शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

काश्मिरींना स्वयंनिर्णयाचा अधिकार द्या, तिथे आंतरराष्ट्रीय हस्तक्षेप करा; ब्रिटनमधील मजूर पक्षाची मागणी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2019 11:48 IST

ब्रिटनमधील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या मजूर पक्षाने बुधवारी एक आपातकालिन प्रस्ताव पारीत केला असून, या प्रस्तावाच्या माध्यमातून काश्मीरमध्ये आंतरराष्ट्रीय हस्तक्षेपाची मागणी केली आहे.

लंडन - ब्रिटनमधील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या मजूर पक्षाने बुधवारी एक आपातकालिन प्रस्ताव पारीत केला असून, या प्रस्तावाच्या माध्यमातून काश्मीरमध्ये आंतरराष्ट्रीय हस्तक्षेपाची मागणी केली आहे. तसेच संयुक्त राष्ट्रांच्या प्रस्तावांप्रमाणे काश्मीरमधील जनतेला स्वयंनिर्णयाचा अधिकार मिळाला पाहिजे, असे या प्रस्तावात म्हटले आहे. दरम्यान, या प्रस्तावाविरोधात भारताने संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली असून, मदूर पक्षाच्या प्रतिनिधींबरोबरचा वार्षिक कार्यक्रम रद्द केले आहे. तसे ब्रिटनमधील भारतीय वंशाच्या समुदायानेही या प्रस्तावाविरोधात संताप व्यक्त केला आहे. भारतीय परराष्च्र मंत्रालयाचे प्रवक्ते रविश कुमार यांनी काश्मीरच्या प्रश्नावर आंतरराष्ट्रीय हस्तक्षेपाची मागणी करणाऱ्या ब्रिटनमधील मजूर पक्षावर जोरदार टीका केली आहे. तसेच मजूर पक्षाचे हे पाऊल केवळ व्होटबँक नजरेसमोर ठेवून उचललेले आहे, असा टोला त्यांनी लगावला. यासंदर्भात मजूर पक्षाशी चर्चा करण्याचा प्रश्नही उदभवत नाही, असेही रविश कुमार यांनी स्पष्ट केले. काश्मीर प्रश्न हा भारत आणि पाकिस्तानमधील द्विपक्षीय प्रश्न आहे, अशी ब्रिटिश सरकारची अधिकृत भूमिका आहे. मात्र या भूमिकेच्या एकदम विरोधातील प्रस्तावर मजूर पक्षाकडून मांडला गेला आहे.  मजूर पक्षामध्ये या प्रस्तावाची चर्चा सुरू झाल्यावर ब्रिटनमधील भारतीय उच्चायोगाने लेबर फ्रेंड्स ऑफ इंडिया या नावाने मजूर पक्षाच्या प्रतिनिधींसोबत होणारा वार्षिक कार्यक्रम रद्द केला. तसेस ब्रिटनमध्ये स्थायिक झालेल्या भारतीयांनीही याबाबात नाराजी व्यक्त केली आहे. मजूर पक्षाने याआधीही काश्मीर प्रश्नावरून भारताविरोधात भूमिका घेतलेली आहे. त्या पार्श्वभूमीवर मजूर पक्षासोबत भारतीय समुदायाच्या संबंधांवर लक्ष ठेवणाऱ्या लेबर्स इंडियन कम्युनिटी एंगेजमेंट फोरमचे माजी चेअरमन मनोज लाडवा यांनीही या प्रस्तावाविरोधात संताप व्यक्त केला आहे. 'आता मजूर पक्षाला डावे, कट्टरपंथी आणि जिहादी समर्थकांनी हायजॅक केले आहे,' असे त्यांनी म्हटले आहे. पाकिस्तानी वंशाच्या ब्रिटिश नागरिक असलेल्या उजमा रसूल यांनी हा प्रस्ताव दाखल केला होता. त्यात त्यांनी पीओकेचा उल्लेख पाकिस्तान प्रशासित काश्मीर असा केला होता. 'गेल्या 72 वर्षांपासून काश्मीरमध्ये मानवाधिकारांचे उल्लंघन होत आहे, लष्कर अत्याचार करत आहे आणि नागरिक पॅलेट गनची शिकार होत आहेत, असे आरोप केले होते. काश्मीर हा द्विपक्षीय प्रश्न असल्याचे आम्ही अनेक वर्षांपासून सांगत आहोत. मात्र आता काश्मीमधील जनतेसाठी हस्तक्षेपाची गरज आहे,' असे त्या म्हणाल्या.   

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरIndiaभारतEnglandइंग्लंडPakistanपाकिस्तान