शहरं
Join us  
Trending Stories
1
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा
2
"हमासकडे शेवटचे ३-४ दिवस शिल्लक, जर त्यांनी ऐकलं नाही तर..."; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी
3
वर्ल्ड कपच्या पहिल्याच सामन्यात दीप्ती शर्मानं रचला इतिहास; अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय
4
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
5
World Cup की सौंदर्य स्पर्धा... 'या' ८ महिला क्रिकेटर्सना बघून म्हणाल- हिरोईन दिसते हिरोईन!
6
शिर्डीत ५६ भिक्षेकरी पोलिसांच्या ताब्यात; महाराष्ट्रासह ७ राज्यांतील भिक्षेकऱ्यांचा समावेश
7
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
8
ग्राहक न्यायालयाच्या लाचखाेर लिपिकास एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा; ठाण्यातील प्रकरण
9
कापूस खरेदीस ‘पणन’ला परवानगी; लवकरच सीसीआयसोबत करार; आर्थिक मदतीची मागणी
10
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
11
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
12
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
13
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
14
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
15
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
16
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
17
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
18
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
19
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
20
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?

दोन्ही मुलांना मैदानात उतरवलं, भारताचंही नाव घेतलं! इम्रान खानच्या खेळीनं पाकच्या राजकारणात खळबळ  

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2025 11:35 IST

तुरुंगात असतानाही आता इम्रान खान यांनी आपली नवी खेळी खेळण्यास सुरुवात केली आहे. पहिल्यांदाच त्यांनी आपल्या दोन्ही मुलांना राजकारणात सक्रिय केलं आहे.

सध्या पाकिस्तानी तरुंगात कैद असलेले पाकचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी राजकारणात परतण्यासाठी आता एक नवी खेळी रचली आहे. यावेळी त्यांनी भारताचं कौतुक देखील केल्याचं म्हटलं जात आहे. जर इम्रान खान यात यशस्वी झाले तर, पाकिस्तनच्या सध्याच्या सरकारला मोठा हादरा बसू शकतो. पाकिस्तानी वृत्तपत्र ट्रिब्यूनच्या रिपोर्टनुसार, आदियाला तुरुंगातून इम्रान खान यांनी दोन संदेश पाठवले आहेत. 

इम्रान खान यांनी पाठवलेला पहिला संदेश त्यांच्या दोन्ही मुलांसाठी आहे, हे सध्या लंडनमध्ये आहेत. तर, दूसरा संदेश त्यांनी आपल्या वक्तव्यांना जगभरात पोहोचवणाऱ्या पत्रकारांसाठी पाठवला आहे. 

काय म्हणाले इम्रान खान? 

इम्रान खानने आपला पहिला संदेश दोन्ही मुलांसाठी पाठवला आहे. यात त्याने दोन्ही मुलांना आपल्या सुटकेसाठी प्रयत्न करण्यास सांगितले आहे. वडिलांचा संदेश मिळताच आता मुलांनी देखील जोरदार प्रयत्न सुरू केले आहे. आता इम्रान खान यांच्या दोन्ही मुलांनी मुलाखती देत, जगातील सगळ्या देशांनी पाकिस्तानच्या या प्रकरणात हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे. त्यांनी आपल्या मुलाखतीत म्हटले की, पाकिस्तानात लोकशाही नाही. आम्हाला आमच्या वडिलांना तुरुंगातून बाहेर काढायचे आहे. आम्ही सगळ्या देशांकडे मदत मागत आहोत. आता पाकिस्तानचा खरा चेहरा जगासमोर यायला हवा.

इम्रान खानने दुसरा संदेश पत्रकारांना दिला आहे. त्यांनी म्हटलं की, पाकिस्तान सरकार युद्धविरामाचा आनंद साजरा करत आहे, परंतु तणावात मानसिक लढाई लढण्यात सरकार अपयशी ठरले आहे. इम्रान खान यांच्या मते, युद्ध परिस्थितीत ६० टक्के लढाई मानसिकदृष्ट्या लढली जाते. भारताने यामध्ये पुढाकार घेतला आहे. भारत पुन्हा हल्ला करण्याची तयारी करत आहे. हे माहीत असूनही पाकिस्तानचे राज्यकर्ते आनंद साजरा करत आहेत. या सरकारविरुद्ध लोकांनी आवाज उठवण्याची गरज आहे.  

इम्रान खान यांची मुलं झाली सक्रिय!इम्रान खान तुरुंगात गेल्यानंतर पहिल्यांदाच त्यांचे दोन्ही मुलगे सक्रिय भूमिका बजावताना दिसले आहेत. इम्रानच्या दोन्ही मुलांनी म्हटले आहे की, ते त्यांच्या वडिलांसाठी दीर्घ लढाई लढतील. यादरम्यान असेही म्हटले जात आहे की, येत्या काळात इम्रान यांची मुलं एक मोहीम चालवतील आणि त्यांच्या समर्थकांना सोशल मीडियावर एकत्र करतील, जेणेकरून त्यांना सरकारविरुद्ध बंड पुकारता येईल.

टॅग्स :Imran Khanइम्रान खानPakistanपाकिस्तानPoliticsराजकारण