शहरं
Join us  
Trending Stories
1
'यशस्वी' सेंच्युरी... 'रो-को'ची फिफ्टी! टीम इंडियानं दाबात जिंकली दक्षिण आफ्रिकेविरुद्धची वनडे मालिका
2
“कोणतीही तडजोड अमान्य, अशी कारवाई करू की...”; Indigo प्रकरणी केंद्र सरकारची कठोर भूमिका
3
वयाच्या ६७ व्या वर्षी २५ वर्षांच्या तरुणीशी लग्न; संशयास्पद मृत्यूनंतर सून म्हणते, "लग्नानंतर दररोज..."
4
"IndiGo चा गोंधळ, प्रवाशांना त्रास हे भाजपा सरकारच्या नाकर्तेपणाचं उदाहरण"; विरोधक कडाडले
5
Yashasvi Jaiswal Century : आधी कसोटी खेळला! मग टी-२० स्टाईलमध्ये साजरी केली वनडेतील पहिली सेंच्युरी
6
“चार्टर्ड अकाउंटंटच देशाचे आर्थिक शिल्पकार”; ICAI परिषदेत DCM एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन
7
“संवैधानिक मुल्ये पायदळी तुडवणाऱ्या शक्तींविरोधात संघर्ष करण्याची वेळ”: हर्षवर्धन सपकाळ
8
Uddhav Thackeray : ​​​​​​​"...तर उपमुख्यमंत्रीपद रद्द करा", उद्धव ठाकरे यांची सरकारकडे मोठी मागणी
9
'लाडकी बहिण योजना' सर्वात जास्त 'लाडकी'! ४६% पुरुषांचाही महिलांच्या आर्थिक उन्नतीला पाठिंबा
10
अबतक २००००! हिटमॅन रोहित शर्मानं रचला इतिहास; आंतरारष्ट्रीय क्रिकेटमध्ये गाठला मैलाचा पल्ला
11
एकनाथ शिंदेमुळेच भाजपा पुन्हा सत्तेत, ताकदवान व्हायला उठावच कारणीभूत - शंभूराज देसाई
12
अरे बापरे! Grok वापरणाऱ्यांनो सावधान; लोकांच्या घराचे पत्ते, पर्सनल माहिती लीक, प्रायव्हसी धोक्यात
13
IND vs SA : कुलदीप KL राहुलकडे DRS चा हट्ट धरायला गेला, मग हिटमॅन रोहित 'कॅप्टन' झाला अन्... (VIDEO)
14
एलॉन मस्क यांच्या 'X' ला तब्बल १०८० कोटींचा दंड ! 'ब्लू टीक' संदर्भातील प्रकरणात बसला दणका
15
GenZमध्ये महाराष्ट्र सरकारची कार्यशैली लोकप्रिय; ६७% तरुणाईला देवेंद्र फडणवीसांवर 'विश्वास'
16
मार्गशीर्ष संकष्ट चतुर्थी २०२५: ‘या’ ५ गोष्टी अवश्य अर्पण करा; गणपतीची कायम कृपा मिळवा!
17
२०२६ला ६ महिन्यातच सगळी संकटे समस्या दूर होतील; संकष्ट चतुर्थीपासून ‘ही’ उपासना सुरू करा!
18
समस्या संपत नाहीत, पैसा राहत नाही? गणेशाचे प्रभावी स्तोत्र ११ वेळा म्हणा; अद्भूत अनुभव घ्या!
19
'बिनशर्त माफी मागा, अन्यथा पाच कोटींचा दावा ठोकणार' महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची माजी मंत्री सुलेखा कुंभारे यांना नोटीस
20
America Visa : सोशल मीडियावर एक चूक कराल, तर तुमच्यासाठी बंद होतील अमेरिकेचे दरवाजे! काय आहे नियम?
Daily Top 2Weekly Top 5

बांगलादेशात न्यायाधीश, पत्रकार, अर्थतज्ज्ञ मिळून सरकार चालवणार, पाहा सदस्यांची संपूर्ण यादी...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2024 12:52 IST

Bangladesh Army Rule : बांगलादेशच्या नव्या सरकारचे नेतृत्व डॉ. सलीमुल्ला खान आणि डॉ. आसिफ नजरुल करणार आहेत.

