शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
2
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
3
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
4
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
5
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
6
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
7
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
8
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
9
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
10
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
11
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
12
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
13
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
14
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
15
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत
16
Digital Gold SEBI: डिजिटल गोल्ड खरेदी असाल, तर थांबा! ऑनलाईन सोने खरेदी करणाऱ्यांना सेबीचा सावधगिरीचा इशारा
17
शशी थरूर यांनी अडवाणींचे कौतुक केले, नेहरू आणि इंदिरा गांधींबद्दल धक्कादायक विधान केले
18
FD सुरक्षित, पण श्रीमंत होण्यासाठी पुरेश नाही! जास्त परतावा हवा असल्यास 'हे' ५ पर्याय बेस्ट
19
...अन् ड्रग माफियाच्या घरात पैसे मोजायला बसले पोलिसवाले; सगळ्या १०, २०, ५० च्याच नोटा, २२ तास लागले
20
Video: 6,6,6,6,6,6,6...भारतीय क्रिकेटरनं रचला नवा इतिहास; अवघ्या ११ चेंडूत सर्वात जलद अर्धशतक

पाकिस्तानात बहरतोय डॉ. बाबासाहेबांच्या विचारांचा वारसा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2022 08:50 IST

पाकिस्तानी लोक डॉ. आंबेडकरांचे कार्य आणि विचारांवर प्रेम करणारे आहेत. अलीकडच्याच प्रवासात आलेल्या अनुभवांवर आधारलेले हे टीपण!

- डॉ. प्रदीप आगलावे

सर्वसामान्य भारतीयांच्या आणि पाकिस्तानी लोकांच्या मनात एकमेकांविषयी बरेच गुंतागुंतीचे काहीतरी असते. उत्सुकता असते तसे गैरसमजही असतात!  पाकिस्तानला अलीकडेच तीनदा गेलो. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा अभ्यासक म्हणून मला पाकिस्तानचे निमंत्रण मिळाले होते, हे विशेष! पाकिस्तानी लोक डॉ. आंबेडकरांचे कार्य आणि विचारांवर प्रेम करणारे आहेत. पाकिस्तानात डॉ. आंबेडकरांच्या नावाने अनेक संस्था कार्यरत आहेत. 

‘आंबेडकर सोसायटी फॉर साऊथ आशिया’, ‘सेंटर फॉर साऊथ एशियन स्टडीज्’ आणि पंजाब विद्यापीठ, लाहोरच्या संयुक्त विद्यमाने डॉ. आंबेडकर यांच्या तत्त्वज्ञानावर आंतरराष्ट्रीय परिषद लाहोर येथील पंजाब विद्यापीठात नुकतीच आयोजित करण्यात आली होती.यावेळेस माझ्यासोबत भारतातील डॉ. सीमा माथूर (दिल्ली विद्यापीठ), बेझवाडा विल्सन (दिल्ली), डॉ. सुजाता सुरेपल्ली (तेलंगणा) हे तीन प्रतिनिधी होते. लाहोरला जायचे होते. आम्ही अमृतसरहून गाडीने वाघा बॉर्डरला गेलो. भारतीय इमिग्रेशनची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर एका बसने आम्हाला भारत - पाकिस्तानच्या सीमेवर नेण्यात आले.

पाकिस्तानचे फाटक उघडून अधिकारी बाहेर आले, ते भारतीय अधिकाऱ्याशी हात मिळवून बोलले आणि आत निघून गेले. आम्ही पाकिस्तानच्या फाटकाकडे गेलो. त्यांनी पासपोर्ट तपासून आम्हाला आत घेतले. पाकचे इमिग्रेशन अधिकारी वाकइस नकवी यांनी हसून स्वागत केले. परिषदेचे आयोजक डॉ. सय्यद शहीन हसन यांच्यासोबत आम्ही लाहोरच्या दिशेने निघालो. अटारी - वाघा बॉर्डरपासून लाहोर शहर केवळ २३ किलोमीटर अंतरावर आहे.

