शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विदान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
3
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
4
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
5
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
6
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
7
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
8
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
9
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
10
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
11
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
12
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
13
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
14
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
15
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
16
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
17
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
18
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
19
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
20
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं

बांगलादेश भारताविरोधात इंटरपोलकडे धाव घेणार, तर समुद्रात चीनसाठी घातल्या पायघड्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2024 16:22 IST

Bangladesh News; बांगलादेशमधील मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखालील सरकार एकीकडे भारतासोबत चांगल्या संबंधांची इच्छा व्यक्त करत आहे. तर दुसरीकडे भारतावर डोळे वटारण्याचीही आगळीक करत आहे.

विद्यार्थ्यांच्या तीव्र आंदोलनामुळे सत्तांतर होऊन शेख हसिना सत्तेमधून पायउतार झाल्यानंतर बांगलादेशमधील राजकीय परिस्थिती झपाट्याने बदलली आहे. बांगलादेशमधील मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखालील सरकार एकीकडे भारतासोबत चांगल्या संबंधांची इच्छा व्यक्त करत आहे. तर दुसरीकडे भारतावर डोळे वटारण्याचीही आगळीक करत आहे. आता तर बांगलादेशने भारताविरोधात इंटरपोलकडे मदत मागितली आहे. एवढंच नाही तर हिंदी महासागरामध्ये चिनी नौदलाच्या संशोधक जहाजाला येण्याची परवानगीही दिली आहे.

बांगलादेशच्या मुख्य सरकारी वकिलांचं एक वक्तव्य समोर आलं आहे. त्यात त्यांनी सत्तांतरानंतर भारतात आश्रयाला आलेल्या शेख हसिना यांना भारतातून  बांगलादेशमध्ये परत आणण्यासाठी आम्ही इंटरपोलची मदत घेऊ, असे सांगितले आहे. तत्पूर्वी आम्ही कोर्टाच्या माध्यमातून सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करत आहोत. त्यानंतर याबाबत इंटरपोलकडे धाव घेतली जाईल, असं त्यांनी सांगितलं आहे. बांगलादेशमधील मोहम्मद युनूस सरकारमध्ये एवढ्या महत्त्वपूर्ण पदावर बसलेली व्यक्ती वरिष्ठांच्या परवानगीशिवाय एवढं मोठं वक्यव्य करणार नाही, असं बोललं जात आहे.

आंदोलनामुळे सत्तेतून पायउतार झाल्यानंतर भारतात आश्रयाला आलेल्या शेख हसिना ह्या आतापर्यंत भारतामध्येच आहेत. त्यामुळे बांगलादेशी जनतेच्या मनातील नाराजी सातत्याने वाढत चालली आहे. त्यामुळे बांगलादेशमधील काळजीवाहू सरकारवर भारताविरोधात कारवाई करण्यासाठीचा दबाव वाढत आहे.  

दरम्यान, बांगलादेशकडून भारताच्या सुरक्षेला धोकादायक ठरेल असं आखणी एक पाऊल उचलण्यात आलं आहे. भारताकडून चीनच्या हिंदी महासागरातील घुसखोरीला सातत्याने अटकाव करण्यात येतो. मात्र आता मालदीवपाठोपाठ बांगलादेशने चिनी नौदलाला हिंदी महासागरामध्ये शिरकाव करण्याची परवानगी दिली आहे. चिनी नौदलाचा एक ताफा शनिवारी बांगलादेशमध्ये पोहोचला आहे.  त्या प्रसंगी चीनचे बांदलादेशमधील राजपूत याओ वेन यांनी सांगितले की, ढाकामध्ये हल्लीच राजकीय सत्ता परिवर्तन झालं असलं तरी चीन आणि बांगलादेमधील संबंध दृढ होत राहतील.  

टॅग्स :BangladeshबांगलादेशIndiaभारतchinaचीनInternationalआंतरराष्ट्रीय