Bangladesh Army Rule :बांगलादेशात लष्करानं सध्या अंतरिम सरकार स्थापन केलं आहे. या अंतरिम सरकारमध्ये १० जणांवर जबाबदारी सोपवण्यात आली असून यामध्ये पत्रकार आणि अनेक प्रसिद्ध व्यक्तींचा समावेश आहे. आता हे १० सदस्य बांगलादेशातील सरकार चालवणार आहेत. यामध्ये हिंदू समाजाच्या प्रतिनिधींचाही समावेश आहे. 

बांगलादेशच्या नव्या सरकारचे नेतृत्व डॉ. सलीमुल्ला खान आणि डॉ. आसिफ नजरुल करणार आहेत. याशिवाय, निवृत्त न्यायाधीश मोहम्मद अब्दुल वहाब मिया, निवृत्त लष्कर जनरल इक्बाल करीम, निवृत्त मेजर जनरल सय्यद इफ्तिखार उद्दीन, डॉ. देबप्रिय भट्टाचार्य, मतिउर रहमान चौधरी, ब्रिगेडियर जनरल (निवृत्त) एम सखावत हुसेन, डॉ हुसैन जिल्लूर रहमान आणि न्यायाधीश एम.ए. मतीन हे नवीन सरकार चालवणार आहेत. 

दरम्यान, पंतप्रधान पदाचा राजीनामा दिल्यानंतर शेख हसीना या बांगलादेश सोडून भारतात आल्या आहेत. त्यामुळं जमात-ए-इस्लामीनं धमकी दिल्यानं तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. शेख हसीना यांना जो देश आश्रय देईल, त्या देशाच्या दूतावासाला घेराव घालू, कर्मचाऱ्यांना बाहेर पडू देणार नाही, असं जमात-ए-इस्लामीनं म्हटलं आहे. अशा परिस्थितीत भारतीय दूतावासाबाहेर सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

अंतरिम सरकारमध्ये हिंदू सदस्यडॉ. देबप्रिय भट्टाचार्य हे अर्थतज्ज्ञ असून ते हिंदू कुटुंबातील आहेत. शेख हसीना यांच्या सरकारमध्ये ते आर्थिक धोरणांचे सल्लागारही राहिले होते. त्यांचे वडील वकील आणि आई बांगलादेशच्या खासदार आहेत. ते संयुक्त राष्ट्रात बांगलादेशचे स्थायी प्रतिनिधीही होते. याचबरोबर, डॉ. सलीमुल्लाह खान हे बांगलादेशी लेखक आणि शिक्षणतज्ज्ञ आहेत. ते बंगाली मुस्लिम कुटुंबातील असून त्यांनी ढाका विद्यापीठात कायद्याचे शिक्षण घेतले आहे. डॉ. आसिफ नजरुल हे बांगलादेशी लेखक आणि पत्रकार आहेत. तसंच, नव्या सरकारमध्ये पाच निवृत्त लष्करी अधिकाऱ्यांचाही समावेश करण्यात आला आहे.

आणीबाणी लागू केली जाणार नाहीदरम्यान, देशातील तणावपूर्ण परिस्थिती आणि हिंसक निदर्शनं पाहता लष्करानं मोठं वक्तव्य केलं आहे. देशात सध्या कोणतीही आणीबाणी लागू केली जाणार नाही. निवडणुकीची चर्चा करणं खूप घाईचं आहे. सध्या लष्कर तात्पुरतं सरकार चालवेल. परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर पुन्हा निर्णय घेतला जाईल, असं लष्करानं म्हटलं आहे.

टॅग्स :BangladeshबांगलादेशInternationalआंतरराष्ट्रीय