शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

Rahul Gandhi On BJP : "भाजपला वाटतेय ते कायम सत्तेत असतील, पण परिस्थिती..," राहुल गांधींचं लंडनमध्ये वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2023 05:59 IST

आपल्या मोबाइलमध्ये पेगासस या इस्रायली सॉफ्टवेअरची घुसखाेरी केल्याच्या आरोपाचाही त्यांनी पुनरुच्चार केला.

लंडन : भाजपला वाटतेय की भारतात ते कायम सत्तेत असतील; पण परिस्थिती तशी नाही. गरज पडल्यास विरोधी पक्ष एकत्र येऊन भारतातील लोकशाही संस्थांच्या सुधारण्याचे काम हाती घेतील, असे मत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी येथे व्यक्त केले.

आपल्या लंडन दौऱ्याचा समारोप करताना छतम हाउस थिंक टँकशी संवाद साधताना ते बोलत होते. आपल्या मोबाइलमध्ये पेगासस या इस्रायली सॉफ्टवेअरची घुसखाेरी केल्याच्या आरोपाचाही त्यांनी पुनरुच्चार केला. भाजप विरोधकांचा आवाज दाबू पाहत असल्याचेही ते म्हणाले. लोकशाही संस्थांचे दमन खूप धोकादायक आहे. परदेशी मीडियातही भारतातील लोकशाहीबाबत गंभीर चिंता व्यक्त करण्यात येत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणले. 

भारतात झपाट्याने काही बदल होत असून त्याचा अंदाज काँग्रेस आणि यूपीए सरकारला आला नाही. काँग्रेसने नेहमीच ग्रामीण विकासाकडे लक्ष केंद्रित केले आहे. मात्र, ग्रामीण ते शहरी अशा झालेल्या बदलाचा अंदाज काँग्रेसला आला नाही, अशी कबुलीही त्यांनी दिली. दरम्यान, भारतातील लोकशाहीविषयी राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्यांचा भाजपने मंगळवारी निषेध केला आहे.

भाजप नेते रवी शंकर प्रसाद यांनी नवी दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत ब्रिटिश संसदेसारख्या व्यासपीठाचा भारताबद्दल खोटेनाटे पसरविण्यासाठी वापर केल्याबद्दल राहुल गांधी यांच्यावर टीका केली. 

  • आरएसएस ही मूलतत्त्ववादी आणि हुकुमशाही संस्था असल्याचे त्यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले. त्यांनी सर्व लोकशाही संस्थांवर ताबा मिळविल्याचेही ते म्हणाले.
  • मीडिया, न्यायपालिका, संसद, निवडणूक आयोग अशा सर्वच संस्थांवर त्यांनी ताबा मिळवला असून त्यांचे यातील सातत्य आश्चर्यचकित करते, असे ते म्हणाले.
टॅग्स :congressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधीEnglandइंग्लंडBJPभाजपा