शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

'मी पंतप्रधान झालो तर संबंध सुधारतील'; कॅनडाचा 'हा' ताकदवान नेता भारताच्या पाठीशी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2023 07:59 IST

कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जर यांच्या हत्येत भारत सरकारचा संबंध असल्याचा दावा केला आहे.

गेल्या काही दिवसापासून कॅनडा आणि भारत या दोन देशाचे संबंध बिघडले आहेत. कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रुडो यांनी भारतावर  खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जर यांच्या हत्येत भारत सरकारचा संबंध असल्याचा आरोप केला आहे, यावरुन आरोप-प्रत्यारोपही झाले. दरम्यान, भारताशी बिघडत चाललेल्या संबंधांदरम्यान कॅनडाच्या कंझर्व्हेटिव्ह पक्षाचे प्रमुख आणि विरोधी पक्षनेते पियरे पॉइलीव्हरे यांनी मोठे विधान केले आहे.

पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांचा निषेध केला असून ते कॅनडाचे पंतप्रधान झाल्यास भारतासोबतचे संबंध पूर्ववत करतील, असं ते म्हणाले. “आम्हाला भारत सरकारसोबत व्यावसायिक संबंध हवे आहेत. भारत ही पृथ्वीवरील सर्वात मोठी लोकशाही आहे. आपले मतभेद असणे आणि एकमेकांना जबाबदार धरणे ठीक आहे, पण आपल्याला व्यावसायिक संबंध ठेवायला हवे. मी या देशाचा पंतप्रधान झाल्यावर ते पुनर्संचयित करेन, असं पियरे पॉइलीव्हरे म्हणाले.

हल्ले वाढले, २ ओलीस सुटले; गाझावर इस्रायली हवाई मोहीम तीव्र, २४ तासांत ७०० हून अधिक मृत्यू

भारतातून ४१ कॅनेडियन मुत्सद्दी माघारी घेण्याबाबत पॉइलिव्हरे यांना विचारण्यात आले तेव्हा त्यांनी ट्रुडो यांच्यावर आरोप केले. असेहीपॉइलिव्हरे म्हणाले की, कॅनडा आता भारतासह जगातील जवळजवळ प्रत्येक मोठ्या शक्तीशी मोठ्या वादात आहे."माझा विश्वास आहे की जे लोक मालमत्तेचे नुकसान करतात किंवा हिंदू मंदिरांमध्ये नुकसान करतात त्यांना इतर प्रकरणांप्रमाणेच गुन्हेगारी आरोपांना सामोरे जावे लागेल." 

कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जर आणि भारत सरकार यांच्यातील संबंध असल्याचा दावा केल्यानंतर भारत आणि कॅनडाचे संबंध ताणले आहेत. जून महिन्यात कॅनडातील एका गुरुद्वाराबाहेर दोन अज्ञात हल्लेखोरांनी निज्जरची हत्या केली होती.

टॅग्स :CanadaकॅनडाIndiaभारत