच पक्षात घेतले? चौफेर टीका होताच भाजपानं दिलं असं स्पष्टीकरण
18
देवेंद्र फडणवीसांना भेटला, सत्कार करून घेतला; पंतप्रधान कार्यालयात सचिव म्हणणारा निघाला...
19
नोकरीच्या शोधात असलेल्यांसाठी सुवर्णसंधी! ९०% कंपन्या 'या' पदावर प्रोफेशनल्सची करणार भरती
20
देवेंद्र फडणवीसांचं 'धक्कातंत्र'! उद्धव ठाकरेंसह आदित्य ठाकरेंवर पुन्हा सोपवली जबाबदारी
Daily Top 2Weekly Top 5

सत्ता बदलली सूरही बदलला; नेपाळ म्हणाला,"विशेष शेजारी म्हणून चीन भारताची जागा घेऊ शकत नाही"

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2021 19:10 IST

Nepal On India and China : नेपाळमध्ये सध्या नेपाळी काँग्रेसचं सरकार सत्तेत आहे. शेर बहादूर देउबा यांना १३ ऑगस्ट रोजी पंतप्रधानपदी पूर्ण झाला महिना. 

ठळक मुद्देनेपाळमध्ये सध्या नेपाळी काँग्रेसचं सरकार सत्तेत आहे.शेर बहादूर देउबा यांना १३ ऑगस्ट रोजी पंतप्रधानपदी पूर्ण झाला महिना. 

नेपाळमध्ये सध्या नेपाळी काँग्रेस सत्तेत आली आहे. शेर बहादूर देउबा यांनी १३ ऑगस्ट रोजी आपल्या पंतप्रधानपदाच्या कार्यकाळाचा एक महिना पूर्ण केला. यापूर्वी नेपाळच्या पंतप्रधानपदाची सूत्रं केपी शर्मा ओली यांच्या हाती होती. त्यांच्या कार्यकाळात भारत आणि नेपाळ या देशांच्या संबंधांमध्ये थोडा तणाव आला होता. परंतु आता नेपाळी काँग्रेसनं मात्र भारताबद्दलचं प्रेम बोलून दाखवलं आहे. "चीन एक विशेष शेजारी म्हणून भारताची जागा कधीच घेऊ शकत नाही," असं नेपाळी काँग्रेसनं म्हटलं आहे. 

दरम्यान, नेपाळी काँग्रेसनं लिम्पियाधुरा-कालापानी-लिपुलेख प्रकरणीही तोडगा काढण्यावर विशेष जोर दिला. सध्या पंतप्रधान देउबा यांनी आपल्या सोबत असलेल्या सहकारी पक्षासोबत मिळून कामाला सुरूवात केली आहे. नेपाळनं गेल्या वर्षी लिम्पियाधुरा-कालापानी-लिपुलेख हे भाग आपल्या नकाशामध्ये जोडून त्यावर आपला दावा केला होता. टाईम्स ऑफ इंडियानं दिलेल्या वृत्तानुसार नेपाळचे माजी अर्थ राज्यमंत्री आणि नेपाळ काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उदय शमशेर राणा यांनी नेपाळ 'शेजारी प्रथम' या सिद्धांतावर काम करत राहणार असल्याचं म्हटलं.याशिलाय अन्य देशांशीही संबंध उत्तम ठेवण्यावर भर दिला जाणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. 

भारत आमच्यासाठी विशेष"नेपाळला चीनची गरज आहे आणि चीन आमचा उत्तम शेजारी राहिला आहे. परंतु भारत आमच्यासाठी विशेष आहे. चीन भारताची जागा कधीच घेऊ शकत नाही. पंतप्रधान देउबा यांना समस्यांचं योग्यरित्या समाधान काढावं लागणार आहे. कारण ते एका नाजुक युती सरकारचं नेतृत्व करत आहेत. त्यांना आपल्या सहकाऱ्यांना सोबत घेऊन भारत आणि चीन सोबत स्थिर संबंध प्रस्थापित करावे लागतील," असंही राणा म्हणाले. 

मोठ्या प्रमाणात विकासात सहकार्यनेपाळ भारतासाठी स्ट्रॅटेजिक महत्त्व ठेवतो असं भारताचं म्हणणं आहे. "भारत आणि नपाळ दरम्यान द्विपक्षीय संबंध अधिक मजबूत करण्यास कटिबद्ध आहोत," असं भाजपचे प्रवक्ते गोपाल कृष्ण अग्रवाल यांनी सांगितलं. काठमांडूतील भारतीय दुतावासानुसार भारत मोठ्या प्रमाणात नेपाळला विकासात मदत करत आहे. पायाभूत सुविधा, आरोग्य, जल संवर्धन, शिक्षण, ग्रामीण आणि सामुदायिक विकास यामध्ये मोठ्या प्रमाणात काम करत असल्याचंही सांगण्यात आलं. 

टॅग्स :IndiaभारतNepalनेपाळchinaचीनprime ministerपंतप्रधान