शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रीनगरमध्ये जप्त केलेल्या स्फोटकांचा स्फोट, ९ जणांचा मृत्यू; दिल्ली कनेक्शनच्या चौकशीदरम्यान ब्लास्ट
2
जप्त केलेली ३५० किलो स्फोटके कशी फुटली? स्टेशन बाहेरच्या 'त्या' कारवर संशय, अवयव ३०० फूटांवर फेकले गेले
3
“बिहारच्या निकालाचे श्रेय निवडणूक आयोग अन् मतचोरी, SIR मुळे NDAचा विजय”: हर्षवर्धन सपकाळ
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १७ नोव्हेंबर २०२५ रोजी खुला होणार, १२.६२% पर्यंत परताव्याचा दावा
5
भाजप बनला सर्वांत मोठा पक्ष, तरी नितीश कुमार दहाव्यांदा मुख्यमंत्री? डावलणे अशक्य, हे आहे कारण
6
पैसा दुप्पट करण्याची मशीन बनली पोस्टाची ‘ही’ स्कीम; केवळ ₹१००० पासून सुरू करू शकता गुंतवणूक
7
एनडीएच्याच गळ्यात पुन्हा विजयाचा (बि)हार; अब की बार... २०० पार; महाआघाडीचा फ्लाॅप शो; भाजप प्रथमच नंबर १
8
लग्नाच्या वाढदिवशीच घरी लक्ष्मी आली! राजकुमार राव आणि पत्रलेखा झाले आईबाबा
9
'फर्स्ट पास्ट द पोस्ट'चा धक्का; राजदच्या मतांची टक्केवारी भाजपपेक्षा अधिक; पण पराभूत
10
आजचे राशीभविष्य,१५ नोव्हेंबर २०२५: मित्रांसाठी खर्च करावा लागण्याची शक्यता; शक्यतो आज बौद्धिक चर्चा टाळा
11
पाच मुद्द्यांमधून जाणून घ्या एनडीएचा विजय आणि महाआघाडीच्या पराजयाची कारणे...
12
मेगाब्लॉक, जम्बोब्लॉकमुळे रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या होणार प्रवास खोळंबा
13
बीबीसीने मागितली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची माफी
14
बिहारच्या विजयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत सत्ताधारी महायुतीला बळ ! मतचोरीचे आरोप चालले नाहीत
15
मुंबईत राहून मिळत आहे माथेरानच्या थंडीचा आनंद, पारा १८ अंशांवर; तापमान १६ अंशांवर उतरणार?
16
बिहारप्रमाणे पश्चिम बंगालमधील ‘जंगलराज’ हटवणारच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला निर्धार
17
लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः कोरडे पाषाण; प्रशांत किशोर यांच्या ‘जन सुराज’ला भोपळा
18
ऑफलाइनही भरता येणार उमेदवारी अर्ज
19
डाळी, भाज्या, इंधनामुळे येऊ लागले स्वस्ताईचे दिवस, घाऊक महागाई घटून उणे १.२१ टक्क्यावर; २७ महिन्यांचा गाठला नीचांक
20
दुर्बल लोकांविरुद्ध गुन्हा करणाऱ्यांना दया नाही, विशेष पॉक्सो न्यायालयाने सुनावले; तरुणाला १० वर्षांची शिक्षा
Daily Top 2Weekly Top 5

दोन्ही मुलांना मैदानात उतरवलं, भारताचंही नाव घेतलं! इम्रान खानच्या खेळीनं पाकच्या राजकारणात खळबळ  

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2025 11:35 IST

तुरुंगात असतानाही आता इम्रान खान यांनी आपली नवी खेळी खेळण्यास सुरुवात केली आहे. पहिल्यांदाच त्यांनी आपल्या दोन्ही मुलांना राजकारणात सक्रिय केलं आहे.

सध्या पाकिस्तानी तरुंगात कैद असलेले पाकचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी राजकारणात परतण्यासाठी आता एक नवी खेळी रचली आहे. यावेळी त्यांनी भारताचं कौतुक देखील केल्याचं म्हटलं जात आहे. जर इम्रान खान यात यशस्वी झाले तर, पाकिस्तनच्या सध्याच्या सरकारला मोठा हादरा बसू शकतो. पाकिस्तानी वृत्तपत्र ट्रिब्यूनच्या रिपोर्टनुसार, आदियाला तुरुंगातून इम्रान खान यांनी दोन संदेश पाठवले आहेत. 

इम्रान खान यांनी पाठवलेला पहिला संदेश त्यांच्या दोन्ही मुलांसाठी आहे, हे सध्या लंडनमध्ये आहेत. तर, दूसरा संदेश त्यांनी आपल्या वक्तव्यांना जगभरात पोहोचवणाऱ्या पत्रकारांसाठी पाठवला आहे. 

काय म्हणाले इम्रान खान? 

इम्रान खानने आपला पहिला संदेश दोन्ही मुलांसाठी पाठवला आहे. यात त्याने दोन्ही मुलांना आपल्या सुटकेसाठी प्रयत्न करण्यास सांगितले आहे. वडिलांचा संदेश मिळताच आता मुलांनी देखील जोरदार प्रयत्न सुरू केले आहे. आता इम्रान खान यांच्या दोन्ही मुलांनी मुलाखती देत, जगातील सगळ्या देशांनी पाकिस्तानच्या या प्रकरणात हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे. त्यांनी आपल्या मुलाखतीत म्हटले की, पाकिस्तानात लोकशाही नाही. आम्हाला आमच्या वडिलांना तुरुंगातून बाहेर काढायचे आहे. आम्ही सगळ्या देशांकडे मदत मागत आहोत. आता पाकिस्तानचा खरा चेहरा जगासमोर यायला हवा.

इम्रान खानने दुसरा संदेश पत्रकारांना दिला आहे. त्यांनी म्हटलं की, पाकिस्तान सरकार युद्धविरामाचा आनंद साजरा करत आहे, परंतु तणावात मानसिक लढाई लढण्यात सरकार अपयशी ठरले आहे. इम्रान खान यांच्या मते, युद्ध परिस्थितीत ६० टक्के लढाई मानसिकदृष्ट्या लढली जाते. भारताने यामध्ये पुढाकार घेतला आहे. भारत पुन्हा हल्ला करण्याची तयारी करत आहे. हे माहीत असूनही पाकिस्तानचे राज्यकर्ते आनंद साजरा करत आहेत. या सरकारविरुद्ध लोकांनी आवाज उठवण्याची गरज आहे.  

इम्रान खान यांची मुलं झाली सक्रिय!इम्रान खान तुरुंगात गेल्यानंतर पहिल्यांदाच त्यांचे दोन्ही मुलगे सक्रिय भूमिका बजावताना दिसले आहेत. इम्रानच्या दोन्ही मुलांनी म्हटले आहे की, ते त्यांच्या वडिलांसाठी दीर्घ लढाई लढतील. यादरम्यान असेही म्हटले जात आहे की, येत्या काळात इम्रान यांची मुलं एक मोहीम चालवतील आणि त्यांच्या समर्थकांना सोशल मीडियावर एकत्र करतील, जेणेकरून त्यांना सरकारविरुद्ध बंड पुकारता येईल.

टॅग्स :Imran Khanइम्रान खानPakistanपाकिस्तानPoliticsराजकारण