शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

बांगलादेशात न्यायाधीश, पत्रकार, अर्थतज्ज्ञ मिळून सरकार चालवणार, पाहा सदस्यांची संपूर्ण यादी...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2024 12:52 IST

Bangladesh Army Rule : बांगलादेशच्या नव्या सरकारचे नेतृत्व डॉ. सलीमुल्ला खान आणि डॉ. आसिफ नजरुल करणार आहेत.

Bangladesh Army Rule :बांगलादेशात लष्करानं सध्या अंतरिम सरकार स्थापन केलं आहे. या अंतरिम सरकारमध्ये १० जणांवर जबाबदारी सोपवण्यात आली असून यामध्ये पत्रकार आणि अनेक प्रसिद्ध व्यक्तींचा समावेश आहे. आता हे १० सदस्य बांगलादेशातील सरकार चालवणार आहेत. यामध्ये हिंदू समाजाच्या प्रतिनिधींचाही समावेश आहे. 

बांगलादेशच्या नव्या सरकारचे नेतृत्व डॉ. सलीमुल्ला खान आणि डॉ. आसिफ नजरुल करणार आहेत. याशिवाय, निवृत्त न्यायाधीश मोहम्मद अब्दुल वहाब मिया, निवृत्त लष्कर जनरल इक्बाल करीम, निवृत्त मेजर जनरल सय्यद इफ्तिखार उद्दीन, डॉ. देबप्रिय भट्टाचार्य, मतिउर रहमान चौधरी, ब्रिगेडियर जनरल (निवृत्त) एम सखावत हुसेन, डॉ हुसैन जिल्लूर रहमान आणि न्यायाधीश एम.ए. मतीन हे नवीन सरकार चालवणार आहेत. 

दरम्यान, पंतप्रधान पदाचा राजीनामा दिल्यानंतर शेख हसीना या बांगलादेश सोडून भारतात आल्या आहेत. त्यामुळं जमात-ए-इस्लामीनं धमकी दिल्यानं तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. शेख हसीना यांना जो देश आश्रय देईल, त्या देशाच्या दूतावासाला घेराव घालू, कर्मचाऱ्यांना बाहेर पडू देणार नाही, असं जमात-ए-इस्लामीनं म्हटलं आहे. अशा परिस्थितीत भारतीय दूतावासाबाहेर सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

अंतरिम सरकारमध्ये हिंदू सदस्यडॉ. देबप्रिय भट्टाचार्य हे अर्थतज्ज्ञ असून ते हिंदू कुटुंबातील आहेत. शेख हसीना यांच्या सरकारमध्ये ते आर्थिक धोरणांचे सल्लागारही राहिले होते. त्यांचे वडील वकील आणि आई बांगलादेशच्या खासदार आहेत. ते संयुक्त राष्ट्रात बांगलादेशचे स्थायी प्रतिनिधीही होते. याचबरोबर, डॉ. सलीमुल्लाह खान हे बांगलादेशी लेखक आणि शिक्षणतज्ज्ञ आहेत. ते बंगाली मुस्लिम कुटुंबातील असून त्यांनी ढाका विद्यापीठात कायद्याचे शिक्षण घेतले आहे. डॉ. आसिफ नजरुल हे बांगलादेशी लेखक आणि पत्रकार आहेत. तसंच, नव्या सरकारमध्ये पाच निवृत्त लष्करी अधिकाऱ्यांचाही समावेश करण्यात आला आहे.

आणीबाणी लागू केली जाणार नाहीदरम्यान, देशातील तणावपूर्ण परिस्थिती आणि हिंसक निदर्शनं पाहता लष्करानं मोठं वक्तव्य केलं आहे. देशात सध्या कोणतीही आणीबाणी लागू केली जाणार नाही. निवडणुकीची चर्चा करणं खूप घाईचं आहे. सध्या लष्कर तात्पुरतं सरकार चालवेल. परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर पुन्हा निर्णय घेतला जाईल, असं लष्करानं म्हटलं आहे.

टॅग्स :BangladeshबांगलादेशInternationalआंतरराष्ट्रीय