आंतरराष्ट्रीय परिषदेच्या एक दिवस आधी लाहोर येथील मुस्लीम, हिंदू, दलित आणि ख्रिश्चन प्रतिनिधींसोबत आमची चर्चा ठेवण्यात आली होती. सर्वांनी भारताविषयी गौरवोद्गार काढले. अनेक लोकांचे असे मत होते की, फाळणीने देशाचे विभाजन झाले नसते तर आज भारत देश आशिया खंडातील एक प्रमुख शक्ती म्हणून उदयाला आला  असता. 

१३ ऑक्टोबर २०२२ रोजी डॉ. आंबेडकरांच्या तत्त्वज्ञानावर आंतरराष्ट्रीय परिषद संपन्न झाली. या परिषदेचे मुख्य अतिथी भारतातील पाकिस्तानचे माजी राजदूत मा. शमशाद अहमद हे होते. ते आपल्या भाषणात म्हणाले, “डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे खऱ्या अर्थाने मानवतावादी होते. डॉ. आंबेडकर यांचे विचार आजही संपूर्ण जगाला मार्गदर्शक आहेत. त्यांनी आयुष्यभर संघर्ष करून शोषित आणि वंचित समाजाला मानवी अधिकार प्राप्त करून दिले. ही आधुनिक मानवी इतिहासातील एक फार मोठी घटना आहे. दक्षिण आशियातील देशांना आपला विकास करायचा असेल तर डॉ. आंबेडकर यांच्या विचारांशिवाय पर्याय नाही.”

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सामाजिक न्यायाच्या तत्त्वज्ञानाचा दक्षिण आशियामध्ये प्रचार आणि प्रसार करण्याच्या उद्देशाने आंबेडकर सोसायटी फॉर साऊथ आशिया (पाकिस्तान)  ही संस्था सप्टेंबर २०१७मध्ये स्थापन करण्यात आली. ही संस्था दक्षिण आशियातील शोषित आणि सीमांत अल्पसंख्याक समुदायाच्या विशेषत: दलितांच्या उत्थानाकरिता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सामाजिक न्यायाच्या तत्त्वज्ञानाचा प्रचार आणि प्रसार करण्याचे कार्य करते. डॉ. आंबेडकरांच्या अनुयायांना एकत्रित करून दक्षिण आशियातील अल्पसंख्याक आणि कनिष्ठ जातीच्या गरीब लोकांना वंचितता आणि शोषणापासून वाचविण्यासाठी संयुक्त प्रयत्न करणे, हा या संस्थेचा मुख्य उद्देश आहे.

पाकिस्तानातील ‘गंगाराम हेरिटेज फाऊंडेशन’ ही अल्पसंख्याक लोकांकरिता काम करणारी एक महत्त्वाची संस्था. या संस्थेचे संचालक डॉ. सय्यद शहीन हसन सांगत होते, ‘‘डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केवळ भारतातील शोषित, पीडित लोकांकरिताच कार्य केले नाही तर त्यापलीकडे त्यांचे कार्य होते. डॉ. आंबेडकरांच्या तत्त्वज्ञानावर विद्यार्थ्यांनी संशोधन करावे, याकरिता पाकिस्तानात विद्यार्थ्यांना फेलोशिप दिली जाते.’’ 

पाकिस्तानमध्ये डॉ. आंबेडकर यांच्या विचार आणि कार्याचा प्रचार आणि प्रसार सातत्याने होत आहे. डॉ. आंबेडकरांच्या मानवतावादी आणि सामाजिक न्यायाचा अर्थात त्यांचा वैचारिक वारसा पुढे नेण्याचे कार्य पाकिस्तानमधील काही मंडळी करत आहेत.लाहोर शहरात फिरताना आम्हाला कुठेही परकेपणा जाणवला नाही, हेही महत्त्वाचे! भारताचे १०० रुपये म्हणजे पाकिस्तानी २६४ रुपये होतात. त्यामुळे पाकिस्तानात खरेदीचा  वेगळा आनंद मिळतो, हेही नोंदवून ठेवतो.  

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkarडॉ. बाबासाहेब आंबेडकरPakistanपाकिस्तान