शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
7
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
8
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
9
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
10
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
11
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
12
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
13
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
14
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
15
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
16
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
17
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
18
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
19
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
20
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!

“मोदी सरकारने मुस्लिमविरोधी भावना भडकवणे थांबवले पाहिजे”; कॅनडातील नेत्याचा घणाघात

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2022 16:50 IST

भारत सरकारने मानवी हक्कांचे संरक्षण केले पाहिजे, असे कॅनडातील नेते जगमीत सिंग यांनी म्हटले आहे.

ओटावा: भारतात श्रीराम नवमीच्या दिवशी काही ठिकाणी झालेल्या हिंसाचारावरून आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. अशातच आता कॅनडाील न्यू डेमोक्रेटिक पक्षाचे नेते जगमीत सिंग यांनी भारतातील मोदी सरकारवर निशाणा साधत, मोदी सरकारने मुस्लिमविरोधी भावना भडकावणे बंद करावे, अशी घणाघाती टीका केली आहे. ट्विटरच्या माध्यमातून भारतातील घटनांची दखल घेत सिंग यांनी भारत सरकारवर आरोप केले आहेत. 

भारतातील मुस्लिम समुदायाविरुद्ध हिंसाचाराच्या घटना, त्याचे फोटो आणि व्हिडिओ पाहून खूप चिंता वाटू लागली आहे. मला भारतातील त्या परिस्थितीची खूप काळजी वाटते आहे. मोदी सरकारने मुस्लिमविरोधी भावना भडकवण्याचे थांबवले पाहिजे. मानवी हक्कांचे संरक्षण केले पाहिजे, असे मोठे आरोप करत, सर्वत्र शांततेच्या दिशेने काम करण्यासाठी कॅनडाने मजबूत भूमिका बजावली पाहिजे, असे जगमीत सिंग यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. 

अमेरिकेनेही व्यक्त केली चिंता

कॅनडाशिवाय अमेरिकेनेही भारतातील हिंसाचाराबाबत चिंता व्यक्त केली आहे. अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री एंटनी ब्लिंकन यांनी भाष्य केले आहे. भारतातील मानवी हक्कांचे उल्लंघन होणाऱ्या घटनांवर आम्ही लक्ष ठेवून असतो. भारतासोबत यासंदर्भात नियमितपणे, सातत्याने चर्चा करत असतो. भारतातील काही राज्य सरकार, पोलीस आणि कारागृह प्रशासनाकडून होणाऱ्या मानवाधिकार उल्लंघनाच्या घटनांवरही आमचे लक्ष आहे, असे ब्लिंकन यांनी यापूर्वी म्हटले होते. 

दरम्यान, कोरोना संकटानंतर देशभरात मोठ्या प्रमाणात राम नवमीचा उत्साह पाहायला मिळाला होता. देशातील अनेकविध ठिकाणी शोभायात्रांचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, काही ठिकाणी या शोभायात्रांमध्ये हिंसाचाराच्या घटना घडल्याचे समोर आले. मध्य प्रदेशात घडलेल्या हिंसाचारात आतापर्यंत १०० हून अधिक लोकांना अटक करण्यात आली आहे.  

टॅग्स :CanadaकॅनडाCentral Governmentकेंद्र सरकारIndiaभारत