शहरं
Join us  
Trending Stories
1
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
2
IND vs ENG 5th Test Day 2, Stumps : दिवसभरात १५ विकेट्स! यशस्वी खेळीसह टीम इंडियाला दिलासा
3
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
4
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
5
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
6
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
7
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
8
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
9
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
10
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
11
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
12
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
13
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
14
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
15
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
16
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
17
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
18
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
19
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
20
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर

भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2024 19:08 IST

यावेळी त्यांनी गेल्या शंभर वर्षांतील भारताच्या प्रगतीचे कौतुक केले आणि ती जागतिक स्तरावर मोठी भूमिका बजावत असल्याचे म्हटले आहे.

पाश्चात्य देश गंभीर संकटात आहेत आणि भारताने ब्रिटिश अर्थव्यवस्थेला मागे टाकले आहे. जेथे अनेक महत्त्वपूर्ण आर्थिक धोरणे आणि सुधारणा झाल्या आहेत, असे ब्रिटनच्या माजी पंतप्रधान एलिझाबेथ ट्रस यांनी शनिवारी हिंदुस्तान टाइम्स लीडरशिप समिटमध्ये  म्हटले आहे.

ट्रस म्हणाल्या, "तंत्रज्ञान आणि कृषीसारख्या क्षेत्रात भारत आणि ब्रिटन यांच्यात खूप काही साध्य करता येऊ शकते. यावेळी त्यांनी गेल्या शंभर वर्षांतील भारताच्या प्रगतीचे कौतुक केले आणि ती जागतिक स्तरावर मोठी भूमिका बजावत असल्याचे म्हटले आहे.

भविष्य काळातील नेतृत्वात भारताचे स्थान महत्त्वाचे असेल -भविष्यातील भारताच्या भूमिकेसंदर्भात बोलताना ट्रस म्हणाले, “भारत आता जगातील सर्वात मोठी लोकसंख्या आणि दीर्घकाळापासून लोकशाहीचे प्रतिनिधित्व करणारा देश आहे. भविष्य  काळातील नेतृत्वात त्याचे महत्त्वाचे स्थान असेल, जे खूप उत्साहवर्धक आहे." एवढेच नाही, तर चीनचा वाढता धोका लक्षात घेत, क्वाडमध्ये भारताचा सहभाग अत्यंत महत्वाचा असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

ब्रिटिश अर्थव्यवस्थेवर ट्रस यांचे भाष्य -ट्रस यांनी ब्रिटिश अर्थव्यवस्थेसंदर्भात निराजी व्यक्त केली आहे. त्या म्हणाल्या, ब्रिटिश अर्थव्यवस्था लवकरात लवकर सावरेल, असे मला वाटत नाही. ब्रिटनमधील शक्तिशाली नोकरशाहीवर नियंत्रण आणल्याशिवाय सर्वकाही सुरळीत होणार नाही, असेही त्या म्हणाल्या.

टॅग्स :IndiaभारतEnglandइंग्लंडEconomyअर्थव्यवस्था