शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

कॅनडाने जाहीर केलं नवं 'इमिग्रेशन धोरण'; भारतीय विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर होणार परिणाम?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2024 15:27 IST

पंतप्रधान ट्रुडो यांच्या घोषणेनंतर कॅनडामध्ये राहणाऱ्या भारतीय कामगार, विद्यार्थ्यांना स्थानिकांकडून विरोध सुरू झाला आहे.

Canada Immigration policy, Indian Students: कॅनडा आणि भारत यांच्यात गेल्या काही महिन्यांपासून राजकीय तणावाचे वातावरण दिसून आले. कॅनडातूनभारतात येणाऱ्या प्रवाशांवर काही निर्बंध होते. तसेच कॅनडानेही भारतीय प्रवाशांवर काही नियम व अटी लागू केल्या होत्या. तशातच आता कॅनडाने आता धोरणात काही बदल केले आहेत. त्यामुळे भारतीय विद्यार्थ्यांच्या जीवनावर काही परिणाम होऊ शकतो असे बोलले जात आहे.

कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एका पोस्टमध्ये लिहिले, "आम्ही कॅनडात येणाऱ्या कमी पगाराच्या, तात्पुरत्या परदेशी कामगारांची संख्या कमी करत आहोत. श्रमिक बाजारपेठ बदलली आहे. आता आमच्या व्यवसायिकांनी कॅनडाच्या कामगार आणि तरुणांमध्ये गुंतवणूक करण्याची वेळ आली आहे." कॅनडामध्ये करण्यात आलेल्या या धोरणात्मक बदलाविरोधात आता विद्यार्थ्यांची तेथे आंदोलनेही सुरू झाली आहेत. पण ट्रुडो यांच्या घोषणेनंतर कॅनडामध्ये राहणाऱ्या भारतीय कामगार आणि विद्यार्थ्यांना स्थानिकांकडून विरोध सुरू झाला.

कॅनडाच्या सरकारने आतापर्यंत असे म्हटले आहे की स्थलांतरितांना येथे आणण्याचे मुख्य कारण म्हणजे आर्थिक वाढ आणि लवचिकता वाढवणे. आता धोरणातील बदलानंतर भारतीय विद्यार्थ्यांची फसवणूक झाल्याची भावना विद्यार्थ्यांमध्ये आहे. कॅनडामध्ये राहणाऱ्या परदेशी विद्यार्थ्यांपैकी ४० टक्के विद्यार्थी हे भारतातील आहेत. त्यामुळे या धोरणात्मक बदलांमुळे सुमारे ७० हजारांहून अधिक परदेशी विद्यार्थ्यांवर कॅनडामध्ये मायदेशी परत जाण्याची टांगती तलवार असणार आहे.

टॅग्स :CanadaकॅनडाStudentविद्यार्थीIndiaभारतJustin Trudeauजस्टीन ट्रुडो