शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

भारताविरोधात चीन- बांगलादेशचा कट? चीनच्या राजदूताने जमात-ए-इस्लामी पक्षाची भेट घेतली

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2024 15:04 IST

बांगलादेशात काही दिवसापूर्वी सत्तांतर झाले आहे. जमात-ए-इस्लामी बांगलादेश पक्षाने सत्ता स्थापन केली आहे. आता या पक्षाने चीनसोबत संबंध वाढवले आहेत.

काही दिवसापूर्वी बांगलादेशात नोकरीतील आरक्षणाविरोधात आंदोलन सुरू होते. या आंदोलनामुळे बांगलादेशात सत्तांत्तर झाले. माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी पदाचा राजीनामा देऊन देश सोडला. शेख हसीना यांचे सरकार पडल्यानंतर आता चीन भारताविरुद्ध कट रचत आहे. बांगलादेशमध्ये चीन भारतविरोधी संघटनांना भेटत असल्याच्या बातम्या येत आहेत. चीन बांगलादेशातील नवीन सरकार आणि इस्लामिक पक्षांशी मैत्री वाढवत आहे.

सोमवारी चीनचे राजदूत याओ वेन ढाका येथील जमात-ए-इस्लामी बांगलादेश पक्षाच्या कार्यालयात पोहोचले, तेथे त्यांनी पक्षाचे कौतुकही केले. चीनच्या राजदूताने सांगितले की, जमात-ए-इस्लामी हा एक सुसंघटित पक्ष आहे. बांगलादेशमध्ये जमात-ए-इस्लामी भारताला विरोध करते, शेख हसीना सरकारने त्यावर बंदी घातली होती, परंतु मोहम्मद युनूस यांच्या अंतरिम सरकारने ही बंदी हटवली.

महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण? शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं

शेख हसीना यांच्या सरकारच्या काळातही चीन भारताविरुद्ध कट रचत होता. शेख हसीना यांच्या अवामी लीग या पक्षाशीही चीनचे सखोल संबंध होते. आता चीन बांगलादेशातील अंतरिम सरकार आणि जमात-ए-इस्लामी सारख्या संघटनांशी मैत्री करत आहे. ही संपूर्ण घटना भारतासाठी चिंतेची बाब आहे, कारण बांगलादेशातील भारताच्या प्रभावामुळे जमात-ए-इस्लामी पक्षही चिडला आहे.

जर हा पक्ष चीनच्या पाठिंब्याने सत्तेत आला तर बांगलादेशात असे सरकार स्थापन होईल जे दहशतवाद, सीमा सुरक्षा आणि प्रादेशिक स्थैर्य या मुद्द्यांवर भारताच्या विरोधात असेल. नवीन सरकारमध्ये चीन बांगलादेशातील बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह प्रकल्पाला गती देऊ शकतो, जेणेकरून भारताचा प्रभाव कमी करता येईल. अंतरिम सरकारचे परराष्ट्र व्यवहार सल्लागार तौहीद हुसैन यांनी जूनमध्ये भारतासोबत केलेले करार राष्ट्रीय हितसंबंधांनुसार नसतील तर त्यांचा पुनर्विचार केला जाईल, असं म्हटल्याची माहिती मिळाली होती. शेख हसीना यांच्या २२ जूनच्या भारत दौऱ्यादरम्यान या सर्व करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या होत्या.

टॅग्स :Bangladeshबांगलादेश