शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

खलिस्तानी हरदीपसिंग निज्जरसाठी कॅनडाच्या संसदेने पाळलं मौन; भारत 'कनिष्क'च्या माध्यमातून देणार प्रत्युत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2024 17:27 IST

कॅनडाच्या संसदेने खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जरचा सन्मान केल्यामुळे भारताचा कनिष्क विमानाची ३९ वी पुण्यतिथी साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे.

Kanishka Flight Anniversary : खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जर याच्याविषयी कॅनडाचे प्रेम अद्यापही कमी झालेलं नाही. वर्षभरापूर्वी अमेरिकेत हरदीपसिंग निज्जर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. मात्र कॅनडाची खलिस्तानींबद्दलची सहानुभूती पुन्हा एकदा समोर आली आहे. खलिस्तानी दहशतवादी हरदीप निज्जरसाठी कॅनडाच्या संसदेने मौन पाळले. हाऊस ऑफ कॉमन्समध्ये अध्यक्ष ग्रेग फर्गस यांनी निज्जर यांच्यावरील शोकसंदेश वाचला. कॅनडाच्या संसदेने खलिस्तानी दहशतवादी निज्जरला त्याच्या पहिल्या पुण्यतिथीनिमित्त श्रद्धांजली वाहिली. मात्र आता भारतानेही याला प्रत्युत्तर देण्याचे ठरवलं आहे.

खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जर याच्या स्मरणार्थ कॅनडाच्या संसदेत दोन मिनिटे मौन पाळण्यात आले. गेल्या वर्षी त्याची हत्या झाली होती. 23 जून रोजी कनिष्क विमान दुर्घटनेला ३९ वर्षे पूर्ण होत असताना कॅनडाच्या संसदेने हे लज्जास्पद कृत्य केले आहे. भारताने हरदीपसिंग निज्जरला दहशतवादी घोषित केले होते. भारताने आता कॅनडाला याबाबत सडेतोड उत्तर देण्याचे ठरवलं आहे. व्हँकुव्हर येथील भारतीय दूतावासाने खलिस्तानी हल्ल्यात कोसळलेल्या एअर इंडियाच्या कनिष्क विमानाच्या ३९ व्या पुण्यतिथीनिमित्त श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्याचा निर्णय घेतला आहे. १९८५ साली झालेल्या या हल्ल्यात ३९ लोक मारले गेले होते.

मंगळवारी कॅनडाच्या संसदेत कामकाज संपत आले असताना सभागृहाच्या अध्यक्षांनी यासंदर्भातील प्रस्ताव मांडला होता. "मला असं वाटतंय की वर्षभरापूर्वी हरदीप सिंग निज्जर याची ब्रिटिश कोलंबिया परिसरात हत्या करण्यात आल्याबद्दल सभागृहात दोन मिनिटांचं मौन पाळण्यावर सर्व सभासदांची सहमती झाली आहे," असे ग्रेग फर्गस यांनी म्हटलं. त्यानंतर हरदीपसिंग निज्जर याला श्रद्धांजली वाहण्यासाठी सभागृहातील सदस्य दोन मिनिटे मौन बाळगून उभे होते. या सगळ्या प्रकारानंतर भारतीय दूतावासाने सोशल मीडियावर पोस्ट करत प्रत्युत्तर दिलं आहे.

"भारत नेहमीच दहशतवाद आणि दहशतवादाचे समर्थन करणाऱ्या आणि जगाच्या शांततेला धोका निर्माण करणाऱ्या सर्व देशांच्या विरोधात उभा राहिला आहे. एअर इंडियाचे विमान कनिष्कवर झालेला हल्ला हा विमान वाहतुकीच्या इतिहासातील सर्वात भ्याड हल्ला होता. या हल्ल्यात ३२९ निष्पाप लोकांना आपला जीव गमवावा लागला, ज्यात ८६ मुलांचा समावेश होता. २३ जून २०२४ रोजी या हल्ल्याच्या ३९ व्या वर्धापनदिनानिमित्त आम्ही त्या सर्वांच्या स्मृतीप्रित्यर्थ एका समारंभाचे आयोजन करणार आहोत. आम्ही सर्व इंडो-कॅनडियन लोकांना या दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एकत्र येण्याचे आवाहन करतो," असे या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

काय होती कनिष्क विमान दुर्घटना?

२३ जून १९८५ रोजी मॉन्ट्रियलहून लंडनला जात असताना एअर इंडियाचे विमान कनिष्क बॉम्बस्फोटांमुळे कोसळे होते. या हल्ल्याची जबाबदारी खलिस्तानी दहशतवादी संघटनांनी घेतली होती. या हल्ल्यात २६८ कॅनेडियन, २७ ब्रिटिश आणि २४ भारतीय नागरिकांसह ३२९ लोकांचा मृत्यू झाला होता. विमानाच्या इतिहासातील हा सर्वात प्राणघातक हल्ला होता.

टॅग्स :CanadaकॅनडाIndiaभारतNarendra Modiनरेंद्र मोदीJustin Trudeauजस्टीन ट्रुडोterroristदहशतवादी