शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
6
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
7
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
8
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
9
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
10
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
11
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
12
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
13
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
14
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
15
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
16
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
17
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
18
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
19
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
20
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक

अमेरिकेकडून भारताला मोठा धक्का, चीनविरोधी ऑकस आघाडीत सहभागी करून घेण्यास दिला नकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2021 17:51 IST

India-US News: गेल्या काही वर्षांमध्ये आशिया खंडात भारत आणि चीन यांच्यातील संघर्ष तीव्र झालेला आहे. मात्र असे असले तरी चीनबाबत अमेरिकेने भारताला मोठा धक्का दिला आहे.

वॉशिंग्टन/नवी दिल्ली - गेल्या काही वर्षांमध्ये आशिया खंडात भारत आणि चीन यांच्यातील संघर्ष तीव्र झालेला आहे. मात्र असे असले तरी चीनबाबत अमेरिकेने भारताला मोठा धक्का दिला आहे. अमेरिकेने भारत आणि जपानला ऑस्ट्रेलिया आणि ब्रिटनसोबत मिळून हिंदी-पॅसिफिकच्या सुरक्षेसाठी बनवलेल्या त्रिपक्षीय आघाडी ऑकसमध्ये सहभागी करून घेण्यास नकार दिला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी १५ सप्टेंबर रोजी ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन  आणि ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्यासोबत हिंदी-पॅसिफिकच्या सुरक्षेसाठी एका त्रिपक्षीय आघाडीची ऑकसची घोषणा केली होती. (Big blow to India from US, refusal to join the anti-China aukus Alliance)

या आघाडीनंतर आता ऑस्ट्रेलियाला अणुशक्तीवर चालणाऱ्या पाणबुड्यांचा पुरवठा केला जाणार आहे. या संदर्भात बुधवारी व्हाईट हाऊसमधील प्रेस सचिव जेन साकी यांनी सांगितले की, ऑकसच्या घोषणेवेळी राष्ट्राध्यक्ष बायडन यांनी जे सांगितले ते सांकेतिक नव्हते. मला वाटते की, त्यांनी फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युअल मॅक्रॉ यांना स्पष्टपणे सांगितले की, ऑकसमध्ये आता कुठल्याही अन्य देशाला सहभागी करून घेता येणार नाही. 

दरम्यान, २४ सप्टेंबरपासून क्वाड शिखर संमेलन सुरू होणार आहे. तसेच यावेळी अमेरिका याचे यजमानपद भूषवत आहे. या संमेलनापूर्वी भारताला या ऑकस सुरक्षा आघाडीचा भाग बनवले जाईल, अशी अपेक्षा होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी क्वाड संमेलनामध्ये भाग घेण्यासाठी अमेरिकेत दाखल झाले आहेत. ते तीन दिवस अमेरिकेत राहतील. यादरम्यान, मोदी अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षा कमला हॅरिस यांच्याशीही चर्चा करणार आहेत.

अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि ब्रिटनच्या या सुरक्षा आघाडीकडे हिंदी-पॅसिफिक भागात चीनचा सामना करण्याचा प्रयत्न म्हणून पाहिले जात आहे. अमेरिका आणि यूके ऑस्ट्रेलियाला अणुऊर्जेवर चालणाऱ्या पाणबुड्या विकसित करण्याचे तंत्रज्ञान पुरवतील, हे पहिल्यांदाच घडणार आहे. ऑकसबाबत चीनने संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. या आघाडीला कुठलेही भवितव्य नसल्याचा  टोला चीनने लगावला आहे.  

टॅग्स :IndiaभारतUnited StatesअमेरिकाJoe Bidenज्यो बायडनNarendra Modiनरेंद्र मोदीchinaचीन